शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

धारणीत पाण्यासाठी आदिवासींची पायपीट

By admin | Updated: February 14, 2016 00:17 IST

उन्हाळ्याची सुरुवात खऱ्या अर्थाने मार्चमध्ये होळी पेटल्यानंतर होते. मात्र यंदा फेब्रुवारीच्या पंधरवड्यातच उन्हाळा सुरू झाला आहे.

योजनेला पांढरा हत्ती : फटका भारनियमनाचाधारणी : उन्हाळ्याची सुरुवात खऱ्या अर्थाने मार्चमध्ये होळी पेटल्यानंतर होते. मात्र यंदा फेब्रुवारीच्या पंधरवड्यातच उन्हाळा सुरू झाला आहे. गेल्यावर्षी कमी पाऊ स झाल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. अशातच गावखेड्यात १८ ते २० तासांपर्यंत भारनियमन होत असल्याने त्याचा फटका पाणीपुरवठा योजनेलाही बसत आहे. गावात मोठी पाण्याची टाकी आहे. मात्र सदोष पाणीपुरवठा योजनेमुळे एक ते दोन किलोमीटर अंतरावरून विहिरीतून टाक्यापर्यंत पाणी येणे कठीण झाले आहे. मेळघाटातील प्रत्येक गावालगतच्या शेतातील विहिरीत भरपूर पाणीसाठा असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व भूजल सर्वेक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. पहिले पाण्याजवळ विहीर खोदल्याने हमखास पाणी लागते व खोलीकरण जास्त न करता देयके काढता येते. दुसरा फायदा दगड व रेती या पात्रातून चोरून कामे चालविले जाते. तिसरा फायदा २ कि.मी. पाईपलाईनचे खड्डे व पाईपच्या अंदाजपत्रकात वाढ करता येतो. मात्र सर्वांचा फटका ज्या गावात नळयोजना आहे, त्या गावकऱ्यांना बसत आहे. इतक्या लांब अंतरावरून विहिरीतून पाणी टाक्यापर्यंत येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याचे उदाहरण तालुक्यातील मांडवा, बासपानी, खापरखेडा, झिलपी, पोहरा, निरगुडी, धारणमहू, पाटीया, चटवाबोड, वैरागड, कुटंगा, रोहणीखेडा, बिजुधावडी, खारी यासह अनेक गावांत पहावयास मिळत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.