शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दवामुळे तूर पीक संकटात; शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:08 IST

सरते वर्ष शेतकऱ्यांसाठी दु:खदायीच : हंगामातील सर्वच पिकांची परिस्थिती सारखी गोपाल डहाके मोर्शी : यावर्षीच्या हंगामातील सर्वच पिकांची ...

सरते वर्ष शेतकऱ्यांसाठी दु:खदायीच : हंगामातील सर्वच पिकांची परिस्थिती सारखी

गोपाल डहाके

मोर्शी : यावर्षीच्या हंगामातील सर्वच पिकांची परिस्थिती एकसारखी असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेसह अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सन २०२० हे वर्ष शेतकऱ्यांसाठी संकटमय ठरल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.

या परिसरातील शिवारांमध्ये साधारणत: कपाशी, मूग, उडीद, तूर, हरभरा, सोयाबीन, मका, ज्वारी यासह पालेभाज्यांमध्ये मिरची, कोबी, कांदा, सांभार, मेथी, पालक, मुळा, वांगे, तर फळांमध्ये संत्रा, मोसंबी, सीताफळ, रामफळ, पपई इत्यादी पिके घेतली जातात. परंतु या हंगामातील सर्वच पिकांवर नैसर्गिक आपत्ती आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला गेला. खरिपाचे शेवटचे पीक असलेल्या तुरीवर शेतकऱ्यांची मदार असताना त्यावर दवसदृश स्थिती असल्यामुळे शेतातील उभे पीकच पिवळे पडून वाळू लागले आहे. परिणामी शेतकरी रडकुंडीस आला आहे.

यावर्षीच्या हंगामात संत्रा फळगळतीसह अतिपावसामुळे सुरुवातीचे मुंग व उडीद पीक हातचे गेले. सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने आर्थिक अरिष्ट कोसळले. कपाशीवर बोंडअळी व खोडकिडीचे आक्रमण झाले. दसरा दिवाळीच्या मोसमात ऐनवेळी सोयाबीन या रोखीच्या पिकाने दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी जेमतेम झाली. त्यानंतर रोखीचे पीक म्हणून कापसावर मदार होती. यावर बोंडअळी व बोंडसडीने आक्रमण केले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर रोटावेटर फिरवून हरभरा पीक घेण्याचा मनसुबा केला. परंतु रबीच्या हरभऱ्याची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. हरभऱ्याचे पीक सध्या बहरावर आहे. त्यावर मर रोगाचे सावट असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहेत.

बॉक्स

जिरायत व बागायतदार सारखेच

तालुक्यात कोरडवाहू शेतकऱ्यांपासून तर बागायतदार व संत्रा उत्पादकांपर्यंत सर्वांची परिस्थिती एकसारखी आहे. संत्र्याचे प्रचंड नुकसान होऊनसुद्धा तालुक्याला संत्रा नुकसानीच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले. सर्वच पिकांबाबत शेतकऱ्यांसाठी सर्वात वाईट वर्ष म्हणून २०२० ची नोंद केली जाईल, अशी प्रतिक्रिया जाणकार शेतकऱ्यांनी दिली आहे.