शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

केंद्रीय मंत्र्यांचे दत्तकग्राम आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 21:59 IST

अमरावती शहरापासून २१ किलोमीटर अंतरावर असणारे तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दत्तक घेतलेले टिमटाळा हे गावच साथरोगाने आजारी पडले आहे. त्यात दोन डेंग्यूरुग्ण आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांमध्ये आहेत.

ठळक मुद्देडेंग्यूचे दोन पॉझिटिव्ह : आरोग्य प्रशासन झोपेत, घरोघरी रुग्ण

श्यामकांत सहस्त्रभोजने।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अमरावती शहरापासून २१ किलोमीटर अंतरावर असणारे तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दत्तक घेतलेले टिमटाळा हे गावच साथरोगाने आजारी पडले आहे. त्यात दोन डेंग्यूरुग्ण आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांमध्ये आहेत.स्वामी विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे जन्मगाव तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे सांसद आदर्श दत्तकग्राम टिमटाळा साथरोगाने ग्रस्त आहे. गेल्या एक महिन्यापासून या गावाला साथरोगाने घेरले आहे. त्यात डेंग्यूने शिरकाव केला आहे. ज्ञानेश्वर भडके व रोशन बगाडे यांचे रक्ताचे नमुने सकारात्मक आले आहेत. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख इस्पितळात उपचार घेतले. डेंग्यूरुग्ण संख्येत अधिक वाढ होवू शकते, अशी भीती ग्रामस्थांमध्ये आहे. अशा गंभीर स्थितीतदेखील आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष आजाराची व्याप्ती वाढवित आहे.गावात केवळ एकदा फवारणी करण्यात आली. मात्र, ठिकठिकाणी घाणच घाण साचली आहे. आरोग्य प्रशासनाने आमच्या गावाची दखल घ्यावी, असे गावकऱ्यांमध्ये कळकळीने बोलले जात आहे.वाहता नाला झाला अवरुद्धगावाला खेटून जाणारा वाहता नाला खोलीकरणामुळे अवरुद्ध झाला आहे. एकाच ठिकाणी साचून राहणाºया घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत चालली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नाल्याचे घाण पाणी गावात शिरत आहे.सदस्यांच्या घरासमोरच शेणाचा ढिगाराटिमटाळ्याचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्याच्या घरासमोरच शेणाचा भलामोठा ढिगारा आहे. या ढिगाºयामुळे डासांचा प्रादुर्भाव सतत राहतो. संबंधित ग्रामसेवकाला हा शेणाचा ढिगारा दिसत नाही का? गावाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामसेवक व जिल्हा परिषद प्रशासन ढिगारा संगळणाºयावर कारवाईल करेल का?स्वच्छतेकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आमच्या गावात साथरोगाने थैमान घातले आहे. माझ्या मुलाला डेंग्यू झाला आहे. तो उपचार घेत आहे.- उत्तम भडके, गावकरीसाथरोगाची सुरुवात होऊन एक महिना झाला. तेव्हाच ग्रामपंचायतला स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे गावकºयांनी सांगितले होते. आता तरी ठोस उपाययोजना राबवावी.- श्रीपाल सहारे, गावकरी