शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

अचलपूर तालुक्यात संत्रागळतीने अडीचशे कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:13 IST

निसर्ग कोपल्याचा थेट फटका अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अचानक बदललेल्या तापमानामुळे संत्राझाडे वाळत आहेत. संत्र्याचीही फळगळ झाली आहे. परिणामी येथून दररोज देश-विदेशात संत्री नेणारे १०० ट्रकची संख्या रोडावून २५ ते ३० वर आली आणि त्यातून तब्बल २५० कोटी पेक्षा अधिक रकमेचा फटका बळीराजाला बसला. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देनिसर्ग कोपला : अडीच लाखांचा बगिचा १५ हजारांत विकला

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : निसर्ग कोपल्याचा थेट फटका अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अचानक बदललेल्या तापमानामुळे संत्राझाडे वाळत आहेत. संत्र्याचीही फळगळ झाली आहे. परिणामी येथून दररोज देश-विदेशात संत्री नेणारे १०० ट्रकची संख्या रोडावून २५ ते ३० वर आली आणि त्यातून तब्बल २५० कोटी पेक्षा अधिक रकमेचा फटका बळीराजाला बसला. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सर्वाधिक फटका संत्राउत्पादक शेतकºयांना बसला आहे. संत्र्याच्या आंबिया बहरावर देवाण-घेवाण, वर्षभराचा खर्च, कर्जफेड आदी अपेक्षा बाळगून असलेल्या संत्राउत्पादक शेतकºयांच्या नशिबी मोठी निराशा आली आहे. लाखोंची संत्री जळून जमिनीवर आल्याने मातीमोल झाली.अचलपूर तालुक्यात ६० हून अधिक खेड्यांमध्ये संत्राउत्पादक आहेत. ११ हजार ५४० हेक्टरवर संत्राबागा आहेत. मल्हारा, गौरखेडा, धामणगाव गढी, धोतरखेडा, हनवतखेडा, मुरादपूर, एकलासपूर, शहापूर, हरम, टवलार, पथ्रोट, सालेपूर, पांढरी, सावळी आदी गावांमध्ये यंदा स्थिती विपरीत आहे.लाखोंचा माल हजारात गेलाअचलपूर तालुक्यातील जवळपास ९० टक्के संत्राउत्पादक शेतकरी आंबिया बहर घेतात. यंदा मात्र लाखो रुपयांची संत्री महिनाभराच्या दमट तापमानाने गळाली. अचलपूर येथील संत्राउत्पादक शेतकरी सुधीर डकरे यांना अडीच लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना, त्यांना १५ हजारांत संत्री विकावी लागली. नितीन डकरे यांना सहा लाखांची संत्री ९८ हजारांत विकावा लागला. वर्षभराचा खर्च दीड लाख रुपये असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चमक येथील संजय चरोडेसह इतरही शेतकºयांची व्यथा वेगळी नाही.गतवर्षी ३० रुपये किलो संत्री होती. यावर्षी मात्र २० ते २२ रुपये भाव मिळाला. गतवर्षी तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक संत्री विविध राज्यांसह विदेशात पाठविली होती. फळगळतीने यावर्षी फटका बसला आहे.- राजेंद्र गोरले, संत्राउत्पादक तथा व्यापारी, अचलपूररायझोक्टोनिया व हायटोफोराचे आक्रमण परतवून लावण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांना बोलावून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले. अपुºया पावसामुळेच सर्वाधिक नुकसान झाले आहे.प्रफुल्ल सातवतालुका कृषी अधिकारी