शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

मेळघाटातील बारा गावांचा संपर्क तुटणार

By admin | Updated: June 1, 2017 00:16 IST

मान्सूनपूर्वी मेळघाटातील रस्ते व सुविधांचा आढावा नवसंजीवनी बैठकीत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

प्रशासनाचे दुर्लक्ष : हतरू ते कारंजखेडा रस्ता वाऱ्यावर, देखभाल कोण करणार ?लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मान्सूनपूर्वी मेळघाटातील रस्ते व सुविधांचा आढावा नवसंजीवनी बैठकीत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. मात्र, तालुक्यातील कारंजखेडा ते हतरूचा रस्ता पूर्णत: नादुरुस्त असल्याने वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मेळघाटातील तब्बल बारा आदिवासी खेड्यांतील हजारो आदिवासींचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे हा रस्ता कुठल्या विभागाकडेच नसल्याने पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती केव्हा होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. २२ खेड्यांत स्वातंत्र्यानंतरसुद्धा वीजपुरवठा पोहचला नाही. तर रस्त्याअभावी कुपोषित बालकांसह रुग्णांना रस्त्यातच जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पुन्हा सात दिवसांनी सुरू होणाऱ्या मान्सूनच्या धो-धो कोसळणाऱ्या सरींमुळे बारा गावांचा संपर्क तुटणार आहे. याच मार्गानी सुमिता गावानजीकचा पूल पुर्णत: नादुरुस्त असल्यामुळे तो पहिल्याच पावसात वाहून जाण्याची भीती नागरिकांनी वर्तविली आहे. ही आहेत १२ गावेकांजरखेडा ते हतरुचे अंतर सहा किलोमीटर आहे. हतरु येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर हा रस्ता पूर्णत: नादुरुस्त झाला आहे. परिणामी हतरू आणि पलिकडे असलेल्या सिमोरी, सरोवारखेडा, बोराट्याखेडा व लगतच्या मध्यप्रदेशातील गावांचा संपर्क तुटणार आहे. याच मार्गावर दोन वर्षांपूर्वी जवळपास एक कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला पूल खचल्याने पावसात तोसुद्धा वाहून जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. तर रस्ता पूर्णत: नादुरुस्त झाला आहे. रस्ता कुणाचा, यंत्रणांचे हात वर ?सेमाडोह, रायपूर, हतरू ते कारंजखेडा या मार्गे एकूण ४३ किलोमीटर अंतर आहे. एक वर्षापूर्वीपर्यंत जिल्हापरिषदेचे बांधकाम विभागामार्फत याची देखरेख, दुरुस्ती करण्यात येत होती. मात्र, गतवर्षी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत हा रस्ता हस्तांतरीत करण्यात आला. जिल्हापरिषदेने या रस्त्यावर आता कुठलाच खर्च किंवा दुरुस्ती करू नये, असे पत्र मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यालयाने दिल्याने आता या रस्त्यांचा मालक कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारंजखेडा ते हतरू रस्ता पूर्णत: नादुरुस्त झाला आहे. पावसाळ्यात किमान बारा गावांचा संपर्क तुटणार असून, सुमिता गावाचा पुलसुद्धा वाहून जाण्याच्या स्थितीमध्ये आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.- नानकराम ठाकरे, उपसभापती, पं.स. चिखलदरासेमाडोह ते रायपूर हतरू कारंजखेडा हा मुख्य रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गतवर्षी जि.प. बांधकाम विभागाकडून हस्तांतरित करण्यात आला आहे. यावर खर्च करू नये, असे पत्र संबंधित विभागाने दिले आहे.- मिलींद भेंडे, शाखा अभियंता, जि.प. बांधकाम विभागमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २६ कोटी ५० लक्ष रुपये खर्चुन सिमेंट रस्ता होणार आहे. मात्र रस्ता हस्तांतरित झाल्याचा प्रस्ताव न आल्याने तीस किलोमीटर रस्त्याच्या तीन टप्प्यांतील निविदा थांबल्या आहेत. - अरविंद गावंडे, उपअभियंता, पीएमजेएसवाय