शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

हरित महाराष्ट्रासाठी वृक्ष दिंडी

By admin | Updated: June 21, 2016 00:10 IST

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १ जुलै, २०१६ रोजी २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

१ जुलैला वृक्ष लागवड : किमान एक वृक्ष लावण्याचे आवाहनअमरावती : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १ जुलै, २०१६ रोजी २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. ही मोहीम लोकचळवळ व्हावी, यासाठी अमरावती शहरात सोमवारी भव्य वृक्षदिंडी काढण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथून निघालेल्या या वृक्षदिंडीचा शुभारंभ पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आला.टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीत २ कोटी वृक्ष लावू या, जगवू या व महाराष्ट्र आपला हरित करूया, वृक्ष लावा वृक्ष जगवा, एक दिवस आपल्या भविष्यासाठी चला हरित महाराष्ट्राच्या चळावळीत सहभागी होऊ या, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एकत्र येऊ या, एकाच वेळी एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लावू या घोषणांनी शहर दुमदुमून गेले. वृक्ष दिंडीत अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील वन विभागाच्या पेट्रोलिंग कार, सामाजिक वनिकरणाची वाहने सहभागी झाली होती. या वाहनावर वृक्ष लागवडीच्या जागृतीबाबत फलक लावण्यात आली होती. तसेच दिंडीमध्ये सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.विभागीय आयुक्त कार्यालयात समारोप झालेल्या या दिंडीमध्ये आमदार राजू तोडसाम, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी, मुख्य वनसंवरक्षक संजीव गौड, उपवनसंवरक्षक अधिकारी निनू सोमराज, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रदीप मसराम आदी मान्यवर सहभागी झाले होते. वृक्ष दिंडीचा समारोप विभागीय आयुक्त कार्यालयात झाल्यानंतर कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री प्रवीण पोटे, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे व अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. (प्रतिनिधी)पुढील पिढीच्या आरोग्यासाठी वृक्ष लावा : पालकमंत्रीपुढील पिढीच्या आरोग्यासाठी वृक्ष लावा व २ कोटी वृक्ष लागवड हे एक दिवसाची शासकीय मोहीम असे त्याचे स्वरुप न राहता वृक्ष चळवळ व्हावी या दृष्टीने वृक्ष लावा मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. फक्त वृक्ष लागवड महत्त्वाची नसून त्याचे संगोपनदेखील तेवढेच महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी मांडले. २ कोटी वृक्ष लागवडीबाबत आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीला आमदार यशोमती ठाकूर, प्रभुदास भिलावेकर उपस्थित होते. वृक्ष चळवळ हे फक्त सामाजिक वनीकरण विभागाचे काम नसून सर्वांची चळवळ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात वनविभाग व सामाजिक वनीकरण, शासनाचे इतर विभाग, स्वयंसेवी, अशासकीय संस्था आदींच्या माध्यमातून एकूण ४ लाख ८५ हजार झाडे लावण्याचे नियोजन असल्याची माहिती उपसंचालक सामाजिक वनीकरण पी.डी. मसराम यांनी दिली. १ जुलै रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ यावेळेत वृक्ष लागवड केली जाईल. त्यासाठी रोपवाटिकेतून २७ जूनपूर्वी रोपांची वाहतूक करावयाची आहे. ज्या विभागांनी अजूनही खड्डे खोदण्याची कार्यवाही केलेली नाही, त्यांना रोप मिळणार नाही, अशी कडक सूचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. यावेळी सातही उपविभागीय अधिकाऱ्यायांनी जिल्हा व तालुका समन्वय समितीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचे सादरीकरण केले.