शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

झाडे हिरवीगार; पण वांझोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:31 IST

यंदाच्या खरिपात जून महिन्यात पावसाच्या प्रदीर्घ दडीने निर्माण झालेल्या ‘मल्टीपल काम्ॅपलेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात केला.

ठळक मुद्देशेंगाच नाहीत : सदोष बियाणे, कीड, रोगही ठरताहेत कारणीभूत‘मल्टिपल कॉम्प्लेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात जून महिन्यात पावसाच्या प्रदीर्घ दडीने निर्माण झालेल्या ‘मल्टीपल काम्ॅपलेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात केला. वाढ खुंटली, झाड हिरवेगार दिसत असतानाही सोयाबीन वांझोटे राहिले आहे. सदोष बियाणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव देखील सोयाबीनच्या मुळावर उठला आहे. जिल्ह्यात किमान एक ते दीड लाख हेक्टरमधील सोयाबीनला शेंगाच आल्या नसल्याने शेतकºयांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.यंदाच्या हंगामात जिल्ह्यात तीन लाख २३ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत दोन लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. मात्र, जून महिन्यात मृग नक्षत्रापासूनच पावसाने प्रदीर्घ दडी दिली आहे. नंतरही दमदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली. सुरूवातीच्या काळात तीन आठवडयाचा पावसाच्या खंडाचे परिणाम आता सोयाबीनवर जाणवायला लागले आहेत. झाड हिरवेगार असूनही त्यावर फुले व शेंगा पकडल्याच नाहीत. सदोष बियाण्यांमुळे ‘मोझॅक’चा प्रादुर्भाव झाला. झाड हिरवे दिसते. मात्र, त्यातुलनेत झाडाला शेंगा कमी प्रमाणात लागतात. त्याही खुरटलेल्या व पोचट असतात. या शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत. सद्यस्थितीत प्रतिकूल हवामानामुळे अळीचा ‘अटॅक’ आहे. ही अळी सोयाबीनची फुले खात असल्याने झाड हिरवे दिसत असले तरी झाडाला शेंगाच लागत नाहीत. आदी कारणांमुळे सोयाबीन पिकावर सध्या आरिष्ट ओढवले आहे. सोयाबीनवरील विषाणू, जिवाणूजन्य रोग, झाडाला नत्र, पलास यांसह ईतर अन्नद्रव्याची कमतरता, पानांवरील बुरशीजन्य ठिपके, मूलकूज, खोडकूज, करपा, अ‍ॅन्थ्रन्कोज व तांबेरा आदी रोग व कीडींमुळे सोयाबीनला एकतर शेंगा लागत नाहीत, लागल्या तर त्या पोचट राहत आहेत. यामुळे शेतकºयांनी वेळीच व्यवस्थापन न केल्यास सोयाबीनचे २५ ते ९० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे.काय आहे ‘मल्टिपल कॉम्प्लेक्स फॅक्टर ?शेतकºयांनी जून महिन्यात सोयाबीनची पेरणी केली. मात्र, २७ दिवस पावसाचा खंड असल्याने पिकांची वाढ खुंटली. फुले धरलीच नाहीत. पावसाच्या ताणामुळे झाड हिरवेगार दिसत असले तरी शेंगा मात्र कमी आहेत. नंतर झाडांवर फुले येत असली तरी पुढे मान्सून विड्रॉल होत असल्याने तसेच शेंगा परिपक्वहोण्यास ४० दिवसांचा कालावधी लागत असल्याने संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यासच काही प्रमाणात उत्पादन घेता येईल. मात्र, जिरायती क्षेत्रात याची शक्यता नाही. जुलै महिन्यात पेरणी झालेल्या पिकांवर याचा जास्त प्रभाव नसल्याची माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली. हासर्व ‘मल्टीपल कॉम्प्लेक्स फॅक्टरचा’ प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले.बाष्परोधक ‘पोटॅशियम नायटेÑट’ची फवारणी आवश्यकअशा प्रतिकूल परिस्थितीत पावसाचा ताण असल्यास झाडावरील शेंगा टिकविण्यासाठी बाष्परोधक पोटॅशियम नायट्रेटची फवारणी आवश्यक आहे. १३:०:४५ हे एक किलो मात्रेमध्ये १०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हे पोटॅशियम बाष्परोधक असल्यामुळे उन्हापासून सोयाबीनचा बचाव होतो व किमान १५ दिवसांची मुभा मिळते. नायट्रोजन व पालाश शेंगा भरण्यास मदत करतात. झाडांची तहान भागवितात, अशी माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली.