शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

घराची अब्रू घालवणाऱ्या सरकारला पायदळी तुडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 23:07 IST

जनतेने निवडून द्यावे आणि त्यांचेच पाय चाटावे काय? आमदार खासदार करतात तरी काय? शेतकरी या शासनाने निराधार केला आहे. यापुढे आया-बहिणीचे धिंडवडे काढणाऱ्या पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.

ठळक मुद्देराजू शेट्टी राजुराबाजारात गरजले : संत्र्याला ५० हजार, सोयाबीनला ३० हजार अनुदान द्या

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : जनतेने निवडून द्यावे आणि त्यांचेच पाय चाटावे काय? आमदार खासदार करतात तरी काय? शेतकरी या शासनाने निराधार केला आहे. यापुढे आया-बहिणीचे धिंडवडे काढणाऱ्या पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. विदर्भातील शेतकऱ्यांना न्यायाकरिता २० आॅक्टोबरपासून करा किंवा लढा आंदोलन सुरू करू, अशी घोषणा राजूराबाजार येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी केले.राजूराबाजार येथे संत्रा, तूर, कापूस दुष्काळ परिषदेत शुक्रवारी पार पडली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. विदर्भात पाऊस पडला नाही. हातची पिके गेली. संत्रा नाही; कापूस, तूर, सोयाबीन पिकणार नाही. यामुळ ेशासनाने आतातरी दुष्काळ जाहीर करावा, असे यावेळी खा. शेट्टी म्हणाले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या मुलांनी सभागृहात नेतृत्व करण्याकरिता लढा आंदोलन करावे. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे शेलारमामा म्हणून उभा आहे, असेही खा. शेट्टी यांनी सांगितले.संत्रा, तूर कापूस दुष्काळ परिषदेला प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी केंद्रीय मंत्री शेतकरी नेते सुबोध मोहिते, विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार, वाशिमचे दामुअण्णा इंगोले, कार्याध्यक्ष बंगाळ ेपाटील, जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड, तालुकाध्यक्ष संदीप खडसे, प्रदिप कांबळे, रमेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रविकांत तुपकर यांनी आ. बोंडे यांना थेट आव्हान दिले. सुबोध मोहिते यांनीही परिषदेला मार्गदर्शन केले.परिषदेचे आयोजन तालुकाध्यक्ष संदीप खडसे, ऋषीकेश राऊत, सुमीत गुर्जर, नीलेश कोहळे, उमेश डबरासे, राहुल श्रीराव, मंगेश तट्टे, किशोर घाटोळे, किशोर चंबोळे, ओंकार बहुरूपी आदींनी केले होते. यावेळी प्रचंड गर्दी होती.