शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

बेनोडावासीयांचा निवडणुकीवर अघोषित बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:29 IST

सतराव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभर सुरू असताना, बेनोडा आणि परिसरात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले असतानादेखील ग्रामीण भागात निवडणुकीच्या घडामोडींना कुठलाही वेग आल्याचे दिसून येत नाही. सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी नसल्याने या निवडणुकीवर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अघोषित बहिष्कार टाकला आहे. कोरडा दुष्काळ हा चर्चेचा एकमेव विषय आहे.

ठळक मुद्देकोरडा दुष्काळ : पाणीटंचाईचा मुद्दा प्रभावी

लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा (शहीद) : सतराव्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभर सुरू असताना, बेनोडा आणि परिसरात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले असतानादेखील ग्रामीण भागात निवडणुकीच्या घडामोडींना कुठलाही वेग आल्याचे दिसून येत नाही. सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी नसल्याने या निवडणुकीवर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अघोषित बहिष्कार टाकला आहे. कोरडा दुष्काळ हा चर्चेचा एकमेव विषय आहे.एरवी निवडणुका म्हटल्यावर ग्रामीण भागात पारावरच्या गप्पांना उधाण येते. सत्ताधाऱ्यांनी केलेली विकासकामे आणि चुका यावर मोठा वादविवाद रंगतो. आपापल्या पक्षाची ध्येयधोरणे आणि उमेदवाराचे उजवेपण कार्यकर्ते पोटतिडकीने सांगतात. मतदारांमध्येही निवडणूक आणि अंतिम निकालाबाबत प्रचंड कुतूहल असते.सर्वदूर आपल्याच उमेदवाराची हवा असल्याचे तुणतुणे कार्यकर्ते जोरात वाजवितात, तर मतदारही कुणाची कुठे हवा आहे, याचा मागोवा आपापल्या परीने घेतो. मात्र, यंदाची लोकसभा निवडणूक या घडामोडींना अपवाद ठरत आहे. निवडणुकीवर कोरडा दुष्काळ वरचढ झाल्याचे दिसून येत आहे.पाणीटंचाई केंद्रस्थानीमोर्शी विधानसभा मतदारसंघ अमरावती ऐवजी वर्धेत समाविष्ट असल्याने लोकसभेत आपले स्थान दुय्यम असल्याची नागरिकांची मानसिकता आहे. निवडणुकीला दहा दिवस उरले असताना रिंगणातील उमेदवारांची नावेही ग्रामीण भागात चर्चेला नाहीत.अद्यापही कुठल्याही उमेदवाराने आपले फ्लेक्स लावलेले नाहीत. यामुळे उमेदवार कोण, हेच जनसामान्यांना माहिती नाही. गावात पिण्यासाठी आणि शिवारात सिंचनासाठी पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असल्याने पाणी हा एकमेव विषय ग्रामिणांच्या चिंतेचा आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांवर एरवी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा असते, स्वत: तेच पाण्यासाठी वणवण फिरत असल्याने प्रचार कोण करेल, ही सर्वपक्षीय नेत्यांना लागलेली चिंता आहे.