शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी उघड्यावर; शेतात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:01 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभाग अंतर्गत असलेल्या सेमाडोह परिक्षेत्रातील पिली येथील जवळपास २२० कुटुंबांचे पुनर्वसन परतवाडा ते चांदूर बाजार मार्गावरील मौजखेडा व टोंगलापूर येथे करण्यात आले आहे. मागील पंधरा दिवसांपासून हे कुटुंब प्रशासनाने वसविलेल्या शेतात संसार नव्याने उभा करीत आहेत. पुनर्वसन करताना आवश्यक ठरणाऱ्या सुविधांचा येथे अभाव आहे.

ठळक मुद्देहे कसले पुनर्वसन ?: मेळघाट व्याघ्र प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर, जंगलातून काढणे हाच केवळ होता का उद्देश ?

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात आदिवासी गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. अविरत सुरू असलेल्या या प्रक्रियेत सेमाडोह नजीकच्या पिली गावाचे पुनर्वसन चांदूर बाजार तालुक्यातील मौजखेडा येथे करण्यात आले. परंतु, संपूर्ण सुविधा न देता फक्त जंगलातून हुसकावून लावतच हे पुनर्वसन झाल्याचे येथे चित्र आहे. दुसरीकडे ज्या ठिकाणी त्यांना वसविण्यात आले, तेथील सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभाग अंतर्गत असलेल्या सेमाडोह परिक्षेत्रातील पिली येथील जवळपास २२० कुटुंबांचे पुनर्वसन परतवाडा ते चांदूर बाजार मार्गावरील मौजखेडा व टोंगलापूर येथे करण्यात आले आहे. मागील पंधरा दिवसांपासून हे कुटुंब प्रशासनाने वसविलेल्या शेतात संसार नव्याने उभा करीत आहेत. पुनर्वसन करताना आवश्यक ठरणाऱ्या सुविधांचा येथे अभाव आहे. केवळ जंगलातून हाकलून लावण्याच्या उद्देशानेच पुनर्वसन केल्याचे चित्र पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान असलेल्या नियमांची वाट लावणारे ठरले आहे. प्रत्येकी दहा लक्ष रुपयांचे शासनाचे पॅकेज असून, जंगल सोडल्यानंतर पुनर्वसित ठिकाणी घरकुल, वीज, रस्ता या पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहे. त्यासाठी अनेक फायली या कार्यालयातून त्या कार्यालयात फिरणार आहेत. तोपर्यंत आदिवासी स्वत: झोपड्या उभारून राहत असल्याचे दिसून आले.जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार यांनी आदिवासींना सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन दिले आहे.उघड्यावर शौचालय अंधेरा कायम हैमेळघाटातील आदिवासींचे शहरी भागात पुनर्वसन करताना कुठल्याच प्रकारच्या सुविधा त्यांना पाच ते दहा वर्षांनंतरच दिल्या जात असल्याचे अनेक प्रकरणांत पुढे आले. यातूनच संतापून आदिवासी पुन्हा मूळ गावी परत जातात. पुन्हा आदिवासी व व्याघ्र प्रकल्प प्रशासनात संघर्ष उभा राहतो. मागचा अनुभव पाहता, व्याघ्र प्रकल्प किंवा संबंधित पुनर्वसन विभागाने स्वच्छ भारत अभियानाची पूर्णत: वाट लावली. परिसरात सौरदिवे उभारले; मात्र घरात अंधार कायम आहे. शौचालय बांधून दिले नसल्याने उघड्यावर जावे लागत आहे.पुनर्वसितांचे सांडपाणी दुसऱ्यांच्या शेतातपुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या जागेची पसंती आदिवासींना करण्याचे प्रशासनाने मान्य केले. परंतु, घरांसाठी काढण्यात आलेल्या नाल्या दुसऱ्यांच्या शेतात काढण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात त्या वाटेने पावसाचेही पाणी साचले. यामुळे पीक पूर्णत: बुडाले आहे. यासंदर्भात शेतकरी सुरेंद्र देशमुख यांनी सुरुवातीपासूनच संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात लेखी निवेदन दिले. मात्र, त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांच्यासह इतर तीन शेतकऱ्यांच्या शेतातील पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

टॅग्स :agricultureशेती