शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर तालुक्यात संत्रागळतीने अडीचशे कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:13 IST

निसर्ग कोपल्याचा थेट फटका अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अचानक बदललेल्या तापमानामुळे संत्राझाडे वाळत आहेत. संत्र्याचीही फळगळ झाली आहे. परिणामी येथून दररोज देश-विदेशात संत्री नेणारे १०० ट्रकची संख्या रोडावून २५ ते ३० वर आली आणि त्यातून तब्बल २५० कोटी पेक्षा अधिक रकमेचा फटका बळीराजाला बसला. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देनिसर्ग कोपला : अडीच लाखांचा बगिचा १५ हजारांत विकला

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : निसर्ग कोपल्याचा थेट फटका अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अचानक बदललेल्या तापमानामुळे संत्राझाडे वाळत आहेत. संत्र्याचीही फळगळ झाली आहे. परिणामी येथून दररोज देश-विदेशात संत्री नेणारे १०० ट्रकची संख्या रोडावून २५ ते ३० वर आली आणि त्यातून तब्बल २५० कोटी पेक्षा अधिक रकमेचा फटका बळीराजाला बसला. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सर्वाधिक फटका संत्राउत्पादक शेतकºयांना बसला आहे. संत्र्याच्या आंबिया बहरावर देवाण-घेवाण, वर्षभराचा खर्च, कर्जफेड आदी अपेक्षा बाळगून असलेल्या संत्राउत्पादक शेतकºयांच्या नशिबी मोठी निराशा आली आहे. लाखोंची संत्री जळून जमिनीवर आल्याने मातीमोल झाली.अचलपूर तालुक्यात ६० हून अधिक खेड्यांमध्ये संत्राउत्पादक आहेत. ११ हजार ५४० हेक्टरवर संत्राबागा आहेत. मल्हारा, गौरखेडा, धामणगाव गढी, धोतरखेडा, हनवतखेडा, मुरादपूर, एकलासपूर, शहापूर, हरम, टवलार, पथ्रोट, सालेपूर, पांढरी, सावळी आदी गावांमध्ये यंदा स्थिती विपरीत आहे.लाखोंचा माल हजारात गेलाअचलपूर तालुक्यातील जवळपास ९० टक्के संत्राउत्पादक शेतकरी आंबिया बहर घेतात. यंदा मात्र लाखो रुपयांची संत्री महिनाभराच्या दमट तापमानाने गळाली. अचलपूर येथील संत्राउत्पादक शेतकरी सुधीर डकरे यांना अडीच लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना, त्यांना १५ हजारांत संत्री विकावी लागली. नितीन डकरे यांना सहा लाखांची संत्री ९८ हजारांत विकावा लागला. वर्षभराचा खर्च दीड लाख रुपये असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चमक येथील संजय चरोडेसह इतरही शेतकºयांची व्यथा वेगळी नाही.गतवर्षी ३० रुपये किलो संत्री होती. यावर्षी मात्र २० ते २२ रुपये भाव मिळाला. गतवर्षी तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक संत्री विविध राज्यांसह विदेशात पाठविली होती. फळगळतीने यावर्षी फटका बसला आहे.- राजेंद्र गोरले, संत्राउत्पादक तथा व्यापारी, अचलपूररायझोक्टोनिया व हायटोफोराचे आक्रमण परतवून लावण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांना बोलावून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले. अपुºया पावसामुळेच सर्वाधिक नुकसान झाले आहे.प्रफुल्ल सातवतालुका कृषी अधिकारी