शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

झाडे हिरवीगार; पण वांझोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:31 IST

यंदाच्या खरिपात जून महिन्यात पावसाच्या प्रदीर्घ दडीने निर्माण झालेल्या ‘मल्टीपल काम्ॅपलेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात केला.

ठळक मुद्देशेंगाच नाहीत : सदोष बियाणे, कीड, रोगही ठरताहेत कारणीभूत‘मल्टिपल कॉम्प्लेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात जून महिन्यात पावसाच्या प्रदीर्घ दडीने निर्माण झालेल्या ‘मल्टीपल काम्ॅपलेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात केला. वाढ खुंटली, झाड हिरवेगार दिसत असतानाही सोयाबीन वांझोटे राहिले आहे. सदोष बियाणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव देखील सोयाबीनच्या मुळावर उठला आहे. जिल्ह्यात किमान एक ते दीड लाख हेक्टरमधील सोयाबीनला शेंगाच आल्या नसल्याने शेतकºयांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.यंदाच्या हंगामात जिल्ह्यात तीन लाख २३ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत दोन लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. मात्र, जून महिन्यात मृग नक्षत्रापासूनच पावसाने प्रदीर्घ दडी दिली आहे. नंतरही दमदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली. सुरूवातीच्या काळात तीन आठवडयाचा पावसाच्या खंडाचे परिणाम आता सोयाबीनवर जाणवायला लागले आहेत. झाड हिरवेगार असूनही त्यावर फुले व शेंगा पकडल्याच नाहीत. सदोष बियाण्यांमुळे ‘मोझॅक’चा प्रादुर्भाव झाला. झाड हिरवे दिसते. मात्र, त्यातुलनेत झाडाला शेंगा कमी प्रमाणात लागतात. त्याही खुरटलेल्या व पोचट असतात. या शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत. सद्यस्थितीत प्रतिकूल हवामानामुळे अळीचा ‘अटॅक’ आहे. ही अळी सोयाबीनची फुले खात असल्याने झाड हिरवे दिसत असले तरी झाडाला शेंगाच लागत नाहीत. आदी कारणांमुळे सोयाबीन पिकावर सध्या आरिष्ट ओढवले आहे. सोयाबीनवरील विषाणू, जिवाणूजन्य रोग, झाडाला नत्र, पलास यांसह ईतर अन्नद्रव्याची कमतरता, पानांवरील बुरशीजन्य ठिपके, मूलकूज, खोडकूज, करपा, अ‍ॅन्थ्रन्कोज व तांबेरा आदी रोग व कीडींमुळे सोयाबीनला एकतर शेंगा लागत नाहीत, लागल्या तर त्या पोचट राहत आहेत. यामुळे शेतकºयांनी वेळीच व्यवस्थापन न केल्यास सोयाबीनचे २५ ते ९० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे.काय आहे ‘मल्टिपल कॉम्प्लेक्स फॅक्टर ?शेतकºयांनी जून महिन्यात सोयाबीनची पेरणी केली. मात्र, २७ दिवस पावसाचा खंड असल्याने पिकांची वाढ खुंटली. फुले धरलीच नाहीत. पावसाच्या ताणामुळे झाड हिरवेगार दिसत असले तरी शेंगा मात्र कमी आहेत. नंतर झाडांवर फुले येत असली तरी पुढे मान्सून विड्रॉल होत असल्याने तसेच शेंगा परिपक्वहोण्यास ४० दिवसांचा कालावधी लागत असल्याने संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यासच काही प्रमाणात उत्पादन घेता येईल. मात्र, जिरायती क्षेत्रात याची शक्यता नाही. जुलै महिन्यात पेरणी झालेल्या पिकांवर याचा जास्त प्रभाव नसल्याची माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली. हासर्व ‘मल्टीपल कॉम्प्लेक्स फॅक्टरचा’ प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले.बाष्परोधक ‘पोटॅशियम नायटेÑट’ची फवारणी आवश्यकअशा प्रतिकूल परिस्थितीत पावसाचा ताण असल्यास झाडावरील शेंगा टिकविण्यासाठी बाष्परोधक पोटॅशियम नायट्रेटची फवारणी आवश्यक आहे. १३:०:४५ हे एक किलो मात्रेमध्ये १०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हे पोटॅशियम बाष्परोधक असल्यामुळे उन्हापासून सोयाबीनचा बचाव होतो व किमान १५ दिवसांची मुभा मिळते. नायट्रोजन व पालाश शेंगा भरण्यास मदत करतात. झाडांची तहान भागवितात, अशी माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली.