शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस सार्वत्रिक पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:28 IST

येत्या ५ जूनपर्यंत जिल्ह्यात सार्वत्रिक व काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. तीन दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व शिवारात खरिपाच्या पेरणीची लगबग वाढली आहे.

ठळक मुद्देहवामानतज्ज्ञांची माहिती : शेतकऱ्यांना दिलासा, पेरणीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येत्या ५ जूनपर्यंत जिल्ह्यात सार्वत्रिक व काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. तीन दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व शिवारात खरिपाच्या पेरणीची लगबग वाढली आहे.उत्तर छत्तीसगडवर ठळक कमी दाबाचे क्षेत्र आहे तसेच याच्याशी संबधित चक्राकार वारे ७.९ किमी उंचीवर वाहत आहेत. ते आता दक्षिणेकडे झुकले आहेत. त्याच्या प्रभावामुळे विदर्भात मंगळवारी बहुतेक ठिकाणी मध्यम ते भारी पावसाची नोंद झाली. बुधवारीही जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस कोसळला. ही स्थिती ५ तारखेपर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतर पाऊस कमी होऊन ८ जूनपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार असल्याचे बंड यांनी सांगितले.सातपुड्याच्या उत्तरेला असणाºया किमान विदर्भाच्या भौगोलिक क्षेत्राएवढ्या ढगामुळे विदर्भात बहुतेक ठिकानी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. मात्र, हा ढग दक्षिणेकडे सरकल्याचा फायदा पूर्व व दक्षिण विदर्भाला झाला. अमरावती जिल्हा हा रविवारी, सोमवारी कोरडाच राहिला. मुंबई येथे होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अरबी समुद्रावरुन येणारा ढगाचा पुरवठा कमी झाला. यामुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणीच पावसाची नोंद झाली होती. आता बुधवारपासून तीन दिवस पावसाची रिपरिप राहणार आहे.रेल्वे गाड्या रद्दमुंबईत जोरदार पाऊस बरसत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून नागपूरकडे येणाºया चार रेल्वे गाड्या बुधवारी रद्द झाल्या. भुसावळ, नागपूर व हावडाकडे जाणाºया प्रवाशांवर प्रवास रद्द करण्याचा प्रसंग ओढवला. मुंबई-हावडा मेल, कुर्ला-हावडा शालीमार एक्स्प्रेस, मुंबई-हावडा सुपर डिलक्स आणि दादर-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. त्यामुळे मुंबई, दादर येथून या चारही रेल्वे गाड्यांचे आरक्षण रद्द झाले. बुधवारी हावडा मार्गे या गाड्यांचे आरक्षण रद्द करून प्रवास थांबवावा लागला. तथापि, गोंंिदया येथून सुटणारी विदर्भ एक्स्प्रेस ही नागपूर रेल्वे स्थानकाहून बुधवारी वेळेत आणि अंबा एक्स्प्रेस देखील मुंबईकडे नियमित वेळेत सोडण्यात आली.