शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी व्याघ्र संरक्षण भरतीत भेदभाव

By admin | Updated: May 27, 2015 00:24 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यासाठी संवर्गातील पदासाठी सरळ सेवेने भरतीसाठी ...

हेच का अच्छे दिन : अचलपूर तालुक्यातील आदिवासी युवकांना वगळलेनरेंद्र जावरे अचलपूरमेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यासाठी संवर्गातील पदासाठी सरळ सेवेने भरतीसाठी अनुसूचित क्षेत्रातील धारणी व चिखलदरा तालुक्यातीलच आदिवासींसाठी आरक्षित केली आहे. या भरतीत मेळघाट मतदारसंघात येणाऱ्या अचलपूर तालुक्यातील आदिवासी युवकांना डावलल्याचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.अमरावती वनवृत्ताच्या आस्थापनेवरील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार ८१ वनरक्षकांची पदे भरण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ मे २०१५ पासून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या वनविभागाने जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील आदिवासी युवकांसाठीच ८१ वनरक्षक पदासाठी भरती असल्याचे शासन परिपत्रक काढण्यात आले आहे. परिणामी अचलपूर तालुक्यातील शेकडो युवकांना या भरतीपासून वंचित राहावे लागत असल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. १९ गावांचा समावेशमेळघाट विधानसभा मतदारसंघांतर्गत धारणी, चिखलदरा दोन्ही तालुक्यांसह अचलपूर तालुक्यातील जवळपास ८० गावांचा समावेश आहे. त्यातील बोपापूर, पिंपळखुटा, वझ्झर, निमकुंड, बुरडघाट, काळवीट, गोंडविहीर, म्हसोना, बेलखेडा, पांढरी, सालेपूर, वडुरा, निमदरी, दातुरा, मुरादपूर, येणी, जांभळा, उपातखेडा व शहापूर वडगाव अशी आदिवासी गावे असून त्यामध्ये सहा हजारांवर लोकसंख्या आहे. या गावातील आदिवासींना माडा व मिनी म्हाडा योजनेंतर्गत उपाययोजनेचा लाभ दिले जाते. ती म्हणाली..... हेच का अच्छे दिनपरतवाडा शहरातील एक्स्ट्रीम सायबर सेंटरवर चिखलदरा व धारणी तालुक्यातील अनेक आदिवासी युवक-युवती आॅनलाईन अर्ज भरती प्रक्रियेसाठी मंगळवारी आले होते. पिंपळखुटा येथील सविता बेलसरे व अंजिता तोटे यासुद्धा आल्या होत्या. युवक-युवती व्याघ्र प्रकल्प संरक्षण दलात उमेदवारी अर्ज भरत होते. मात्र आपण मेळघाट मतदारसंघात असून आपणास उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा का नाही. ‘हेच का अच्छे दिन’ म्हणत दोघींचे डोळे पाणावले. राज्य शासनाच्या या भेदभावपूर्ण कृतीवर त्यांनी रोष व्यक्त करीत भरती प्रक्रियेत स्थान देण्याची मागणी केली. कुठे गेलेत आमदार ?मेळघाट विधानसभा मतदारसंघातील अचलपूर तालुक्यातील आदिवासी युवक आणि युवतींना थेट भरतीपासून डावलण्यात आले असताना मेळघाट मतदारसंघाचे आमदार प्रभूदास भिलावेकर गेलेत कुठे, असा संतप्त सवाल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी केला आहे. राज्य शासनापर्यंत व्यथा पोहोचविणार का, असा सवाल त्यांनी केला आहे. मेळघाट मतदारसंघात व्याघ्र संरक्षण भरतीमध्ये राज्य शासनाचा आदिवासीमध्ये भेदभाव करणे योग्य नाही. आपण संबंधित मंत्री व सचिवांना यासंदर्भात निवेदन देत असून या भेदभावाचा तीव्र विरोध करतो.- केवलराम काळे, माजी आमदार, मेळघाट क्षेत्र.आदिवासी युवती व युवकांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. शासनाने हा भेदभाव दूर करून अचलपूर तालुक्यातील आदिवासींना नोकरीत सामावून घ्यावे. - छाया संजय कोठे, सरपंच, मल्हारा.