शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दोन महिन्यात १०८९ नागरिकांना श्वानदंश, रोज १५ ते २० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:29 IST

जिल्हाभरात श्वांनांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जुन व जुलै या दोनच महिन्यात तब्बल १ हजार ८९ श्वानदंशाचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दररोज सरासरी १५ ते २० जणांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाभरात श्वांनांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जुन व जुलै या दोनच महिन्यात तब्बल १ हजार ८९ श्वानदंशाचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दररोज सरासरी १५ ते २० जणांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.अमरावती शहरात पाच हजारांवर श्वान आहेत. जिल्ह्यात ही संख्या १० हजारांवर जाते. वर्षभरात श्वानांनी चावा घेतल्याचे सातशे ते आठशे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. मात्र, जून व जुलै महिन्यात श्वानदंशाच्या घटना अधिकच वाढल्या. दरवर्षी श्वानांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे काही वर्षांपासून जिल्ह्यात श्वानदंशाचे रुग्ण सतत वाढत आहेत. श्वानांनी चावल्याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसला असून, खेळता-खेळता श्वान अचानक अंगावर धावल्याचे आढळून आले. पावसाळ्याच्या दिवसांत श्वान चावल्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. दोन महिन्यात १०८९ जणांना श्वानाने चावा घेतलेले रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात श्वानांनी उच्छाद मांडल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना अ‍ॅन्टी रॅबीज इंजेक्शन देण्यात येत असून, उपचारानंतर रुग्ण बरे झाले आहेत.बाईकस्वार, लहान मुलांच्या जीविताला धोकाअलीकडे श्वानांचे झुंड वराहाचा पिछा करीत त्यांना फस्त करतात. अन्नाच्या कमतरतेमुळे श्वान मास भक्षणाकडे वळल्याचे दिसत आहे. वराह खाणारे श्वान मानवी सानिध्यात राहतात. त्यामुळे श्वान व वराहातील संसर्ग मानवी आरोग्यास घातक ठरू शकतो. त्यातच काही श्वान मोटरसायकलीवर भुंकत पाठलाग करतात. त्यामुळे मोटरसायकलस्वार धूम ठोकतात, अशा स्थितीत लहान मुले खेळत बागडत असताना अपघात होण्याची शक्यता बळावते. या श्वानांचा वावर मुलांच्या जिवाला धोका निर्माण करणारा ठरू शकतो.का चवताळतात श्वानपावसाळ्यात श्वानांचा 'मेटींग सिझन' असतो. सततच्या पावसामुळे श्वानांना खायला अन्न मिळत नाही. त्यातच काही श्वान अन्नाच्या किंवा मेटींगच्या शोधात परिसर बदलतात. अनेकदा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी मोकाट श्वानांना पकडून शहराबाहेर सोडतात. अशा परिस्थितीत श्वान चवताळण्याची शक्यता बळावते. अशाच स्थितीत श्वान मानवी संपर्कात आल्यास तो चावा घेतो.चार श्वानांना 'रॅबीज'गेल्या काही दिवसांत शहरातील वसा संस्थेला रॅबीजचे चार श्वान आढळून आले. त्यांनी याबाबत महापालिकेला माहिती दिली आहे.