शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
2
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
5
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
6
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
7
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
8
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
9
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
10
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
11
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
12
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
13
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
14
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
15
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
16
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
17
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
18
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

आदिवासी उघड्यावर; शेतात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:01 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभाग अंतर्गत असलेल्या सेमाडोह परिक्षेत्रातील पिली येथील जवळपास २२० कुटुंबांचे पुनर्वसन परतवाडा ते चांदूर बाजार मार्गावरील मौजखेडा व टोंगलापूर येथे करण्यात आले आहे. मागील पंधरा दिवसांपासून हे कुटुंब प्रशासनाने वसविलेल्या शेतात संसार नव्याने उभा करीत आहेत. पुनर्वसन करताना आवश्यक ठरणाऱ्या सुविधांचा येथे अभाव आहे.

ठळक मुद्देहे कसले पुनर्वसन ?: मेळघाट व्याघ्र प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर, जंगलातून काढणे हाच केवळ होता का उद्देश ?

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात आदिवासी गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. अविरत सुरू असलेल्या या प्रक्रियेत सेमाडोह नजीकच्या पिली गावाचे पुनर्वसन चांदूर बाजार तालुक्यातील मौजखेडा येथे करण्यात आले. परंतु, संपूर्ण सुविधा न देता फक्त जंगलातून हुसकावून लावतच हे पुनर्वसन झाल्याचे येथे चित्र आहे. दुसरीकडे ज्या ठिकाणी त्यांना वसविण्यात आले, तेथील सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभाग अंतर्गत असलेल्या सेमाडोह परिक्षेत्रातील पिली येथील जवळपास २२० कुटुंबांचे पुनर्वसन परतवाडा ते चांदूर बाजार मार्गावरील मौजखेडा व टोंगलापूर येथे करण्यात आले आहे. मागील पंधरा दिवसांपासून हे कुटुंब प्रशासनाने वसविलेल्या शेतात संसार नव्याने उभा करीत आहेत. पुनर्वसन करताना आवश्यक ठरणाऱ्या सुविधांचा येथे अभाव आहे. केवळ जंगलातून हाकलून लावण्याच्या उद्देशानेच पुनर्वसन केल्याचे चित्र पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान असलेल्या नियमांची वाट लावणारे ठरले आहे. प्रत्येकी दहा लक्ष रुपयांचे शासनाचे पॅकेज असून, जंगल सोडल्यानंतर पुनर्वसित ठिकाणी घरकुल, वीज, रस्ता या पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहे. त्यासाठी अनेक फायली या कार्यालयातून त्या कार्यालयात फिरणार आहेत. तोपर्यंत आदिवासी स्वत: झोपड्या उभारून राहत असल्याचे दिसून आले.जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार यांनी आदिवासींना सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन दिले आहे.उघड्यावर शौचालय अंधेरा कायम हैमेळघाटातील आदिवासींचे शहरी भागात पुनर्वसन करताना कुठल्याच प्रकारच्या सुविधा त्यांना पाच ते दहा वर्षांनंतरच दिल्या जात असल्याचे अनेक प्रकरणांत पुढे आले. यातूनच संतापून आदिवासी पुन्हा मूळ गावी परत जातात. पुन्हा आदिवासी व व्याघ्र प्रकल्प प्रशासनात संघर्ष उभा राहतो. मागचा अनुभव पाहता, व्याघ्र प्रकल्प किंवा संबंधित पुनर्वसन विभागाने स्वच्छ भारत अभियानाची पूर्णत: वाट लावली. परिसरात सौरदिवे उभारले; मात्र घरात अंधार कायम आहे. शौचालय बांधून दिले नसल्याने उघड्यावर जावे लागत आहे.पुनर्वसितांचे सांडपाणी दुसऱ्यांच्या शेतातपुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या जागेची पसंती आदिवासींना करण्याचे प्रशासनाने मान्य केले. परंतु, घरांसाठी काढण्यात आलेल्या नाल्या दुसऱ्यांच्या शेतात काढण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात त्या वाटेने पावसाचेही पाणी साचले. यामुळे पीक पूर्णत: बुडाले आहे. यासंदर्भात शेतकरी सुरेंद्र देशमुख यांनी सुरुवातीपासूनच संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात लेखी निवेदन दिले. मात्र, त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांच्यासह इतर तीन शेतकऱ्यांच्या शेतातील पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

टॅग्स :agricultureशेती