शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

दोन विद्युत रोहित्र पेटविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 27, 2014 23:26 IST

नवीन विद्युत रोहित्राअभावी शेतात ओलित करणे कठीण झाल्याने रबी पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. येत्या २४ तासात नादुरूस्त रोहित्राऐवजी नवीन रोहित्र बसविण्याच्या मागणीसाठी

बच्चू कडू यांचे आंदोलन : रोहित्रासाठी २४ तासांचा अल्टिमेटम्ंचांदूरबाजार : नवीन विद्युत रोहित्राअभावी शेतात ओलित करणे कठीण झाल्याने रबी पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. येत्या २४ तासात नादुरूस्त रोहित्राऐवजी नवीन रोहित्र बसविण्याच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी गनिमी काव्याने गुरूवारी आंदोलन करून मासोद-तुळजापूर मार्गावरील दोन रोहीत्र ताब्यात घेतले. हे रोहित्र पेटविण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांचा गोंधळ उडाला. अचलपूर उपविभागातील शेतकरी समस्या निवारण्यासाठी व महावितरणाच्या निकामी रोहीत्र बदलून देण्यासाठी आमदार कडू यांनी यापूर्वी विभागीय आयुक्तालयात टेंभा आंदोलन केले होते. तेव्हा विभागीय आयुक्तासमोर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात पर्यायी रोहीत्र बसवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता न झाल्यामुळे आमदार कडू यांनी आपल्या ४०० ते ५०० कार्यकर्ते व शेतकऱ्यासमवेत ग्रामीण परिसरातल रोहीत्र ताब्यात घेण्याचा सपाटा चालविला. यावेळी त्यांनी या रोहित्राला पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी निकामी रोहीत्रामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी स्वत:ला डिपी शेजारील विजेच्या खांबाला बांधून घेतले होते तर प्रहार कार्यकर्त्यांनी दोन शाखा अभियंत्यांनाही ताब्यात घेतले. हरबऱ्याला पाणी देता आले नाही म्हणून हिरुर व जालनापूरच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या परिसरात १५० रोहित्र निकामी आहे. सध्या ६३ के. व्ही. ए. च्या रोहित्रावर २२ जोडण्या दिल्या गेल्या आहे. वास्तविक यावर १० जोडण्या देणे आवश्यक आहे. त्यामुळे १०० के. व्ही. ए. चे रोहित्र मिळावे, तसेच नवीन रोहित्राकरिता अतिरिक्त पैशाची मागणी करू नये,यासाठी येत्या २४ तासाचा अल्टीमेटम बच्चू कडू यांनी दिला आहे.