शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जिल्ह्यात अडीच हजार शाळा होणार सुरू शहरात आठवी, ग्रामीणमध्ये पाचवीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

शहरी भागात मात्र पालक व विद्यार्थी दोघांचेही मन खट्टू झाले. कारण मुलगा अभ्यास करीत नाही, ही भुणभुण पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी शाळा सुरू न झाल्यामुळे सहन करावी लागणार आहे. दुसरीकडे नवप्रवेशितांना यंदाही आपल्या शाळेची इमारत पाहायला मिळणार नाही. त्यांच्या हातातील मोबाईल ऑनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून कायम राहणार असल्याने पालकांचेही टेन्शन वाढले आहे. कधी हा कोरोना जातो, असे त्यांना झाले आहे. 

धीरेंद्र चाकोलकर लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागात पाचवीपासून, तर शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू करण्याचे शासनाचे आदेश धडकताच विद्यार्थ्यांमध्ये आनंदच व्यक्त करण्यात आला. कारण दोन वर्षांपासून ‘ढकलगाडी’ने वरच्या वर्गात जात असले तरी त्यांच्या जिवाभावाचे सोबती, वर्गमित्र यांची भेट दुरावली होती. शहरी भागात मात्र पालक व विद्यार्थी दोघांचेही मन खट्टू झाले. कारण मुलगा अभ्यास करीत नाही, ही भुणभुण पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी शाळा सुरू न झाल्यामुळे सहन करावी लागणार आहे. दुसरीकडे नवप्रवेशितांना यंदाही आपल्या शाळेची इमारत पाहायला मिळणार नाही. त्यांच्या हातातील मोबाईल ऑनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून कायम राहणार असल्याने पालकांचेही टेन्शन वाढले आहे. कधी हा कोरोना जातो, असे त्यांना झाले आहे.  

पालकांची संमती आवश्यक शाळा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य केलेली नाही. शालेय साहित्याव्यतिरिक्त केवळ मास्क, सॅनिटायझर हेच शाळेत आणण्याची परवानगी आहे. त्याव्यतिरिक्त संक्रमणाचे साधन होऊ शकणाऱ्या वस्तू टाळण्याचे निर्देश आहेत. 

शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने त्या दिशेने तयारी होत आहे. पालकांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागात पाचवीपासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येतील.  - ई. झेड. खान, शिक्षणाधिकारी

माझा मुलगा पाचवीनंतर आता थेट सातवीत शाळेत जाईल. मध्यंतरी घरीच राहत असल्याने त्याला मजुरांअभावी शेतीची कामात कामात सोबत घ्यावे लागले. आता तो शिक्षणासाठी कष्ट घेईल. त्यासाठी शालेय साहित्यासह मास्क, सॅनिटायझर घेतले आहे.  विजय बोरकर, काजना

कोरोना संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे शहरी भागातदेखील पाचवीपासून शाळा सुरू व्हायला हवी होती. मुले आता ऑनलाईन क्लास आणि ट्यूशनच्या भरवशावर जेवढा होईल तेवढा अभ्यास करतात. मात्र, त्यांना कितपत समजते, हे कळणे अशक्य आहे. आता शाळा बंद राहण्यास दोन वर्षांचा कालावधी लोटला. या कालावधीत मित्र दुरावले. मोबाईलमुळे मुलांमध्ये एकांगी अवस्था आली आहे.अजय भगत, साईनगर

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या