शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

जिल्ह्यात अडीच हजार शाळा होणार सुरू शहरात आठवी, ग्रामीणमध्ये पाचवीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

शहरी भागात मात्र पालक व विद्यार्थी दोघांचेही मन खट्टू झाले. कारण मुलगा अभ्यास करीत नाही, ही भुणभुण पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी शाळा सुरू न झाल्यामुळे सहन करावी लागणार आहे. दुसरीकडे नवप्रवेशितांना यंदाही आपल्या शाळेची इमारत पाहायला मिळणार नाही. त्यांच्या हातातील मोबाईल ऑनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून कायम राहणार असल्याने पालकांचेही टेन्शन वाढले आहे. कधी हा कोरोना जातो, असे त्यांना झाले आहे. 

धीरेंद्र चाकोलकर लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागात पाचवीपासून, तर शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू करण्याचे शासनाचे आदेश धडकताच विद्यार्थ्यांमध्ये आनंदच व्यक्त करण्यात आला. कारण दोन वर्षांपासून ‘ढकलगाडी’ने वरच्या वर्गात जात असले तरी त्यांच्या जिवाभावाचे सोबती, वर्गमित्र यांची भेट दुरावली होती. शहरी भागात मात्र पालक व विद्यार्थी दोघांचेही मन खट्टू झाले. कारण मुलगा अभ्यास करीत नाही, ही भुणभुण पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी शाळा सुरू न झाल्यामुळे सहन करावी लागणार आहे. दुसरीकडे नवप्रवेशितांना यंदाही आपल्या शाळेची इमारत पाहायला मिळणार नाही. त्यांच्या हातातील मोबाईल ऑनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून कायम राहणार असल्याने पालकांचेही टेन्शन वाढले आहे. कधी हा कोरोना जातो, असे त्यांना झाले आहे.  

पालकांची संमती आवश्यक शाळा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य केलेली नाही. शालेय साहित्याव्यतिरिक्त केवळ मास्क, सॅनिटायझर हेच शाळेत आणण्याची परवानगी आहे. त्याव्यतिरिक्त संक्रमणाचे साधन होऊ शकणाऱ्या वस्तू टाळण्याचे निर्देश आहेत. 

शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने त्या दिशेने तयारी होत आहे. पालकांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागात पाचवीपासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येतील.  - ई. झेड. खान, शिक्षणाधिकारी

माझा मुलगा पाचवीनंतर आता थेट सातवीत शाळेत जाईल. मध्यंतरी घरीच राहत असल्याने त्याला मजुरांअभावी शेतीची कामात कामात सोबत घ्यावे लागले. आता तो शिक्षणासाठी कष्ट घेईल. त्यासाठी शालेय साहित्यासह मास्क, सॅनिटायझर घेतले आहे.  विजय बोरकर, काजना

कोरोना संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे शहरी भागातदेखील पाचवीपासून शाळा सुरू व्हायला हवी होती. मुले आता ऑनलाईन क्लास आणि ट्यूशनच्या भरवशावर जेवढा होईल तेवढा अभ्यास करतात. मात्र, त्यांना कितपत समजते, हे कळणे अशक्य आहे. आता शाळा बंद राहण्यास दोन वर्षांचा कालावधी लोटला. या कालावधीत मित्र दुरावले. मोबाईलमुळे मुलांमध्ये एकांगी अवस्था आली आहे.अजय भगत, साईनगर

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या