शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी १० गावे दत्तक घ्यावी; राज्यपालांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 20:35 IST

Amravati News गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विद्यापीठाने किमान १० गावे दत्तक घेऊन गाव परिवर्तन योजना राबवावी, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी येथे केले.

अमरावती : अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव दिले गेले आहे. गाडगेबाबा हे स्वच्छतेचे जनक असून, त्यांची दशसूत्री समाजाला मार्गदर्शक ठरली. आता गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विद्यापीठाने किमान १० गावे दत्तक घेऊन गाव परिवर्तन योजना राबवावी, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी येथे केले. अमरावती विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

केंद्र सरकारचे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण हे नीतिमूल्य आणि पिढी घडविणारे ठरणार आहे. येत्या काळात आधुनिक शिक्षणप्रणाली विकसित होणार आहे. त्यामुळे आता युवकांनी नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनावे. विद्याधन हे कुणीही हिरावू शकत नाही. त्यामुळे शिका, मोठे व्हा आणि समाजाचं ऋण फेडा, असा सल्ला त्यांनी तरुणाईला दिला. यापुढे कोणतेही महाविद्यालय ‘नॅक’ मूल्यांकनाशिवाय राहता कामा नये, यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेऊन सर्वच महाविद्यालयांचे ‘नॅक’ करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले मंचावर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू, हर्षवर्धन देशमुख, डॉ. अविनाश बोर्डे, डॉ. आर. डी. सिकची, डॉ. व्ही. एम. मेटकर, डॉ. एच. एम. धुर्वे, डॉ. व्ही. एच. नागरे, सहसंचालक उच्चशिक्षण डॉ. नलिनी टेंभेकर, सहसंचालक तंत्रशिक्षण डॉ. व्ही. आर. मानकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक मोनाली तोटे पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. डुडुल, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. डी. डब्ल्यू. निचित, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे यांची उपस्थिती होती.

स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्णपदकाचे सात गुणवंत ठरले मानकरी

अभियांत्रिकीच्या विविध सहा शाखांतून प्रथम आणि सर्व शाखांमधून गुणवत्ताप्राप्त एक अशा सात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. यात आशुतोष राठोड (यवतमाळ), प्रियांका चव्हाण (शेगाव), लखन राठी (अमरावती), प्रतीक जाधव (यवतमाळ), शाहीद शफी तवर (बडनेरा), प्राची अपाले (बडनेरा), समीक्षा ढोक (वरूड) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रRamesh Baisरमेश बैस