शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना समजून घ्या, समजावून सांगा!

By admin | Updated: June 18, 2015 00:17 IST

नशिरपूर येथील शेतकऱ्याची आत्महत्या आणि त्यातून बँक अधिकाऱ्याच्या झालेल्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर येथील ...

बैठक : उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला बँक अधिकाऱ्यांचा क्लासमोर्शी : नशिरपूर येथील शेतकऱ्याची आत्महत्या आणि त्यातून बँक अधिकाऱ्याच्या झालेल्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर येथील उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी मोर्शी उपविभागातील मोर्शी आणि वरुड तालुक्यातील बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना ‘शेतकऱ्यांना समजून घ्या आणि समजावून सांगा’ असा सल्ला दिला. शेतकरी व बँक अधिकाऱ्यांमधील वाद वाढू नयेत, यासाठी वऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत उपविभागीय अधिकारी वऱ्हाडे यांनी शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती विशद केली. या पस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत बँकेच्या अधिकाऱ्यांनी सौजन्याने वागण्याचे आवाहन केले. बँकेला शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करताना कायदेशीर अडचण येत असेल तर त्यांना लेखी कळवावे, जेणे करुन संबंधित शेतकऱ्याला या निर्णयाविरूध्द वरिष्ठांकडे दाद मागता येईल, असेही उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. बँकेतील कृषीकर्ज अधिकाऱ्यांनी जनसंपर्क अधिकाऱ्याची भूमिका पार पाडावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी प्रत्येक बँकेला गावनिहाय कर्जपुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यातील किती शेतकऱ्यांना लक्ष्यप्राप्तीकरिता कर्ज देता येऊ शकेल, त्याची यादी लावण्यात यावी, कर्ज पुनर्गठनाच्या नियमाप्रमाणे यादी तयार करुन प्रक्रिया सुरु करावी, असेही उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी बैठकीत सांगितले. (तालुका प्रतिनिधी)भोगवटदार वर्ग २ चे कर्ज प्रकरण भोगवटदार वर्ग २ च्या शेतकऱ्यांना कर्जासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र आणण्याची गळ बँकेकडून घातली जाते. तथापि २००४ च्या शासन परिपत्रकाप्रमाणे अशी गरज नसल्याचे उपविभागीय अधिकारी वऱ्हाडे यांनी यावेळी स्पष्ट केले. सोबतच या परिपत्रकाच्या प्रती देखील बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.व्याजाची कपात करु नका : संत्रा फळपीक पुनर्जीवन व शासनाने दिलेल्या इतर मदतीच्या रकमेतून शेतकऱ्यांकडील कर्जाच्या व्याजाची रक्कम कपात करण्यात येत असल्याची ओरड आहे. पीककर्ज पुनर्गठन करताना बँकेच्या १२ टक्के व्याजाच्या रकमेपैकी ६ टक्के व्याज शासन बँकेला देणार असल्यामुळे अशी वसूली न करण्याचे आवाहनही करण्यात आले.राजस्व अधिकारी मदतीला ! ४शेती कर्ज देताना काही अडचणी येत असतील तर तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. महसूल अधिकारी शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणात बँकेला मदत करतील, असे आश्वासन देण्यात आले.