शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

ठिबक सिंचनाचे दोन कोटी थकीत

By admin | Updated: April 28, 2017 00:06 IST

तालुक्यातील तालुका कृषी विभागाने शासकीय अनुदानासाठी दोन वर्षांपासून ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानासाठी शासनाकडे

चांदूररेल्वेतील शेतकऱ्यांची व्यथा : शासकीय तिजोरीत ठणठणाट चांदूररेल्वे : तालुक्यातील तालुका कृषी विभागाने शासकीय अनुदानासाठी दोन वर्षांपासून ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यातील कृषिमंत्री विदर्भातील असताना विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. सन २०१४-१५ या कालावधीत ५२९ शेतकऱ्यांचे १ कोटी ३५ लाख ४७ हजार रूपयांचे प्रस्ताव दाखल झाले. त्यातील ३९ लाख ३५ हजारांचे अनुदान प्राप्त झाले असले तरी तब्बल ९६ लाख रूपयांचे अनुदान मात्र तब्बल दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. सन २०१-१६च्या कालावधीत ६६४ शेतकऱ्यांचे १ कोटी ७४ लाख रूपयांच्या अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १५ लाख २० हजार रूपयांचे अनुदान मंजूर झाले. मात्र, १ कोटी ५७ लाख रूपयांच्या ठिबक सिंचन योजनेच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. सन २०१४-१५ व सन २०१५-१६ या दोन वर्षांपासून २ कोटी ५३ लाख रूपये अनुदानाचे प्रस्ताव शासनाकडे धूळखात पडून आहेत. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनुदान देण्यासाठी शासनाच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचे दिसते. शासनाच्या जलशिवार योजनेतून पाणी अडवून प्रत्येक शेतकऱ्याने ठिबक सिंचन योजना कार्यान्वित केल्यानंतर त्याचे अनुदान तत्काळ देण्यात येईल, अशा घोषणा विधिमंडळात व विधिमंडळाबाहेर होत असतात. मात्र, प्रत्यक्षात ठिबक सिंचन योजनेबद्दल प्रचंड उदासीनता असल्याचे दिसते. या योजनेच्या अनुदानासाठी कृषी विभागाकडून मंजुरी घेऊन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे कृषी विभागातील गावनिहाय नियुक्त कर्मचाऱ्यांनीही याची दखल घेतली नाही. कृषी विभागात गावनिहाय कृषी सहायक नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या शेतात बसविलेल्या ठिबक सिंचन संचाची तपासणी करून तसा अंतरिम अहवाल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मागविला जावा, अशीही मागणी शेतकरी करीत आहेत. ठिबक सिंचनामुळे ओलिताच्या क्षेत्रात वाढ होऊन पाण्याच्या अपव्ययाला पायबंद बसला आहे. शासनाकडे ठिबक सिंचन अनुदानासाठी एकूण किती प्रस्ताव प्राप्त झाले आहेत? कोणत्या कारणाने शेतकऱ्याला अनुदान नाकारले, याची माहिती शासनाच्या कृषी विभागाकडून प्रसिद्ध होणे अगत्याचे आहे. शासनाने याची दखल न घेतल्यास शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात जाऊन तीव्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी) शासनाची उदासिनता शेतकऱ्यांच्या मुळावर ठिबक सिंचनाचा वापर केल्याने शेतकऱ्यांचा बराच फायदा होतो. यामुळे ओलिताचे क्षेत्र वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वृद्धी होते. मात्र, ठिबक सिंचनाचे अनुदान देण्याबाबतची शासनाची उदासिनता लक्षात घेता शेतकऱ्यांना या योजनेचा फारसा फायदा होेण्याची चिन्हे नाहीत.