शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

दोन नायब तहसीलदार सांभाळतात तालुक्याचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

तीन महिन्यापासून तहसीलदारांचे पद रिक्त वरूड : तालुक्यात १४२ गावे, ६६ ग्रामपंचायती आणि दोन नगर परिषदांचा समावेश आहे. ...

तीन महिन्यापासून तहसीलदारांचे पद रिक्त

वरूड : तालुक्यात १४२ गावे, ६६ ग्रामपंचायती आणि दोन नगर परिषदांचा समावेश आहे. २ लाख १७ हजार ७५० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे . परंतु, तहसील कार्यालय तहसीलदारांअभावी सुने पडले आहे. एक तहसील कार्यालय, दोन नायब तहसीलदार कारभार सांभाळतात. तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या तहसीलदाराचे पदावर सक्षम तहसीलदार मिळणार कि नाही अशी मागणी नागरीकातून केल्या जात आहे .

वरूड तालुक्यात १४२ गावे ६६ ग्रामपंचायती आणि दोन नगर परिषदांचा समावेश आहे. २ लाख १७ हजार ७५० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे . १४२ गावांचा समावेश आहे. १०२ आबाद गावे, तर ४० उजाड गावे आहेत. सात राजस्व मंडळ असून, ७ मंडळ अधिकारी , ३५ तलाठी आणि ३९ कोतवाल महसुली कामकाज करतात . तरी सुद्धा महसुली कामाचा भोंगळ कारभार नागरिकाना पाहावयास मिळतो . शेतकऱयांच्या सातबारावर अनेक चुका असल्याने शेतकरी त्रस्त आहे . येरझारा मारून उंबरठे झिजविण्यापलीकडे काहीच होत नाही . देवाणघेवाण केली केली वेळीच काम करण्याची प्रथा आहे . तलाठी वेळेवर कार्यालयात हजर नसल्याने ऐन पेरणीच्या वेळी तलाठी मिळत नाही . अभिलेखात दुरुस्त्या केल्या जात नाही अशी नागरिकांची ओरड आहे . केवळ खाबुगिरीमध्ये तहसील कार्यालयाचा कारभार सुरु असून रेती तस्करीला उधाण आले . तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव प्रलंबित असले तरी रेती चोरट्याना रान मोकळे आहे . काही दलाल तहसील कार्यालयातच ठाण मांडून आपली काम काढून घेतात . वरुड तालुक्याचे शेवटचे गावाचे अंतर हे ३० ते ४० कि मी आहे . येथून येणाऱ्या शेतकरी , विद्यार्थी किंवा सर्वसामान्य नागरिकांना महसुली दाखले , प्रमाणपत्र घ्यायचे असले तर हेलपाटे मारावे लागते . अनेक कर्मचारी , अधिकारी गैरहजर असतात . तर प्रभारी तहसीलदार सुद्धा मुख्यालयी नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात .तहसीलदारांची सेवानिवृत्तीमुळे येथे नायब तहसीलदार नंदकुमार घोडेस्वार यांची प्रभारी तहसीलदार म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे . प्रभारी तहसीलदार हे अमरावती वरून येणे जाणे करतात . प्रशासकीय आणि तालुका दंडाधिकाऱ्याचे पद असल्याने २४ तास मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे . परंतु तहसीलदाराचा कारभार दोन नायबतहसीलदार पाहत असून दिवस वेगळे आणि रात्री वेगळे तहसीलदार अशी अवस्था आहे . यामुळे तहसील कार्यालयावर नियंत्रण राहिले नसून भ्रष्ट्राचाराल खतपाणी घालण्याच्या प्रकाराला आळा कोण घालणार ? हा प्रश्न सर्वसामान्याना पुढे उभा ठाकला आहे . तीन महिन्यापासून रिक्त असलेल्या तहसीलदाराचे पदावर सक्षम तहसीलदार मिळणार कि नाही अशी मागणी नागरीकातून केल्या जात आहे . जिल्हाधिकारी यांनी सक्षम तहसीलदारांची नेमणूक करावी अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे .