शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

घराची अब्रू घालवणाऱ्या सरकारला पायदळी तुडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 23:07 IST

जनतेने निवडून द्यावे आणि त्यांचेच पाय चाटावे काय? आमदार खासदार करतात तरी काय? शेतकरी या शासनाने निराधार केला आहे. यापुढे आया-बहिणीचे धिंडवडे काढणाऱ्या पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.

ठळक मुद्देराजू शेट्टी राजुराबाजारात गरजले : संत्र्याला ५० हजार, सोयाबीनला ३० हजार अनुदान द्या

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : जनतेने निवडून द्यावे आणि त्यांचेच पाय चाटावे काय? आमदार खासदार करतात तरी काय? शेतकरी या शासनाने निराधार केला आहे. यापुढे आया-बहिणीचे धिंडवडे काढणाऱ्या पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. विदर्भातील शेतकऱ्यांना न्यायाकरिता २० आॅक्टोबरपासून करा किंवा लढा आंदोलन सुरू करू, अशी घोषणा राजूराबाजार येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी केले.राजूराबाजार येथे संत्रा, तूर, कापूस दुष्काळ परिषदेत शुक्रवारी पार पडली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. विदर्भात पाऊस पडला नाही. हातची पिके गेली. संत्रा नाही; कापूस, तूर, सोयाबीन पिकणार नाही. यामुळ ेशासनाने आतातरी दुष्काळ जाहीर करावा, असे यावेळी खा. शेट्टी म्हणाले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या मुलांनी सभागृहात नेतृत्व करण्याकरिता लढा आंदोलन करावे. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे शेलारमामा म्हणून उभा आहे, असेही खा. शेट्टी यांनी सांगितले.संत्रा, तूर कापूस दुष्काळ परिषदेला प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी केंद्रीय मंत्री शेतकरी नेते सुबोध मोहिते, विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार, वाशिमचे दामुअण्णा इंगोले, कार्याध्यक्ष बंगाळ ेपाटील, जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड, तालुकाध्यक्ष संदीप खडसे, प्रदिप कांबळे, रमेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रविकांत तुपकर यांनी आ. बोंडे यांना थेट आव्हान दिले. सुबोध मोहिते यांनीही परिषदेला मार्गदर्शन केले.परिषदेचे आयोजन तालुकाध्यक्ष संदीप खडसे, ऋषीकेश राऊत, सुमीत गुर्जर, नीलेश कोहळे, उमेश डबरासे, राहुल श्रीराव, मंगेश तट्टे, किशोर घाटोळे, किशोर चंबोळे, ओंकार बहुरूपी आदींनी केले होते. यावेळी प्रचंड गर्दी होती.