शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

तूर केंद्रांची मुदत संपली

By admin | Updated: June 11, 2017 00:01 IST

केंद्र शासनाने मुदतवाढ दिलेल्या बाजार हस्तक्षेप योजनेची मुदत शनिवार १० जून रोजी संपल्याने शेतकऱ्यामसमोर नवे संकट उभे ठकले आहे.

चार लाख क्विंटल पडून : टोकन दिलेल्या २० हजार शेतकऱ्यांची खरेदी केव्हा?लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती-केंद्र शासनाने मुदतवाढ दिलेल्या बाजार हस्तक्षेप योजनेची मुदत शनिवार १० जून रोजी संपल्याने शेतकऱ्यामसमोर नवे संकट उभे ठकले आहे.पूर्वीच्या आदेशाने फक्त बाजार समिती यार्डातील ३१ मे पर्यतची आवक असलेली तूर खरेदी करण्यात येत आहे, सध्या पाच केंद्रांवरील तूर खरेदी संपली व उर्वरित केंद्रांवरील दोन दिवसात संपणार आहे. त्यामुळे टोकन दिलेल्या २० हजार शेतकऱ्यांची चार लाख ३९ हजार ७७८ क्विंटल तुरीची खरेदी केव्हा, हा प्रश्न कायम आहे.जिल्ह्यासह राज्यात १० मेपासून केंद्र शासनाव्दारा पीएसएस योजनेद्वारे तूर खरेदी करन्यात आली.मात्र ही तूर खरेदी २६ मे रोजी बंद करण्यात आली.त्यामूळे राज्य शासनाचे वतीने बाजार हस्तक्षेप योजनेव्दारे खरेदी सुरू करण्यात आली, मात्र ही मुदत देखील ३१ मे रोजी संपल्याने लाखो व्किंटल तूर केंद्रांवर पडून होती. यामूळे शेतकरी संतप्त झाले.अखेर शासमाला उपरती झाली. राज्य शासनाव्दारा केंद्राला विंनती केल्यामुळे सर्व तूर खरेदी केंद्रांना १० जूनपर्यत मुदतवाढ देण्यात आली होती. शेतकऱ्यांवर नवे संकटअमरावती : या कालावधीत ३१ मे पूर्वी यार्डात असलेली तूर खरेदी व्हायची आहे. सद्यस्थितीत अंजनगाव, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, धारणी व तिवसा केंद्रावरील तूर खरेदी करण्यात आली. अद्याप उर्वरित केंद्रांवरील व टोकन दिलेल्या मात्र शेकऱ्यांच्या घरी असलेल्या ४,३९,७७८ क्विंटल तुरीची खरेदी व्हायची आहे. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावर पीएसएस योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच २७ मे पासुन आतापर्यत ९,३१० शेतकऱ्यांची १,७२,७०८ क्विंटल करण्यात आली. यामध्ये अचलपूर केंद्रावर २४,९९९ व्किंटल, अमरावती केंद्रावर २०,३१६ क्विंटल, अंजनगाव केंद्रावर १४,३९८ क्विंटल, चांदूर बाजार १२,२९२, चांदूर रेल्वे केंद्रावर ३३,९७२ क्विंटल, दर्यापूर केंद्रावर ७४,०५६ क्विंटल, धामणगाव केंद्रावर १६,०४३ क्विंटल, धारणी केंद्रावर १,१६४ क्विंटल, मोर्शी केंद्रावर ३८,९३१ व्किंटल, तिवसा केंद्रावर २१,४७३ क्विंटल, व वरूड केंद्रावर ७,७८० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. सद्यस्थितीत १२ ही तूर खरेदी केंद्रावर १९,७९५ शेतकऱ्यांची ४,३९,७७८ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. मृगास सुरूवात झालेली आहे. या पाश्वभूमीवर शेतीचे कामे करावी की तूर खरेदीचे आदेशाची प्रतीक्षा करावी, या विवंचनेत शेतकरी आहे. अशी आहे केंद्रनिहाय तूर खरेदी बाकीसद्यस्थितीत जिल्ह्यातील १२ केंद्रावर १९,७१५ शेतकऱ्यांची ४,३९,७७८ क्विंटल यूर खरेदी बाकी आहे. यामध्ये अचलपूर केंद्रावर १,७९५ शेतकऱ्यांची ३७,१५२ क्विंटल, अमरावती केंद्रावर ३,९७० शेतकऱ्यांची १,१९,९३० व्किंटल, अंजनगाव केंद्रावर २,१४० शेतकऱ्यांची ३५,६०७ क्विंटल, चांदूरबाजार केंद्रावर १,२३३ शेतकऱ्यांची २३,५११ क्विंटल, चांदूर रेल्वे केंद्रावर १,७६९ शेतकऱ्यांची ३३,९७२ क्विंटल, दर्यापूर केंद्रावर २,७३८ शेतकऱ्यांची ७४,०५६ क्विंटल, धामणगाव केंद्रावर ६४८ शेतकऱ्यांची १,६०,४३ क्विंटल, धारणी केंद्रावर ८४ शेतकऱ्यांची १,१६४ क्विंटल, मोर्शी केंद्रावर १,९८७ शेतकऱ्यांची ३८,१५४ क्विंटल, नांदगाव केंद्रावर १,९८७ शेतकऱ्यांची ३८,१५४ क्विंटल, तिवसा केंद्रावर ९४६ शेतकऱ्यांची २१,४७३ क्विंटल, तर वरूड केंद्रावर ५६१ शेतकऱ्यांची ७,७८० क्विंटल तूर खरेदी व मोजणी व्हायची आहे. यासाठी पुन्हा शासनाचे आदेश लागणार आहे. अन्यथा ही तूर खरेदीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या घरी पडून राहणार आहे. बाजार समित्यांच्या आवारात ३१ मे पूर्वी जी तूर नोंद करण्यात आली ती तूर मुदती पश्चातही खरेदी करण्यात येणार आहे. अद्याप केंद्राला मुदतवाढीचे आदेश प्राप्त नाहीत.- अशोक देशमुख,जिल्हा मार्केटिंग अधिकारीटोकन दिलेल्या २१ हजार शेतकऱ्यांची साडेचार लाख क्विंटल तुरीची खरेदी बाकी असल्याचा अहवाल शासनाला पाठविला आहे. मुदतवाढ मिळण्याच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. - गौतम वालदे,जिल्हा उपनिबंधक