शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

पालिकेला विशेष रस्ता निधीचे दोन कोटी रुपये मंजूर

By admin | Updated: March 12, 2016 00:19 IST

नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी नगराध्यक्ष मनीषा नांगलिया व सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग,

नगराध्यक्ष नांगलियांचा प्रयत्नांना यश : शहर विकासाला मिळणार गती चांदुर बाजार : नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी नगराध्यक्ष मनीषा नांगलिया व सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग, मुंबई यांच्याकडून विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत दोन कोटी निधी मंजूर झाला आहे. यामुळे रडखलेल्या विकासाला गती मिळणार आहे. चांदूरबाजार नगरपालिकेला गेल्या तीन वर्षांपासून रस्ता अनुदानच प्राप्त न झाल्याने शहरातील अनेक विकासकामे रखडलेली होती. पालिकेला २०१३-१४ साली फक्त ७९ हजार रुपये, सन २०१४-१५ साली १.१० लक्ष रुपये इतके नाममात्र रस्ता अनुदान मिळाले आहे. त्यामुळ शहराचा विकास खुंटला होता. याची गंभीर दखल होत नगराध्यक्षा मनीषा नांगलिया व सत्तारुढ होता. याची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा मनीषा नांगलिया व सत्तारुढ नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांचाकडे प्रश्न रेटून धरला होता. पालिकेकडे पूर्वीचे १ कोटींची कामे करूनही निधी उपलब्ध नसल्याने कंत्राटदारांची देयके थकीत होती. शहरात एक कोटीची कामे नव्याने सुचविल्याने रस्ता अनुदान योजने अंतर्गत पालिकेला २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.नगराध्यक्षा मनीषा नांगलीया यांनी ३१ डिसेंबर रोजी पालिकेला विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. २४ जानेवारी २०१६ रोजी नगरविकास मंत्री रणजिीा पाटील यांनी पालिकेला दिलेल्या भेटीदरम्यान पालिकेचे नगरसेवक गोपाल तिरमारे, नितीन कोरडे, भैयासाहेब लंगोटे, विशाल तायवाडे, एजाज अली, लविणा अकोलाकर, सुषमा बर्वे, मीनाक्षी औतकर यांनी विशेष मागणी केली होती. त्याची फलश्रृती म्हणून पालिकेला २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची विशेष फलश्रृती मिळाली. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत १ कोटी रुपये निधी पालकंमत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने पालिकेला १७ फेब्रुवारी २०१६ ला मंजूर करण्यात आल्याने शहरातील खुंटलेल्या विकासाला गती मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)चार वर्षांपासून शहरातील प्रलंबित विकासकामे या निधीमुळे मार्गी लागणार आहे. तसेच नागरिकांच्या हिताचे निर्णय मी व माझे सहयोगी नगरसेवक घेऊन शहराच्या विकासाकरिता सर्वोतेपरी प्रयत्न करू. - मनीष नांगलिया, नगराध्यक्षा, चांदूरबाजारपालिकेला शासनातर्फे मिळालेल्या निधीचा शहर विकासाकरिता योग्य वापर व्हावा. पूर्वीच्या रस्त्यांनी सुद्धा मोकळा श्वास घ्यावा, याकरिता नगराध्यक्षासह नगरसेवकांनी प्रयत्न करावा.- दत्तात्रेय किटुकले, नागरिक.