शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

दोन नायब तहसीलदार सांभाळतात तालुक्याचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

तीन महिन्यापासून तहसीलदारांचे पद रिक्त वरूड : तालुक्यात १४२ गावे, ६६ ग्रामपंचायती आणि दोन नगर परिषदांचा समावेश आहे. ...

तीन महिन्यापासून तहसीलदारांचे पद रिक्त

वरूड : तालुक्यात १४२ गावे, ६६ ग्रामपंचायती आणि दोन नगर परिषदांचा समावेश आहे. २ लाख १७ हजार ७५० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे . परंतु, तहसील कार्यालय तहसीलदारांअभावी सुने पडले आहे. एक तहसील कार्यालय, दोन नायब तहसीलदार कारभार सांभाळतात. तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या तहसीलदाराचे पदावर सक्षम तहसीलदार मिळणार कि नाही अशी मागणी नागरीकातून केल्या जात आहे .

वरूड तालुक्यात १४२ गावे ६६ ग्रामपंचायती आणि दोन नगर परिषदांचा समावेश आहे. २ लाख १७ हजार ७५० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे . १४२ गावांचा समावेश आहे. १०२ आबाद गावे, तर ४० उजाड गावे आहेत. सात राजस्व मंडळ असून, ७ मंडळ अधिकारी , ३५ तलाठी आणि ३९ कोतवाल महसुली कामकाज करतात . तरी सुद्धा महसुली कामाचा भोंगळ कारभार नागरिकाना पाहावयास मिळतो . शेतकऱयांच्या सातबारावर अनेक चुका असल्याने शेतकरी त्रस्त आहे . येरझारा मारून उंबरठे झिजविण्यापलीकडे काहीच होत नाही . देवाणघेवाण केली केली वेळीच काम करण्याची प्रथा आहे . तलाठी वेळेवर कार्यालयात हजर नसल्याने ऐन पेरणीच्या वेळी तलाठी मिळत नाही . अभिलेखात दुरुस्त्या केल्या जात नाही अशी नागरिकांची ओरड आहे . केवळ खाबुगिरीमध्ये तहसील कार्यालयाचा कारभार सुरु असून रेती तस्करीला उधाण आले . तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव प्रलंबित असले तरी रेती चोरट्याना रान मोकळे आहे . काही दलाल तहसील कार्यालयातच ठाण मांडून आपली काम काढून घेतात . वरुड तालुक्याचे शेवटचे गावाचे अंतर हे ३० ते ४० कि मी आहे . येथून येणाऱ्या शेतकरी , विद्यार्थी किंवा सर्वसामान्य नागरिकांना महसुली दाखले , प्रमाणपत्र घ्यायचे असले तर हेलपाटे मारावे लागते . अनेक कर्मचारी , अधिकारी गैरहजर असतात . तर प्रभारी तहसीलदार सुद्धा मुख्यालयी नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात .तहसीलदारांची सेवानिवृत्तीमुळे येथे नायब तहसीलदार नंदकुमार घोडेस्वार यांची प्रभारी तहसीलदार म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे . प्रभारी तहसीलदार हे अमरावती वरून येणे जाणे करतात . प्रशासकीय आणि तालुका दंडाधिकाऱ्याचे पद असल्याने २४ तास मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे . परंतु तहसीलदाराचा कारभार दोन नायबतहसीलदार पाहत असून दिवस वेगळे आणि रात्री वेगळे तहसीलदार अशी अवस्था आहे . यामुळे तहसील कार्यालयावर नियंत्रण राहिले नसून भ्रष्ट्राचाराल खतपाणी घालण्याच्या प्रकाराला आळा कोण घालणार ? हा प्रश्न सर्वसामान्याना पुढे उभा ठाकला आहे . तीन महिन्यापासून रिक्त असलेल्या तहसीलदाराचे पदावर सक्षम तहसीलदार मिळणार कि नाही अशी मागणी नागरीकातून केल्या जात आहे . जिल्हाधिकारी यांनी सक्षम तहसीलदारांची नेमणूक करावी अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे .