शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

विद्यापीठाने निकाल रोखले; विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 05:00 IST

ऑनलाईन परीक्षा देऊन निकाल जाहीर झाला, पण गुणपत्रिका नाही, यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. गुणपत्रिका का आल्या नाहीत, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचत असताना, त्यांना विद्यापीठात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. गुणपत्रिका जमा करूनही महाविद्यालयांनी त्या विद्यापीठाला दिल्या नाहीत. याविषयात दरदिवशी हजाराहून अधिक विद्यार्थी विद्यापीठात गर्दी करीत आहेत.

ठळक मुद्देजुन्या सत्राच्या गुणपत्रिकांची तारांबळ, अंतिम वर्षाचा निकाल जाहीर तरीही गुणपत्रिका नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने जुन्या सत्राच्या गुणपत्रिका अप्राप्त असल्याने अशा विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाचे निकाल रोखले आहेत. त्यामुळे गत दोन ते तीन दिवसांपासून जुन्या सत्राच्या गुणपत्रिका जमा करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. महाविद्यालयात गुणपत्रिका जमा करूनही त्या विद्यापीठात पोहचविल्या नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे.ऑनलाईन परीक्षा देऊन निकाल जाहीर झाला, पण गुणपत्रिका नाही, यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. गुणपत्रिका का आल्या नाहीत, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचत असताना, त्यांना विद्यापीठात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. गुणपत्रिका जमा करूनही महाविद्यालयांनी त्या विद्यापीठाला दिल्या नाहीत. याविषयात दरदिवशी हजाराहून अधिक विद्यार्थी विद्यापीठात गर्दी करीत आहेत. काही महाविद्यालयांनी पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अशात गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत.जुन्या सत्राच्या गुणपत्रिका जमा झाल्याशिवाय अंतिम सत्राचा निकाल जाहीर करता येत नाही. महाविद्यालयांनीच गुणपत्रिका जमा करणे अपेक्षित होते. आता विद्यार्थी स्वत: गुणपत्रिका आणून देत असून, निकाल जाहीर केला जात आहे.- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ

चृूक महाविद्यालयाची आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतरही गुणपत्रिकांसाठी पायपीट करावी लागत आहे. १२० कि.मी.चा प्रवास करून विद्यापीठात यावे लागले. वेळेत गुणपत्रिका मिळाली, तरच पदव्युत्तर प्रवेश मिळेल.- प्रियंका मराठे, खामगाव.

टॅग्स :universityविद्यापीठ