शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नोकरीचे आमिष दाखवून मेळघाटातील आदिवासी मुलांचे अपहरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 18:46 IST

पुण्यातील एका कारखान्याच्या कामासाठी तालुक्यातील धारणमहू येथून आठ मुले घेऊन जाणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या आठ मुलांना डांबून ठेवल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआठ मुलांना डांबून ठेवल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुण्यातील एका कारखान्याच्या कामासाठी तालुक्यातील धारणमहू येथून आठ मुले घेऊन जाणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या आठ मुलांना डांबून ठेवल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.याप्रकरणी तालुक्यातील धारणमहू येथील नारायण बंसी जावरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा १५ वर्षीय मुलगा रवींद्रसह अन्य सात मुलांना पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील सेक्टर ७, प्लॉट ३ मधील ऋग्वेदांत पावडर कोटिंग या कंपनीतील प्रवीण गावंडे व संजय पाटील हे कामाला लावून देण्याचे आमिष दाखवून घेऊन गेले. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी गावातून गेल्यापासून पालकांचा मुलांशी संपर्क होऊ शकला नाही. गावंडे व पाटील यांच्याशी संपर्क केल्यावर मुलांना परत पाठवतो, एवढेच उत्तर मिळत आहे. अखेर त्रस्त झालेल्या पालकांनी धारणी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी भादंविचे कलम ३६३, ३३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.प्रथमच तक्रारमेळघाटातून रोजगाराचे आमिष दाखवून आदिवासींना परप्रांतात किंवा मोठ्या शहरात घेऊन जाण्याचे प्रमाण मोठे आहे. येथील अनेक आदिवासींनी रोजगारासाठी मेळघाटातून पाय काढला. मात्र, प्रथमच शाळकरी मुलांना घेऊन गेल्यावर त्यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.अशी आहेत मुलांची नावेरवींद्र नारायण जावरकर, श्रीराम शोभाराम पाटणकर, सुमीत सुरेश धांडे, रीतेश चम्पालाल मावस्कर, राहुल कोम्बा भिलावेकर, मुन्नू ताराचंद कासदेकर, रामेश्वर कैलास कासदेकर, कृष्ण जीवन मावस्कर यांचा समावेश आहे. यापैकी काही मुले शाळकरी विद्यार्थी आहेत, तर काहींनी शाळा सोडली आहे.अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, मुलांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक पालकांसह रवाना करणार आहे. या प्रकरणाचा आम्ही सर्वांगाने तपास करीत आहोत.- किशोर गवई, ठाणेदार, धारणी

टॅग्स :Kidnappingअपहरण