शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

मंगळवारच्या पावसाने पेरणीत ५ टक्के वाढ

By admin | Updated: July 16, 2014 23:49 IST

मान्सून लांबल्यामुळे ७ जून ते १० जुलैपर्यंत म्हणजे फक्त तीन दिवस पडलेल्या पावसाच्या भरवशावर जिल्हाभरात केवळ १०.६१ टक्के पेरण्या आटोपल्या. त्यानंतर १५ जुलै रोजी पावसाच्या दमदार

सरासरी पेरणी १५ टक्के : पेरणीची लगबग सुरु, पावसासाठी बळीराजा आसुसलेलाच, तिवसा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंदअमरावती : मान्सून लांबल्यामुळे ७ जून ते १० जुलैपर्यंत म्हणजे फक्त तीन दिवस पडलेल्या पावसाच्या भरवशावर जिल्हाभरात केवळ १०.६१ टक्के पेरण्या आटोपल्या. त्यानंतर १५ जुलै रोजी पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकरी सुखावला. बुधवारपासून जिल्ह्यात पेरणीला सुरूवात झाली आहे. एक दिवसात जिल्ह्यात सरासरी ५ टक्के पेरण्या आटोपल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. खरीप हंगामात दरवर्षी ७ जूनपासून मृगाचा पाऊस पडतो. तेव्हापासूनच शेतकरी पेरणीच्या कामाला लागतात. मात्र, यंदा पावसाने तब्बल दीड महिना दडी मारल्याने जिल्ह्यातील खरिपाची पेरणी रखडली आहे. यंदा खरीप हंगामातील मूग, उडीद या पिकांच्या लागवडीचा कालावधी निघून गेला. २६ जुलैपर्यंत आटोपणार पेरण्या१५ जुलै रोजीच्या दमदार पावसामुळे पेरणीच्या कामाला वेग आला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलैपर्यंत जिल्ह्यात खरीपाच्या ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्रापैकी ७५ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची पेरणी झाली आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. मंगळवारी जोरदार पाऊस पडताच शेतकरी सुखावला. परंतु पावसाच्या लहरीपणामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरुवात झाली नाही. खरीपातील तीन पिकांच्या पेरणीचा हंगाम निघून गेला असला तरी ३० जुलै अखेरपर्यंत कपाशी पिकाशिवाय पर्याय खरीपात लागवडीसाठी मिळू शकणार नाही. यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या दडीमुळे पेरणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात ब्रेक बसला आहे. साधारणत: २६ जुलैपर्यंत जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बुधवारपर्यंत जिल्ह्यात साधारणत: १५ टक्के पेरण्या आटोपल्याचा अंदाजही कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पेरणीच्या अधिक टक्केवारीचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होणार असल्याने त्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील पेरणीची टक्केवारी स्पष्ट होणार आहे. आणखी दोन दिवस सलग पाऊस आल्यास शेती पिकासाठी लाभदायक ठरणार आहे.जिल्ह्यात ३९.९ मि.मी.पाऊसगेल्या २४ तासांत अमरावती जिल्ह्यात दमदार पर्ज्यन्यवृष्टी झाली. विविध तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३९.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये तिवसा तालुक्यात सर्वाधिक ७१.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करायंदा खरिपातील पेरण्यांचा खरा मुहूर्त पावसाच्या लहरीपणामुळे निघून गेला आहे. परिणामी शेतकऱ्यांना मूग, उडीद ही पिके पेरणीतून बाद करावी लागली. त्यापाठोपाठ आता ज्वारी व सोयाबीनचेही क्षेत्र पावसाच्या लहरीपणामुळे घटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १५ जुलैपर्यंत महसूल विभागाची आणेवारी काढून त्याआधारे जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.