शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

रबी हंगामात १०,५७७ हेक्टर जमीन सिंचनाखाली

By admin | Updated: November 17, 2015 00:26 IST

सिंचनाकडून समृद्धीकडे जाण्यासाठी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.

आजपासून पाणीपुरवठा : लाभक्षेत्रातील पिकांसाठी वरदानअमरावती : सिंचनाकडून समृद्धीकडे जाण्यासाठी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. खरीप हातचा गेल्याने रबी हंगामात तरी शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा, या उद्देशाने या विभागाने यंदा १०५७७ हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यातील राज्यस्तरीय पाटबंधारे प्रकल्पांमध्ये २७ आॅक्टोबर २०१५ रोजी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्यानुसार १०५७७ हेक्टर जमिनीवर सिंचनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्यानंतर सोमवार १६ नोव्हेंबरपासून कालव्याद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. अमरावती पाटबंधारे विभाग अमरावतीअंतर्गत मध्यम प्रकल्प, लघुप्रकल्प बंधारे, उपसा सिंचन इत्यादी पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याच्या समादेश क्षेत्रात असलेल्या लाभधारकांस कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सन २०१५-१६ मधील रबी हंगामाकरिता १५ नोव्हेंबर २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधसाठी सोमवार १६ नोव्हेंबरपासून पाणीपुरवठ्याला आरंभ करण्यात आला आहे. सिंचनाचा लाभ घेण्याच्यादृष्टीने पाणी मागणी अर्ज मागविण्यात आले होते. उर्ध्व वर्धा जलाशयाची गाळपेर जमीन पेरणीसाठीजिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघुप्रकल्प, बंधारे, उपसासिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील पिकांसाठी आज सोमवारपासून कालव्याद्वारे पाणी पुरवठा होत असताना अप्पर वर्धा जलाशयाची गाळपेर जमीन पेरणीसाठी मिळणार आहे. धरणाची पातळी कमी झाल्याने धरणातील बुडीत क्षेत्र रबी व उन्हाळी पिकांसाठी पेरणीखाली येवू शकत असल्याने अमरावती जिल्ह्यातील धरणे क्षेत्रातील सुमारे ११०४ हेक्टर जमीन यावर्षी पेरणीसाठी भाडेपट्टीवर उपलब्ध होणार आहे. प्रकल्पग्रस्त, भूमिहिन आणि मागासवर्गीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)