शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

झाडे हिरवीगार; पण वांझोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:31 IST

यंदाच्या खरिपात जून महिन्यात पावसाच्या प्रदीर्घ दडीने निर्माण झालेल्या ‘मल्टीपल काम्ॅपलेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात केला.

ठळक मुद्देशेंगाच नाहीत : सदोष बियाणे, कीड, रोगही ठरताहेत कारणीभूत‘मल्टिपल कॉम्प्लेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात जून महिन्यात पावसाच्या प्रदीर्घ दडीने निर्माण झालेल्या ‘मल्टीपल काम्ॅपलेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात केला. वाढ खुंटली, झाड हिरवेगार दिसत असतानाही सोयाबीन वांझोटे राहिले आहे. सदोष बियाणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव देखील सोयाबीनच्या मुळावर उठला आहे. जिल्ह्यात किमान एक ते दीड लाख हेक्टरमधील सोयाबीनला शेंगाच आल्या नसल्याने शेतकºयांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.यंदाच्या हंगामात जिल्ह्यात तीन लाख २३ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत दोन लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. मात्र, जून महिन्यात मृग नक्षत्रापासूनच पावसाने प्रदीर्घ दडी दिली आहे. नंतरही दमदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली. सुरूवातीच्या काळात तीन आठवडयाचा पावसाच्या खंडाचे परिणाम आता सोयाबीनवर जाणवायला लागले आहेत. झाड हिरवेगार असूनही त्यावर फुले व शेंगा पकडल्याच नाहीत. सदोष बियाण्यांमुळे ‘मोझॅक’चा प्रादुर्भाव झाला. झाड हिरवे दिसते. मात्र, त्यातुलनेत झाडाला शेंगा कमी प्रमाणात लागतात. त्याही खुरटलेल्या व पोचट असतात. या शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत. सद्यस्थितीत प्रतिकूल हवामानामुळे अळीचा ‘अटॅक’ आहे. ही अळी सोयाबीनची फुले खात असल्याने झाड हिरवे दिसत असले तरी झाडाला शेंगाच लागत नाहीत. आदी कारणांमुळे सोयाबीन पिकावर सध्या आरिष्ट ओढवले आहे. सोयाबीनवरील विषाणू, जिवाणूजन्य रोग, झाडाला नत्र, पलास यांसह ईतर अन्नद्रव्याची कमतरता, पानांवरील बुरशीजन्य ठिपके, मूलकूज, खोडकूज, करपा, अ‍ॅन्थ्रन्कोज व तांबेरा आदी रोग व कीडींमुळे सोयाबीनला एकतर शेंगा लागत नाहीत, लागल्या तर त्या पोचट राहत आहेत. यामुळे शेतकºयांनी वेळीच व्यवस्थापन न केल्यास सोयाबीनचे २५ ते ९० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे.काय आहे ‘मल्टिपल कॉम्प्लेक्स फॅक्टर ?शेतकºयांनी जून महिन्यात सोयाबीनची पेरणी केली. मात्र, २७ दिवस पावसाचा खंड असल्याने पिकांची वाढ खुंटली. फुले धरलीच नाहीत. पावसाच्या ताणामुळे झाड हिरवेगार दिसत असले तरी शेंगा मात्र कमी आहेत. नंतर झाडांवर फुले येत असली तरी पुढे मान्सून विड्रॉल होत असल्याने तसेच शेंगा परिपक्वहोण्यास ४० दिवसांचा कालावधी लागत असल्याने संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यासच काही प्रमाणात उत्पादन घेता येईल. मात्र, जिरायती क्षेत्रात याची शक्यता नाही. जुलै महिन्यात पेरणी झालेल्या पिकांवर याचा जास्त प्रभाव नसल्याची माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली. हासर्व ‘मल्टीपल कॉम्प्लेक्स फॅक्टरचा’ प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले.बाष्परोधक ‘पोटॅशियम नायटेÑट’ची फवारणी आवश्यकअशा प्रतिकूल परिस्थितीत पावसाचा ताण असल्यास झाडावरील शेंगा टिकविण्यासाठी बाष्परोधक पोटॅशियम नायट्रेटची फवारणी आवश्यक आहे. १३:०:४५ हे एक किलो मात्रेमध्ये १०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हे पोटॅशियम बाष्परोधक असल्यामुळे उन्हापासून सोयाबीनचा बचाव होतो व किमान १५ दिवसांची मुभा मिळते. नायट्रोजन व पालाश शेंगा भरण्यास मदत करतात. झाडांची तहान भागवितात, अशी माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली.