शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील दोन हजार घरकुल होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:16 IST

६२ ग्रामपंचायतीत आक्रोश मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : घरी टीव्ही, फ्रीज, दुचाकी, चारचाकी, शेती असल्याची माहिती जनगणना ...

६२ ग्रामपंचायतीत आक्रोश

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : घरी टीव्ही, फ्रीज, दुचाकी, चारचाकी, शेती असल्याची माहिती जनगणना सर्वेक्षणाच्या वेळ दिली. कुटुंबप्रमुखांनी सांगितलेली माहिती आता तब्बल दोन हजार लाभार्थींना महागात पडणार असून ‘ड’ यादीतील ही घरकुले रद्द होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान ६२ ग्रामपंचायतींमधील लाभधारकांमध्ये यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

शासनाने सन २०११ मध्ये जनगणनेत प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले होते. यावेळी घरी असलेली संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली. यावरून बीपीएलधारक, कुटुंबाकडे पक्के घर, मातीचे घर, टीव्ही, फ्रीज, टेलीफोन मोबाईल, दुचाकी, चारचाकी अशा १३ निकषांची माहिती गोळा करण्यात आली होती. पंचायत समितीने सदर गोळा केलेली माहिती शासनाकडे पाठवली होती. ग्रामपंचायत स्तरावर सर्वेक्षणातून ‘अ’ यादी तयार करण्यात आली. त्यानंतर यातूनच ‘ब’ व ‘ड’ अशा दोन प्रकारच्या याद्यांची निवड ग्रामसभेतून करण्यात आली.

दोन हजार लाभार्थींना फटका

तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीमध्ये ‘ब’ घरकुल धारकांची यादी पूर्णत्वाकडे आली आहे. आता ‘ड’ यादीतील लाभार्थींना अनुक्रमे घर मिळायला सुरुवात होणार आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार तयार केलेल्या यादीचे संगणकावर फिल्टर केले. त्यावेळी तालुक्यातील ४ हजार ६४७ लाभधारकांचे आधार कार्ड लिंक झाले नव्हते, तर ८ हजार ६० लाभधारकांनी जॉब कार्ड मॅपिंग केले नाही. २ हजार ५४ लाभार्थींकडे टीव्ही, फ्रीज तसेच पक्के घर असल्याची माहिती पुढे आली आहे.

सरपंच, उपसरपंच बनले आक्रमक

तालुक्यातील सरपंच मंगेश बोबडे, सोनू बोधले, मनोज शिवणकर, विजेंद्र दरवळकर, विश्वेश्वर दिघाडे, माधुरी पंचबुद्धे, स्नेहल कडू, संगीता धोटे, मनीषा रोकडे, छाया गायकवाड, अवधूत दिवे, सत्यभामा कांबळे, ममता राठी, सतीश हजारे, प्रीती पचारे, ज्योत्स्ना निसार, कांचन झेले, रूपेश गुल्हाने, संदीप इंगळे, दुर्गाबक्षसिंह ठाकूर, राजू नेवारे, विशाल जयस्वाल, विशाल भैसे, अलीम पठाण, मुकुंद माहुरे, विशाल बमनोटे या सरपंच, उपसरपंचांनी पंचायत समितीमध्ये धडक देऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

-----------------

घरकुलाच्या ‘ड’ यादीतील दोन हजारांवर घरकुलधारकांची नावे नाकारण्यात आली. सन २०११ च्या जनगणनेनुसार रद्द होण्याची प्रक्रिया आहे. हा शासनाचा निर्णय आहे. यासंदर्भात ६२ ग्रामपंचायतींमधील अनेक निवेदन आले आहेत.

- माया वानखडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, धामणगाव रेल्वे