शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा अंतर्गत कलह वाढला

By admin | Updated: November 27, 2015 00:36 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत कॉग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असतांनाही याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या मर्जीनुसार कामे होत नसल्याने अंतर्गत कलह वाढला आहे.

घरचाच अहेर : मर्जीनुसार कामे होत नसल्याने मतभेदअमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत कॉग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असतांनाही याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या मर्जीनुसार कामे होत नसल्याने अंतर्गत कलह वाढला आहे. त्यामुळे सत्तेच्या शेवटच्या टप्यात हा कलह वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.ग्रामिण भागाच्या विकासाचा केंद्र बिंदू असलेल्या जिल्हा परिषदेत जनतेने विकासाच्या अपेक्षा ठेवून प्रतिनिधी निवडून पाठविले आहेत. मात्र सध्या जिल्हा परिषदेत विरोधकांपेक्षा सत्ताधारी मंडळीत सदस्यांचा व पदाधिकाऱ्यांचे विकास कामांच्या मुद्यावर अंतर्गत मतभेद होत आहेत.ही परिस्थिती खरी असली तरी बाहेर मात्र सर्व काही ठिकठाक सुरू असल्याचा देखावा निर्माण करण्यातही मिनी मंत्रालयातील पदाधिकारी माहीर आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्ता सिंहनावर कॉग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असली तरी राज्यात सरकार मात्र भाजपा, शिवसेनेची सत्ता असल्याने विकास निधीला अपेक्षोपेक्षा कमी निधी मिळणे स्वाभावीक असले तरी जिल्हा परिषदेला उपलब्ध होणारा निधी बऱ्याच प्रमाणात मोठा आहे. या निधीतून विकास कामे करतांना सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना भरसाठ निधीची अपेक्षा असून तसा निधीही पदरात पाडून घेण्यासाठीही काही सदस्य आणि पदाधिकारी यामध्ये एक्सपर्ट आहेत. त्यामुळे केवळ सभा, बैठका आणि महत्वाच्या कामानिमित्त जिल्हा परिषदेत येणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनाही निधी वाटपात झुकते माप मिळत आहे. ही वास्तवीकता लपवून नसली तरी आता जिल्हा परिषदेच्या सत्ता सिंहासनाचा कालावधी केवळ एकच वर्ष शिल्लक असल्याने जवळ आहे. त्यामुळे आगामी निवडणूका डोळयासमोर ठेवून पुन्हा सभागृहात प्रतिनिधीत्व मिळावे आणी विकास कामांचा संदेश आपल्या क्षेत्रातील मतदारापर्यत जावा यादुष्टीने विकासात कामात मर्जीनुसार निधी व सोईनुसार कामे करावीत यासाठी सत्ताधाऱ्यांचा मुख्यपदाधिकाऱ्यावर दबाब आणण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे दबावाला बळी न पडता संधी साधूना वठनिवर आण्यासाठी जोरकस मोहीम सुरू झाली आहे. या प्रकारामुळे सताधाऱ्यामधील सहकार्यामध्येच दबक्या आवाजात अंतर्गत कलह वाढला आहे. परंतु सध्या तेरी भी चुप अन मेरी भी या प्रमाणे वेगवेगळया मार्गाने आपली कामे काढून घेण्यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत. एखाद्या कामात अडथळा आला तर याची तक्रार थेट गॉडफादर पर्यत करण्यातही सत्तेमधील सहकारी मागेपुठे न पाहता कामे मार्गी लावत आहेत. मात्र सामान्य व्यक्ती हा पदावर असला तर तो आपल्यावर सोपविलेली जबाबदारी ज्या हेतून सोपविली त्याची प्रामाणिकता ठेवून कामे करत असतांना अशावरच मर्जीतील व स्वताचे फायदे करून घेणारी कामे आताच करून द्या अन्यथा हेच सहकारी काम मर्जी नुसार न केल्यास खड्डेबोल सुनावत असल्याने या विषयावरून आता जिल्हा परिषदेतील अंतर्गत वाद उफाळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाच्या गॉडफादर असलेल्यांनाच यात मध्यस्थी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)