शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा अंतर्गत कलह वाढला

By admin | Updated: November 27, 2015 00:36 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत कॉग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असतांनाही याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या मर्जीनुसार कामे होत नसल्याने अंतर्गत कलह वाढला आहे.

घरचाच अहेर : मर्जीनुसार कामे होत नसल्याने मतभेदअमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत कॉग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असतांनाही याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या मर्जीनुसार कामे होत नसल्याने अंतर्गत कलह वाढला आहे. त्यामुळे सत्तेच्या शेवटच्या टप्यात हा कलह वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.ग्रामिण भागाच्या विकासाचा केंद्र बिंदू असलेल्या जिल्हा परिषदेत जनतेने विकासाच्या अपेक्षा ठेवून प्रतिनिधी निवडून पाठविले आहेत. मात्र सध्या जिल्हा परिषदेत विरोधकांपेक्षा सत्ताधारी मंडळीत सदस्यांचा व पदाधिकाऱ्यांचे विकास कामांच्या मुद्यावर अंतर्गत मतभेद होत आहेत.ही परिस्थिती खरी असली तरी बाहेर मात्र सर्व काही ठिकठाक सुरू असल्याचा देखावा निर्माण करण्यातही मिनी मंत्रालयातील पदाधिकारी माहीर आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्ता सिंहनावर कॉग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असली तरी राज्यात सरकार मात्र भाजपा, शिवसेनेची सत्ता असल्याने विकास निधीला अपेक्षोपेक्षा कमी निधी मिळणे स्वाभावीक असले तरी जिल्हा परिषदेला उपलब्ध होणारा निधी बऱ्याच प्रमाणात मोठा आहे. या निधीतून विकास कामे करतांना सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना भरसाठ निधीची अपेक्षा असून तसा निधीही पदरात पाडून घेण्यासाठीही काही सदस्य आणि पदाधिकारी यामध्ये एक्सपर्ट आहेत. त्यामुळे केवळ सभा, बैठका आणि महत्वाच्या कामानिमित्त जिल्हा परिषदेत येणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनाही निधी वाटपात झुकते माप मिळत आहे. ही वास्तवीकता लपवून नसली तरी आता जिल्हा परिषदेच्या सत्ता सिंहासनाचा कालावधी केवळ एकच वर्ष शिल्लक असल्याने जवळ आहे. त्यामुळे आगामी निवडणूका डोळयासमोर ठेवून पुन्हा सभागृहात प्रतिनिधीत्व मिळावे आणी विकास कामांचा संदेश आपल्या क्षेत्रातील मतदारापर्यत जावा यादुष्टीने विकासात कामात मर्जीनुसार निधी व सोईनुसार कामे करावीत यासाठी सत्ताधाऱ्यांचा मुख्यपदाधिकाऱ्यावर दबाब आणण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे दबावाला बळी न पडता संधी साधूना वठनिवर आण्यासाठी जोरकस मोहीम सुरू झाली आहे. या प्रकारामुळे सताधाऱ्यामधील सहकार्यामध्येच दबक्या आवाजात अंतर्गत कलह वाढला आहे. परंतु सध्या तेरी भी चुप अन मेरी भी या प्रमाणे वेगवेगळया मार्गाने आपली कामे काढून घेण्यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत. एखाद्या कामात अडथळा आला तर याची तक्रार थेट गॉडफादर पर्यत करण्यातही सत्तेमधील सहकारी मागेपुठे न पाहता कामे मार्गी लावत आहेत. मात्र सामान्य व्यक्ती हा पदावर असला तर तो आपल्यावर सोपविलेली जबाबदारी ज्या हेतून सोपविली त्याची प्रामाणिकता ठेवून कामे करत असतांना अशावरच मर्जीतील व स्वताचे फायदे करून घेणारी कामे आताच करून द्या अन्यथा हेच सहकारी काम मर्जी नुसार न केल्यास खड्डेबोल सुनावत असल्याने या विषयावरून आता जिल्हा परिषदेतील अंतर्गत वाद उफाळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाच्या गॉडफादर असलेल्यांनाच यात मध्यस्थी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)