शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

३६ हजार एलईडीने झळाळली अंबानगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:57 IST

रस्त्यावरील पारंपरिक पथदिवे बदलून महापालिकेने तब्बल ३६,६६० एलईडी बल्ब लावल्याने अंबानगरी धवल प्रकाशात न्हाऊन निघाली आहे. एलईडी पथदिव्यांचा हा प्रयोग सर्वप्रथम (सन २०१६) अमरावतीत सुरु करण्यात आला.

ठळक मुद्देमहिन्याकाठी ३५ लाखांची बचत : ईईसीएलचा अमरावती पॅटर्न यशस्वी

प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रस्त्यावरील पारंपरिक पथदिवे बदलून महापालिकेने तब्बल ३६,६६० एलईडी बल्ब लावल्याने अंबानगरी धवल प्रकाशात न्हाऊन निघाली आहे. एलईडी पथदिव्यांचा हा प्रयोग सर्वप्रथम (सन २०१६) अमरावतीत सुरु करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण राज्यातील प्रमुख रस्त्यांवर सुमारे २० लाख एलईडीवर बल्ब बसविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यासाठी नगरविकास विभागाने ईईएसएल (एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) सामंजस्य करार केला आहे. महापालिका क्षेत्रात सर्वत्र एलईडी लावल्याने महिन्याकाठीच्या वीजबिलात ३५ टक्यांची बचत झाली.शहरात पथदर्शी प्रकल्पदरवर्षी पथदिव्यांची देखभाल, दुरुस्ती व वीज बिलावर महापालिकेला कोट्यवधींचा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करणे तथा ऊर्जा बचतीच्या हेतूने सोडियम दिव्यांऐवजी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. अमरावती शहरात यापूर्वी २६ हजार पथदिवे लावण्यात आली होती. त्यात सातत्याने वाढ होत होती. पथदिव्यांमध्ये साधारणत: सोडियम व्हेपर लॅम्पचा आणि फ्लूरोसंट ट्यूबलाईटचा वापर केला जात होता. त्या पार्श्वभूमिवर नवीन विद्युत साहित्यामध्ये एलईडी वापराचा निर्णय तत्कालीन वेळी घेण्यात आला. त्याला नगरविकास विभागाने हिरवी झेंडी देत पायलट प्रोजेक्ट म्हणून एलईडी प्रकल्पासाठी अमरावती महापालिकेची निवड केली. ५ मार्च २०१६ रोजी त्यासाठी ईईसीएल कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीने जुने २२ हजार पथदिवे काढून नवीन ३६,६६० एलईडी बल्ब बसविले आहेत. ऊर्जाबचत करून वीज देयकावरील खर्च ५० टक्क्यांपर्यंत खाली आणणे, असा या योजनेमागील हेतू होता. करारानुसार, महापालिका क्षेत्रात ३३,३९७ एलईडी बल्ब लावायचे होते. मात्र, एप्रिल २०१८ अखेर संपूर्ण शहरात सध्याचे सोडियम व्हेपर व मर्क्युरी व्हेपर दिवे बदलून तेथे ३६,६६० दिवे लावण्यात आल्याची माहिती महापालिकेतील प्रकाश विभागाने दिली आहे.जबाबदारी ईईएसएलचीनगरविकास विभाग व महाराष्टÑ शासनामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार एलईडी दिव्यांचा पुरवठा करणे, बसविणे, सुरू करणे, तसेच दिवे बसविल्यानंतर देखभाल दुरुस्ती आणि वारंटी कालावधीत अदलाबदल यासह सेवा आणि देखभाल पुरविणे अशी संपूर्ण जबाबदारी ईईएसएलने स्वीकारली आहे. या दिव्यांची पुढील सात वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ईईएसएलकडे राहणार आहे.असे लागले एलईडी२० व ४० वॅटचे एलईडी वस्त्यांमधील रस्त्यांवर लावण्यात आले, तर ७२ व १२० वॅटचे एलईडी वस्त्यांमधील मोठे रस्ते व रस्ते दुभाजकांवर लावण्यात आले आहेत. याशिवाय ११० व १२० वॅटचे एलईडी हायमास्ट म्हणून चौकात लावण्यात आले आहेत. या दिवे लावणीमुळे ३० ते ३५ टक्के ऊर्जाबचत झाली आहे.वीज देयक ६५ लाखांवरसुमारे २६ हजार पथदिव्यांमार्फत होणाऱ्या वीजपुरवठ्यापोटी महापालिका महिन्याकाठी सुमारे ९० लाख ते १ कोटी रुपये वीजबिल भरायचे. एलईडी दिवे बसविल्यानंतर या खर्चात ३० ते ३५ टक्क्यांची बचत झाली असून, वीजदेयक ६५ ते ७० लाख रुपये महिन्याचे येऊ लागले आहेत.