शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारच्या पावसाने पेरणीत ५ टक्के वाढ

By admin | Updated: July 16, 2014 23:49 IST

मान्सून लांबल्यामुळे ७ जून ते १० जुलैपर्यंत म्हणजे फक्त तीन दिवस पडलेल्या पावसाच्या भरवशावर जिल्हाभरात केवळ १०.६१ टक्के पेरण्या आटोपल्या. त्यानंतर १५ जुलै रोजी पावसाच्या दमदार

सरासरी पेरणी १५ टक्के : पेरणीची लगबग सुरु, पावसासाठी बळीराजा आसुसलेलाच, तिवसा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंदअमरावती : मान्सून लांबल्यामुळे ७ जून ते १० जुलैपर्यंत म्हणजे फक्त तीन दिवस पडलेल्या पावसाच्या भरवशावर जिल्हाभरात केवळ १०.६१ टक्के पेरण्या आटोपल्या. त्यानंतर १५ जुलै रोजी पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकरी सुखावला. बुधवारपासून जिल्ह्यात पेरणीला सुरूवात झाली आहे. एक दिवसात जिल्ह्यात सरासरी ५ टक्के पेरण्या आटोपल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. खरीप हंगामात दरवर्षी ७ जूनपासून मृगाचा पाऊस पडतो. तेव्हापासूनच शेतकरी पेरणीच्या कामाला लागतात. मात्र, यंदा पावसाने तब्बल दीड महिना दडी मारल्याने जिल्ह्यातील खरिपाची पेरणी रखडली आहे. यंदा खरीप हंगामातील मूग, उडीद या पिकांच्या लागवडीचा कालावधी निघून गेला. २६ जुलैपर्यंत आटोपणार पेरण्या१५ जुलै रोजीच्या दमदार पावसामुळे पेरणीच्या कामाला वेग आला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलैपर्यंत जिल्ह्यात खरीपाच्या ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्रापैकी ७५ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची पेरणी झाली आहे. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. मंगळवारी जोरदार पाऊस पडताच शेतकरी सुखावला. परंतु पावसाच्या लहरीपणामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरुवात झाली नाही. खरीपातील तीन पिकांच्या पेरणीचा हंगाम निघून गेला असला तरी ३० जुलै अखेरपर्यंत कपाशी पिकाशिवाय पर्याय खरीपात लागवडीसाठी मिळू शकणार नाही. यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या दडीमुळे पेरणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात ब्रेक बसला आहे. साधारणत: २६ जुलैपर्यंत जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बुधवारपर्यंत जिल्ह्यात साधारणत: १५ टक्के पेरण्या आटोपल्याचा अंदाजही कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पेरणीच्या अधिक टक्केवारीचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होणार असल्याने त्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील पेरणीची टक्केवारी स्पष्ट होणार आहे. आणखी दोन दिवस सलग पाऊस आल्यास शेती पिकासाठी लाभदायक ठरणार आहे.जिल्ह्यात ३९.९ मि.मी.पाऊसगेल्या २४ तासांत अमरावती जिल्ह्यात दमदार पर्ज्यन्यवृष्टी झाली. विविध तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३९.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये तिवसा तालुक्यात सर्वाधिक ७१.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करायंदा खरिपातील पेरण्यांचा खरा मुहूर्त पावसाच्या लहरीपणामुळे निघून गेला आहे. परिणामी शेतकऱ्यांना मूग, उडीद ही पिके पेरणीतून बाद करावी लागली. त्यापाठोपाठ आता ज्वारी व सोयाबीनचेही क्षेत्र पावसाच्या लहरीपणामुळे घटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १५ जुलैपर्यंत महसूल विभागाची आणेवारी काढून त्याआधारे जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.