शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

अभूतपूर्व अनागोंदीला सत्ताधीश, आयुक्त जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:55 IST

महापालिकेत स्थापनेनंतर पहिल्यांदाच शहरात अभूतपूर्व अनागोंदी माजली. त्यास सत्ताधीश व आयुक्त हेमंत पवार पूर्णत: कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केला.

ठळक मुद्देकाँग्रेसचे जोरदार आंदोलन : राजकमल चौकात तळली भजी, नियोजनशून्येतचा आरोप

आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिकेत स्थापनेनंतर पहिल्यांदाच शहरात अभूतपूर्व अनागोंदी माजली. त्यास सत्ताधीश व आयुक्त हेमंत पवार पूर्णत: कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केला. विरोधीपक्षनेता बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महापौरांना जाब विचारला. आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. वर्षभरानंतर काँग्रेसने पहिल्यांदाच जोरदार आंदोलन केले.काँग्रेसने सोमवारी राजकमल चौकात पकाडे तळून भाजप सरकारचा निषेध केला.तथा गत एक वर्षात शहरातील विकासकामे ठप्प होण्यास भाजपसह प्रशासनप्रमुख म्हणून आयुक्तांना जबाबदार धरले. तेथे निदर्शने केल्यानंतर काँगे्रसी कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनासमोर आले. मात्र आ.सुनील देशमुख यांनी घेतलेल्या बैठकीसाठी आयुक्त विश्रामगृहात गेल्याने बबलू शेखावत व माजी महापौर विलास इंगोले यांनी संताप व्यक्त करीत आयुक्त जाणूनबुजून गेल्याचा आरोप केला. आयुक्तांना जाब न विचारता हे आंदोलक महापौरांकडे पोहोचले. तेथे वादळी चर्चा झाली.सभागृह नेता सुनील काळे व विलास इंगोले यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. भाजपचा निषेध करीत अश्वासनपूर्ती करा, अन्यथा खुर्ची खाली करा, असा इशारा देण्यात आला. काँग्रेसच्या या आंदोलनाने महापालिकेत बºयाच कालावधीनंतर मोठे आंदोलन पाहावयास मिळाले. या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर, नगरसेवक प्रशांत डवरे, माजी महापौर वंदना कंगाले, प्रदीप हिवसे, शोभा शिंदे, सलिम बेग आदीं नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.काँग्रेस आक्रमक, महापौर निरुत्तरवर्षभरानंतरही स्वच्छतेच्या एकल कंत्राटावर सत्ताधीश तसेच आयुक्त निर्णय घेऊ शकले नाहीत, त्यासाठी आवश्यक असलेल्या ३२ कोटींचे कुठलेही नियोजन नाही. पीएमआवास योजनेत पीआरकार्डची जाचक अट टाकल्याने आतापर्यंत एक वीटही लागू शकली नाही. रमाई आवास योजनेच्या हप्त्यासाठी लाभार्थी महापालिकेच्या चकरा मारत आहेत. मजीप्राने संपूर्ण शहर खोदून ठेवले आहे. त्यांच्यावर महापालिकेचे कुठलेही नियंत्रण नाही. एवढेच काय तर प्रशासनावर भाजपचा वचक राहिलेला नाही. भटकी कुत्री अमरावतीकरांच्या जीवावर उठली आहे. या मुद्यावर काँगे्रसने महापौर संजय नरवणे यांना जाब विचारला. मात्र, महापौर सकारात्मक उत्तरे देऊ शकली नाहीत.