शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कार्यशाळेत अनधिकृत वसुली

By admin | Updated: April 17, 2017 00:03 IST

एका संस्थेच्यावतीने शहरात शेतकऱ्यांसाठी आयोजित एका मार्गदर्शनपर शिबिरात आयोजकांनी शेतकऱ्यांकडून विनापावती प्रत्येकी एक हजार रूपये घेतले.

शेतकरी संतप्त : पोलिसांना पाचारण, मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहातील प्रकार अमरावती : एका संस्थेच्यावतीने शहरात शेतकऱ्यांसाठी आयोजित एका मार्गदर्शनपर शिबिरात आयोजकांनी शेतकऱ्यांकडून विनापावती प्रत्येकी एक हजार रूपये घेतले. यावर काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतल्याने आयोजक आणि सहभागी शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान काही शेतकरी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील यात हस्तक्षेप केल्याने काही वेळ तणावजन्य स्थिती उदभवली होती. मात्र, गाडगेनगर पोलिसांनी योग्य वेळी मध्यस्थी केल्याने हे प्रकरण निवळले. हा प्रकार रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान स्थानिक मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात घडली. ‘सुवर्ण कोकण समर्थ महाराष्ट्र’नामक यासंस्थेच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळी-मेंढीपालन, सेंद्रीय शेतीवर आधारित एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. एका खासगी चॅनलवरून याशिबिराची जाहिरातही करण्यात आली होती. उपरोक्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब हे या कार्यशाळेचे आयोजक आहेत. कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून सेंद्रीय शेतीतज्ज्ञ दीपक नरवडे, पारनेर येथील इब्राहीम खान हे उपस्थित होते. संपूर्ण विदर्भातील तब्बल १३५ शेतकरी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. प्रत्येक सहभागी शेतकऱ्याकडून कार्यक्रम स्थळाच्या दारावरच एका साध्या वहीत नोंद घेऊन प्रत्येकी हजार रूपयांची वसुली केली जात होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी ही रक्कम दिली होती. मात्र, अजय सोने नामक शेतकऱ्यांनी पैसे स्वीकारण्याच्या या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. सभागृहाच्या द्वारावर पैसे घेऊन नोंदी करणाऱ्या दीपक नरवडे यांना याबाबत विचारणा केली आणि पैसे घेताना पावती का दिली जात नाही, असा जाब विचारला.पावती देण्यास नकार का?अमरावती : शिवाय शिबिर आयोजित करताना पोलीसांसह जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती काय, संस्थेचे बॅनर, पोस्टर्स का लावले नाहीत, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, आयोजक या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत. काही वेळातच याठिकाणी अन्य शेतकऱ्यांसह शिवसेना व काँग्रेस या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी जमली. आयोजकांपैकी एक असलेल्या दीपक नरवडे यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. तणाव वाढत असलेला पाहून गाडगेनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक पुंडे त्यांच्या ताफ्यासह विमलाबाई देशमुख सभागृहात पोहोचले. एनएसयूआयचे बडनेरा विधानसभा प्रमुख समीर जवंजाळ, शिवसेनेचे नगरसेवक भारत चौधरी हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी अन्य आयोजक अमित तायडे यांना याबाबत विचारणा केली. पुन्हा वाद उफाळून आला. वरूड तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत आयोजकांकडून पैसे परत घेतले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून सर्वांना शांत केले व चौकशीसाठी नरवडे यांना बोलविण्यात आले होते. सदर प्रकरणात शेतकऱ्यांची गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती असून सदर प्रकरण पोलिसांनी तपासात ठेवले आहे. (प्रतिनिधी)आम्ही टीव्हीवरून जाहिरात पाहून स्वत:च येथे आलो. चांगले मार्गदर्शन मिळाले. कार्यशाळेसाठी प्रत्येकी हजार रूपये घेणार असल्याची माहिती यापूर्वीच देण्यात आली होती.- विलास देशमुख, शेतकरी, धामणगाव रेल्वेबॅनर्स, ओळखपत्राशिवाय कार्यशाळा‘सुवर्ण कोकण समर्थ महाराष्ट्र’या संस्थेच्यावतीने आयोजित या कार्यशाळेचे कार्यक्रमस्थळी कोणतेही बॅनर, पोस्टर्स नव्हते. शेतकऱ्यांकडून पैसे घेण्यासाठी नेमलेल्या प्रतिनिधींजवळ कोणतेच ओळखपत्र देखील नव्हते, हे विशेष.