शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दोन महिन्यात १०८९ नागरिकांना श्वानदंश, रोज १५ ते २० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:29 IST

जिल्हाभरात श्वांनांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जुन व जुलै या दोनच महिन्यात तब्बल १ हजार ८९ श्वानदंशाचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दररोज सरासरी १५ ते २० जणांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाभरात श्वांनांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जुन व जुलै या दोनच महिन्यात तब्बल १ हजार ८९ श्वानदंशाचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दररोज सरासरी १५ ते २० जणांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.अमरावती शहरात पाच हजारांवर श्वान आहेत. जिल्ह्यात ही संख्या १० हजारांवर जाते. वर्षभरात श्वानांनी चावा घेतल्याचे सातशे ते आठशे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. मात्र, जून व जुलै महिन्यात श्वानदंशाच्या घटना अधिकच वाढल्या. दरवर्षी श्वानांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे काही वर्षांपासून जिल्ह्यात श्वानदंशाचे रुग्ण सतत वाढत आहेत. श्वानांनी चावल्याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसला असून, खेळता-खेळता श्वान अचानक अंगावर धावल्याचे आढळून आले. पावसाळ्याच्या दिवसांत श्वान चावल्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. दोन महिन्यात १०८९ जणांना श्वानाने चावा घेतलेले रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात श्वानांनी उच्छाद मांडल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना अ‍ॅन्टी रॅबीज इंजेक्शन देण्यात येत असून, उपचारानंतर रुग्ण बरे झाले आहेत.बाईकस्वार, लहान मुलांच्या जीविताला धोकाअलीकडे श्वानांचे झुंड वराहाचा पिछा करीत त्यांना फस्त करतात. अन्नाच्या कमतरतेमुळे श्वान मास भक्षणाकडे वळल्याचे दिसत आहे. वराह खाणारे श्वान मानवी सानिध्यात राहतात. त्यामुळे श्वान व वराहातील संसर्ग मानवी आरोग्यास घातक ठरू शकतो. त्यातच काही श्वान मोटरसायकलीवर भुंकत पाठलाग करतात. त्यामुळे मोटरसायकलस्वार धूम ठोकतात, अशा स्थितीत लहान मुले खेळत बागडत असताना अपघात होण्याची शक्यता बळावते. या श्वानांचा वावर मुलांच्या जिवाला धोका निर्माण करणारा ठरू शकतो.का चवताळतात श्वानपावसाळ्यात श्वानांचा 'मेटींग सिझन' असतो. सततच्या पावसामुळे श्वानांना खायला अन्न मिळत नाही. त्यातच काही श्वान अन्नाच्या किंवा मेटींगच्या शोधात परिसर बदलतात. अनेकदा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी मोकाट श्वानांना पकडून शहराबाहेर सोडतात. अशा परिस्थितीत श्वान चवताळण्याची शक्यता बळावते. अशाच स्थितीत श्वान मानवी संपर्कात आल्यास तो चावा घेतो.चार श्वानांना 'रॅबीज'गेल्या काही दिवसांत शहरातील वसा संस्थेला रॅबीजचे चार श्वान आढळून आले. त्यांनी याबाबत महापालिकेला माहिती दिली आहे.