शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
3
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
4
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
5
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
6
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
7
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
8
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
9
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
10
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!
11
दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा
12
दिल्ली स्फोटाची भीषणता! लाल किल्ल्यापासून ३०० मीटर दूर दुकानाच्या छतावर सापडला मानवी हात; मृतांचा आकडा १३ वर
13
पाकिस्तानची अफगाणिस्तान अन् भारताला पोकळ धमकी; एकाचवेळी युद्ध करण्याची क्षमता आहे किती?
14
SIP द्वारे कोट्यधीश व्हायचंय? '१०-७-१०' हा फॉर्म्युला येईल कामी; श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही
15
खळबळजनक! लेकाला PUBG चं व्यसन, कंटाळलेल्या आईने अखेर संपवलं जीवन, वडील म्हणतात...
16
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
17
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
18
सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाली गिरीजा ओक, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली...
19
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
20
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट

बेनोडावासीयांचा निवडणुकीवर अघोषित बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:29 IST

सतराव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभर सुरू असताना, बेनोडा आणि परिसरात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले असतानादेखील ग्रामीण भागात निवडणुकीच्या घडामोडींना कुठलाही वेग आल्याचे दिसून येत नाही. सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी नसल्याने या निवडणुकीवर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अघोषित बहिष्कार टाकला आहे. कोरडा दुष्काळ हा चर्चेचा एकमेव विषय आहे.

ठळक मुद्देकोरडा दुष्काळ : पाणीटंचाईचा मुद्दा प्रभावी

लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा (शहीद) : सतराव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभर सुरू असताना, बेनोडा आणि परिसरात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले असतानादेखील ग्रामीण भागात निवडणुकीच्या घडामोडींना कुठलाही वेग आल्याचे दिसून येत नाही. सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी नसल्याने या निवडणुकीवर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अघोषित बहिष्कार टाकला आहे. कोरडा दुष्काळ हा चर्चेचा एकमेव विषय आहे.एरवी निवडणुका म्हटल्यावर ग्रामीण भागात पारावरच्या गप्पांना उधाण येते. सत्ताधाऱ्यांनी केलेली विकासकामे आणि चुका यावर मोठा वादविवाद रंगतो. आपापल्या पक्षाची ध्येयधोरणे आणि उमेदवाराचे उजवेपण कार्यकर्ते पोटतिडकीने सांगतात. मतदारांमध्येही निवडणूक आणि अंतिम निकालाबाबत प्रचंड कुतूहल असते.सर्वदूर आपल्याच उमेदवाराची हवा असल्याचे तुणतुणे कार्यकर्ते जोरात वाजवितात, तर मतदारही कुणाची कुठे हवा आहे, याचा मागोवा आपापल्या परीने घेतो. मात्र, यंदाची लोकसभा निवडणूक या घडामोडींना अपवाद ठरत आहे. निवडणुकीवर कोरडा दुष्काळ वरचढ झाल्याचे दिसून येत आहे.पाणीटंचाई केंद्रस्थानीमोर्शी विधानसभा मतदारसंघ अमरावती ऐवजी वर्धेत समाविष्ट असल्याने लोकसभेत आपले स्थान दुय्यम असल्याची नागरिकांची मानसिकता आहे. निवडणुकीला दहा दिवस उरले असताना रिंगणातील उमेदवारांची नावेही ग्रामीण भागात चर्चेला नाहीत.अद्यापही कुठल्याही उमेदवाराने आपले फ्लेक्स लावलेले नाहीत. यामुळे उमेदवार कोण, हेच जनसामान्यांना माहिती नाही. गावात पिण्यासाठी आणि शिवारात सिंचनासाठी पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असल्याने पाणी हा एकमेव विषय ग्रामिणांच्या चिंतेचा आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांवर एरवी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा असते, स्वत: तेच पाण्यासाठी वणवण फिरत असल्याने प्रचार कोण करेल, ही सर्वपक्षीय नेत्यांना लागलेली चिंता आहे.