शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ठिबक सिंचनाचे दोन कोटी थकीत

By admin | Updated: April 28, 2017 00:06 IST

तालुक्यातील तालुका कृषी विभागाने शासकीय अनुदानासाठी दोन वर्षांपासून ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानासाठी शासनाकडे

चांदूररेल्वेतील शेतकऱ्यांची व्यथा : शासकीय तिजोरीत ठणठणाट चांदूररेल्वे : तालुक्यातील तालुका कृषी विभागाने शासकीय अनुदानासाठी दोन वर्षांपासून ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यातील कृषिमंत्री विदर्भातील असताना विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. सन २०१४-१५ या कालावधीत ५२९ शेतकऱ्यांचे १ कोटी ३५ लाख ४७ हजार रूपयांचे प्रस्ताव दाखल झाले. त्यातील ३९ लाख ३५ हजारांचे अनुदान प्राप्त झाले असले तरी तब्बल ९६ लाख रूपयांचे अनुदान मात्र तब्बल दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. सन २०१-१६च्या कालावधीत ६६४ शेतकऱ्यांचे १ कोटी ७४ लाख रूपयांच्या अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १५ लाख २० हजार रूपयांचे अनुदान मंजूर झाले. मात्र, १ कोटी ५७ लाख रूपयांच्या ठिबक सिंचन योजनेच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. सन २०१४-१५ व सन २०१५-१६ या दोन वर्षांपासून २ कोटी ५३ लाख रूपये अनुदानाचे प्रस्ताव शासनाकडे धूळखात पडून आहेत. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनुदान देण्यासाठी शासनाच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचे दिसते. शासनाच्या जलशिवार योजनेतून पाणी अडवून प्रत्येक शेतकऱ्याने ठिबक सिंचन योजना कार्यान्वित केल्यानंतर त्याचे अनुदान तत्काळ देण्यात येईल, अशा घोषणा विधिमंडळात व विधिमंडळाबाहेर होत असतात. मात्र, प्रत्यक्षात ठिबक सिंचन योजनेबद्दल प्रचंड उदासीनता असल्याचे दिसते. या योजनेच्या अनुदानासाठी कृषी विभागाकडून मंजुरी घेऊन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे कृषी विभागातील गावनिहाय नियुक्त कर्मचाऱ्यांनीही याची दखल घेतली नाही. कृषी विभागात गावनिहाय कृषी सहायक नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या शेतात बसविलेल्या ठिबक सिंचन संचाची तपासणी करून तसा अंतरिम अहवाल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मागविला जावा, अशीही मागणी शेतकरी करीत आहेत. ठिबक सिंचनामुळे ओलिताच्या क्षेत्रात वाढ होऊन पाण्याच्या अपव्ययाला पायबंद बसला आहे. शासनाकडे ठिबक सिंचन अनुदानासाठी एकूण किती प्रस्ताव प्राप्त झाले आहेत? कोणत्या कारणाने शेतकऱ्याला अनुदान नाकारले, याची माहिती शासनाच्या कृषी विभागाकडून प्रसिद्ध होणे अगत्याचे आहे. शासनाने याची दखल न घेतल्यास शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात जाऊन तीव्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी) शासनाची उदासिनता शेतकऱ्यांच्या मुळावर ठिबक सिंचनाचा वापर केल्याने शेतकऱ्यांचा बराच फायदा होतो. यामुळे ओलिताचे क्षेत्र वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वृद्धी होते. मात्र, ठिबक सिंचनाचे अनुदान देण्याबाबतची शासनाची उदासिनता लक्षात घेता शेतकऱ्यांना या योजनेचा फारसा फायदा होेण्याची चिन्हे नाहीत.