शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

दोनदा भूमिपूजन, काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:40 IST

शहरासाठी वीजवितरण व्यवस्था सोयीची व्हावी, यासाठी ३३ के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात आले होते. शासकीय शिरस्त्यानुसार या कामाचे रीतसर ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी याच कामाचे आमदारांनीही भूमिपूजन केले. तरीही या ३३ के.व्ही. उपकेंद्राचे काम मार्गी लागलेले आहे.

ठळक मुद्दे३३ केव्ही उपकेंद्र अधांतरी : जबाबदारी ऊर्जामंत्र्यांची की आमदारांची? नागरिकांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : शहरासाठी वीजवितरण व्यवस्था सोयीची व्हावी, यासाठी ३३ के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात आले होते. शासकीय शिरस्त्यानुसार या कामाचे रीतसर ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी याच कामाचे आमदारांनीही भूमिपूजन केले. तरीही या ३३ के.व्ही. उपकेंद्राचे काम मार्गी लागलेले आहे.तालुक्यात २०१७ मध्ये दोन ३३ के.व्ही.ची विद्युत उपकेंद्र मंजूर झाले होते. यात चांदूरबाजार शहरासाठी एक व ब्राम्हणवाडा पाठक परिसरासाठी एक अशा दोन उपकेंद्रांचा समावेश होता. या दोन्ही उपकेंद्रांचे भूमिपूजन १९ आॅगस्ट २०१७ ला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर तब्बल शंभर दिवसांनी याच कामाचे भूमिपूजन आ. बच्चू कडू यांनी केले. अशाप्रकारे या दोन्ही उपकेंद्रांना दोनदा भूमिपूजनाचा मान मिळाला.आमदारांच्या भूमिपूजनानंतर या दोन्ही ठिकाणी कामाला सुरूवात झाली. ब्राम्हणवाडा पाठक येथील उपकेंद्राचे काम आज पूर्ण होण्याच्या स्थितीत आले आहे; मात्र भूमिपूजनाला एक वर्ष पूर्ण होऊनही चांदूरबाजारच्या उपकेंद्राचे काम ठप्प आहे. कंत्राटदाराने फक्त प्लिंथ बांधून काम अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे चांदूरबाजार उपकेंद्राचे काम अर्धवट राहण्यास कोण जबाबदार, ऊर्जामंत्री की आमदार, असा सवाल नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी उपस्थित केला आहे.चांदूरबाजारला होणारे ३३ के.व्ही.चे उपकेंद्र शहराच्या वीज पुरवठ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. परंतु, त्याचे काम बंद पडले आहे. या उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. यासाठी मी १ आॅगस्टला ऊर्जामंत्र्यांना, मंत्रालयात जाऊन विनंती पत्र दिले. काम पुन्हा सुरू होण्याचे आदेश केव्हा धडकतात, याची प्रतीक्षा आहे.- गोपाल तिरमारे,नगरसेवक, चांदूरबाजार.३३ के.व्ही.चे उपकेंद्राचे बांधकाम मोर्शी उपविभागाच्या अखत्यारित येते. त्यामुळे त्यांच्याकडून काम बंद का पडले, याबाबत फारशी माहिती नाही. सध्या या बांधकाम स्थळावरील काम ठप्प पडले आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे चौकशी करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.- विपुल बन्नोरे,शहर अभियंता, महावितरण.