शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत १,३९४ धार्मिक स्थळे नियमित,४ निष्कासित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 00:10 IST

उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शासनाने ३० आॅक्टोबर ते ३० जानेवारी दरम्यान अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित, स्थलांतरित व निष्कासित करण्याचा कालबद्ध कार्यक्रम राबविला.

हायकोर्टाच्या निर्णयानुसार प्रक्रिया : ८८ स्थळांचे स्थलांतरण अमरावती : उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शासनाने ३० आॅक्टोबर ते ३० जानेवारी दरम्यान अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित, स्थलांतरित व निष्कासित करण्याचा कालबद्ध कार्यक्रम राबविला. जिल्ह्यात फेब्रुवारी २०१७ अखेर २ हजार ५५७ अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी एक हजार ३९४ स्थळांचे नियमितीकरण, ८८ स्थळांचे स्थलांतरण तर ४ स्थळे निष्कासित करण्यात आलीत.कायदा, सुव्यवस्थेला धोका नसलेल्या धार्मिक स्थळांना नियमित करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. तहसीलदार, बीडीओ, नगररचना विभाग, बांधकाम, पोलीस विभागाद्वारा अहवाल मागविण्यात आले. त्यानंतर एक हजार ३९४ धार्मिक स्थळांना निष्कासित करून उर्वरीत एक हजार ७५ स्थळांविषयीची प्रक्रिया सुरू आहे. कायद्यानुसार अडसर ठरणाऱ्या ८८ स्थळांना स्थलांतरित करून अमरावती तालुक्यातील चार धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात आली आहे.असा आहे कालबद्ध कृती कार्यक्रम२९ सप्टेंबर २००९ पूर्वी अस्तित्वात असलेल्या धार्मिक स्थळांचे नियमितीकरण, स्थलांतरण व निष्कासनासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम राबविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार धार्मिक स्थळांचे वर्गीकरण करून यादी तयार करण्यात आली. त्यावर हरकती मागविल्या. त्याची सुनावणी झाली व १ मे १९६० पूर्वीची धार्मिक स्थळे निष्कासित करण्यासंदर्भातील यादी राज्य समितीला पाठविण्यात आली. नंतर निष्कासनाची तारीख सूचनास्थळावर लावून चार स्थळे निष्कासित करण्यात आलीत.तालुकानिहाय स्थितीअमरावती तालुक्यातील २६, नांदगाव खंडेश्वर २८१, चांदूररेल्वे, तिवसा ९, धामणगाव ८, अचलपूर २२२, चांदूरबाजार १३, दर्यापूर १७३, मोर्शी ५४७, वरूड १६, धारणी ६ व चिखलदरा तालुक्यातील ६ स्थळे नियमित केली आहेत. अमरावती तालुक्यातील २, भातकुली १५२, अंजनगाव ३ व चिखलदरा तालुक्यातील ८५ स्थळांची प्रक्रिया सुरू आहे. दर्यापूर तालुक्यातील ३ स्थळे निष्कासित केली असून येथील ६४ व मोर्शीतील १५ स्थळे स्थलांतरित करण्यात आली.जिल्ह्यातील २५५७ अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी १३९४ स्थळे नियमित केली. उर्वरित १०७५ स्थळांची प्रक्रिया सुरू आहे. ८८ स्थळे स्थलांतरित व ४ निष्कासित करण्यात आली आहेत.- नरेंद्र फुलझेले,उपजिल्हाधिकारी (महसूल विभाग)