शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शेतकऱ्यांना समजून घ्या, समजावून सांगा!

By admin | Updated: June 18, 2015 00:17 IST

नशिरपूर येथील शेतकऱ्याची आत्महत्या आणि त्यातून बँक अधिकाऱ्याच्या झालेल्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर येथील ...

बैठक : उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला बँक अधिकाऱ्यांचा क्लासमोर्शी : नशिरपूर येथील शेतकऱ्याची आत्महत्या आणि त्यातून बँक अधिकाऱ्याच्या झालेल्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर येथील उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी मोर्शी उपविभागातील मोर्शी आणि वरुड तालुक्यातील बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना ‘शेतकऱ्यांना समजून घ्या आणि समजावून सांगा’ असा सल्ला दिला. शेतकरी व बँक अधिकाऱ्यांमधील वाद वाढू नयेत, यासाठी वऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत उपविभागीय अधिकारी वऱ्हाडे यांनी शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती विशद केली. या पस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत बँकेच्या अधिकाऱ्यांनी सौजन्याने वागण्याचे आवाहन केले. बँकेला शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करताना कायदेशीर अडचण येत असेल तर त्यांना लेखी कळवावे, जेणे करुन संबंधित शेतकऱ्याला या निर्णयाविरूध्द वरिष्ठांकडे दाद मागता येईल, असेही उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. बँकेतील कृषीकर्ज अधिकाऱ्यांनी जनसंपर्क अधिकाऱ्याची भूमिका पार पाडावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी प्रत्येक बँकेला गावनिहाय कर्जपुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यातील किती शेतकऱ्यांना लक्ष्यप्राप्तीकरिता कर्ज देता येऊ शकेल, त्याची यादी लावण्यात यावी, कर्ज पुनर्गठनाच्या नियमाप्रमाणे यादी तयार करुन प्रक्रिया सुरु करावी, असेही उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी बैठकीत सांगितले. (तालुका प्रतिनिधी)भोगवटदार वर्ग २ चे कर्ज प्रकरण भोगवटदार वर्ग २ च्या शेतकऱ्यांना कर्जासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र आणण्याची गळ बँकेकडून घातली जाते. तथापि २००४ च्या शासन परिपत्रकाप्रमाणे अशी गरज नसल्याचे उपविभागीय अधिकारी वऱ्हाडे यांनी यावेळी स्पष्ट केले. सोबतच या परिपत्रकाच्या प्रती देखील बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.व्याजाची कपात करु नका : संत्रा फळपीक पुनर्जीवन व शासनाने दिलेल्या इतर मदतीच्या रकमेतून शेतकऱ्यांकडील कर्जाच्या व्याजाची रक्कम कपात करण्यात येत असल्याची ओरड आहे. पीककर्ज पुनर्गठन करताना बँकेच्या १२ टक्के व्याजाच्या रकमेपैकी ६ टक्के व्याज शासन बँकेला देणार असल्यामुळे अशी वसूली न करण्याचे आवाहनही करण्यात आले.राजस्व अधिकारी मदतीला ! ४शेती कर्ज देताना काही अडचणी येत असतील तर तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. महसूल अधिकारी शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणात बँकेला मदत करतील, असे आश्वासन देण्यात आले.