शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

रबी हंगामात १०,५७७ हेक्टर जमीन सिंचनाखाली

By admin | Updated: November 17, 2015 00:26 IST

सिंचनाकडून समृद्धीकडे जाण्यासाठी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.

आजपासून पाणीपुरवठा : लाभक्षेत्रातील पिकांसाठी वरदानअमरावती : सिंचनाकडून समृद्धीकडे जाण्यासाठी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. खरीप हातचा गेल्याने रबी हंगामात तरी शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा, या उद्देशाने या विभागाने यंदा १०५७७ हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यातील राज्यस्तरीय पाटबंधारे प्रकल्पांमध्ये २७ आॅक्टोबर २०१५ रोजी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्यानुसार १०५७७ हेक्टर जमिनीवर सिंचनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्यानंतर सोमवार १६ नोव्हेंबरपासून कालव्याद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. अमरावती पाटबंधारे विभाग अमरावतीअंतर्गत मध्यम प्रकल्प, लघुप्रकल्प बंधारे, उपसा सिंचन इत्यादी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याच्या समादेश क्षेत्रात असलेल्या लाभधारकांस कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सन २०१५-१६ मधील रबी हंगामाकरिता १५ नोव्हेंबर २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधसाठी सोमवार १६ नोव्हेंबरपासून पाणीपुरवठ्याला आरंभ करण्यात आला आहे. सिंचनाचा लाभ घेण्याच्यादृष्टीने पाणी मागणी अर्ज मागविण्यात आले होते. उर्ध्व वर्धा जलाशयाची गाळपेर जमीन पेरणीसाठीजिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघुप्रकल्प, बंधारे, उपसासिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील पिकांसाठी आज सोमवारपासून कालव्याद्वारे पाणी पुरवठा होत असताना अप्पर वर्धा जलाशयाची गाळपेर जमीन पेरणीसाठी मिळणार आहे. धरणाची पातळी कमी झाल्याने धरणातील बुडीत क्षेत्र रबी व उन्हाळी पिकांसाठी पेरणीखाली येवू शकत असल्याने अमरावती जिल्ह्यातील धरणे क्षेत्रातील सुमारे ११०४ हेक्टर जमीन यावर्षी पेरणीसाठी भाडेपट्टीवर उपलब्ध होणार आहे. प्रकल्पग्रस्त, भूमिहिन आणि मागासवर्गीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)