शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

दवामुळे तूर पीक संकटात; शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:08 IST

सरते वर्ष शेतकऱ्यांसाठी दु:खदायीच : हंगामातील सर्वच पिकांची परिस्थिती सारखी गोपाल डहाके मोर्शी : यावर्षीच्या हंगामातील सर्वच पिकांची ...

सरते वर्ष शेतकऱ्यांसाठी दु:खदायीच : हंगामातील सर्वच पिकांची परिस्थिती सारखी

गोपाल डहाके

मोर्शी : यावर्षीच्या हंगामातील सर्वच पिकांची परिस्थिती एकसारखी असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेसह अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सन २०२० हे वर्ष शेतकऱ्यांसाठी संकटमय ठरल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.

या परिसरातील शिवारांमध्ये साधारणत: कपाशी, मूग, उडीद, तूर, हरभरा, सोयाबीन, मका, ज्वारी यासह पालेभाज्यांमध्ये मिरची, कोबी, कांदा, सांभार, मेथी, पालक, मुळा, वांगे, तर फळांमध्ये संत्रा, मोसंबी, सीताफळ, रामफळ, पपई इत्यादी पिके घेतली जातात. परंतु या हंगामातील सर्वच पिकांवर नैसर्गिक आपत्ती आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला गेला. खरिपाचे शेवटचे पीक असलेल्या तुरीवर शेतकऱ्यांची मदार असताना त्यावर दवसदृश स्थिती असल्यामुळे शेतातील उभे पीकच पिवळे पडून वाळू लागले आहे. परिणामी शेतकरी रडकुंडीस आला आहे.

यावर्षीच्या हंगामात संत्रा फळगळतीसह अतिपावसामुळे सुरुवातीचे मुंग व उडीद पीक हातचे गेले. सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने आर्थिक अरिष्ट कोसळले. कपाशीवर बोंडअळी व खोडकिडीचे आक्रमण झाले. दसरा दिवाळीच्या मोसमात ऐनवेळी सोयाबीन या रोखीच्या पिकाने दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी जेमतेम झाली. त्यानंतर रोखीचे पीक म्हणून कापसावर मदार होती. यावर बोंडअळी व बोंडसडीने आक्रमण केले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर रोटावेटर फिरवून हरभरा पीक घेण्याचा मनसुबा केला. परंतु रबीच्या हरभऱ्याची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. हरभऱ्याचे पीक सध्या बहरावर आहे. त्यावर मर रोगाचे सावट असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहेत.

बॉक्स

जिरायत व बागायतदार सारखेच

तालुक्यात कोरडवाहू शेतकऱ्यांपासून तर बागायतदार व संत्रा उत्पादकांपर्यंत सर्वांची परिस्थिती एकसारखी आहे. संत्र्याचे प्रचंड नुकसान होऊनसुद्धा तालुक्याला संत्रा नुकसानीच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले. सर्वच पिकांबाबत शेतकऱ्यांसाठी सर्वात वाईट वर्ष म्हणून २०२० ची नोंद केली जाईल, अशी प्रतिक्रिया जाणकार शेतकऱ्यांनी दिली आहे.