शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील आठवडी बाजारात थाट्यांच्या नाच-गाण्याची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 10:31 IST

दिवाळीच्या गोवर्धन पूजेनंतर दुसऱ्या दिवसापासून मेळघाटच्या काही ठरावीक गावांसह मध्य प्रदेशच्या सीमारेषेपलीकडच्या गावांमध्ये भरणाऱ्या बाजारात थाट्यांची धूम सुरू झाली आहे. सोमवारी मध्यप्रदेशच्या सावलमेंढा येथे थाट्यांचा बाजार भरला होता.

ठळक मुद्देगोंड समाजाची परंपरामेळघाटसह मध्य प्रदेशच्या सीमेवर दिवाळीनंतर जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीच्या गोवर्धन पूजेनंतर दुसऱ्या दिवसापासून मेळघाटच्या काही ठरावीक गावांसह मध्य प्रदेशच्या सीमारेषेपलीकडच्या गावांमध्ये भरणाऱ्या बाजारात थाट्यांची धूम सुरू झाली आहे. सोमवारी मध्यप्रदेशच्या सावलमेंढा येथे थाट्यांचा बाजार भरला होता.मेळघाटात बहुसंख्येने असलेल्या गोंड समाजात थाट्या या शब्दाचा अर्थ होतो गुराखी. वर्षभर गावातील गुरेढोरे जंगलात नेऊन चारणाऱ्या या थाट्यांच्या आनंदपर्वाला दिवाळीतील गोवर्धन पूजेपासून सुरुवात होते. मालकांकडून मिळणाऱ्या हक्काच्या बक्षिसीवर ते जल्लोष करतात. तब्बल आठवडाभर हे गुराखी नाचगाणे म्हणत हा आनंद साजरा करतात. चिखलदरा तालुक्यातील काजलडोह, डोमा, कोयलारी, बगदरी, कोटमी आदी गावांमध्ये गोंड समाजातील थाट्यांची संख्या अधिक आहे. संपूर्ण गावांची गुरे मोजून सकाळी घेऊन जाणे आणि सायंकाळी परत आणणे हीच त्यांची दिनचर्या. या रोजच्या कामातून उसंत त्यांना मिळत नाही. त्यामुळे थाट्या बाजाराची ते वर्षभर वाट पाहतात.

ढोल-बासरीच्या स्वरांनी आसमंत निनादलागोवर्धन पूजेच्या दुसऱ्या दिवशीपासून मेळघाटच्या काही गावांसह मध्य प्रदेशातील गावांमध्ये या थाट्या बाजाराला सुरुवात झाली आहे. सावलमेंढा येथील बाजारात गुराखी म्हणून ओळख असलेल्या गोंड समाजातील थाट्या आगळ्यावेगळ्या वेशभूषेत दाखल झाले. बाजाराचे आकर्षणाचे ते केंद्रबिंदू ठरले. लांब तुतारी, तेवढीच लांब बासुरी व ढोलकीवर थाप देत, पायात बांधलेल्या घुंगरांच्या तालबद्ध नादाने त्यांनी आसमंत निनादून टाकला. यानंतर बुधवार-गुरुवारी कुनखेडी, मेळघाटातील चुरणी, काटकुंभ येथे थाट्या बाजार भरणार आहे. 

नाचगाणे गात मागतात बक्षीसगावातील ज्या पशुपालकांची गुरे वर्षभर थाट्या चराईसाठी घेऊन जातात, त्यांच्याकडून हक्काने बक्षिसांची रक्कम ते मागतात. आठवडी बाजाराच्या दिवशी दिवसभर जमा केलेली बक्षिसांची रक्कम सायंकाळी एकत्र करून जल्लोष केला जातो. आवडीनुसार खानपान केले जाते. मेळघाटात आदिवासी गोंड समाजाची संख्या काटकुंभ भागात काही गावांमध्ये सर्वाधिक आहे. वर्षातून एकदाच बक्षिसांची मागणी होत असल्याने पशुपालक त्यांना आनंदाने देतात. या थाट्या बाजाराला पाहण्यासाठी ज्या गावातील आठवडी बाजार असेल, त्या पंचक्रोशीतील आबालवृद्ध मोठ्या संख्येने हजेरी लावतात, हे विशेष. त्यामुळे नेहमीच्या आठवडी बाजारापेक्षा या दिवसांतील आठवडी बाजार माणसांनी फुललेले दिसतात.

गोंड समाजातील थाट्याची परंपरा असून, वर्षातून एकदा ते आपला आनंदपर्व साजरा करतात. त्यांचा हा सर्वात मोठा सण असतो.- जुगराम सलामे,बगदरी

टॅग्स :cultureसांस्कृतिक