शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; पुण्यासाठी ५० रुपये जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

मनीष तसरे- अमरावती : कोरोनाकाळात दोन वर्षापासून वाहतूक बंद असल्याने त्याचा फटका ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना बसला. ट्रॅव्हल्स अनेक दिवस उभ्या ...

मनीष तसरे- अमरावती : कोरोनाकाळात दोन वर्षापासून वाहतूक बंद असल्याने त्याचा फटका ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना बसला. ट्रॅव्हल्स अनेक दिवस उभ्या ठेवाव्या लागल्यात. अनेकांना वर्क फॉर्म होमची सुविधा कंपन्यानी दिल्यामुळे प्रवासीसंख्यादेखील नगण्य कमी होती.

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. अनेक मार्गांवरील बसफेऱ्या खराब रस्त्यांमुळे आताही बंदच आहेत. सध्या गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ थोड्याफार प्रमाणात झाली आहे. दोन वर्षे कोरोनाचा फटका बसलेल्या ट्रॅव्हल्स व्यवसायाला गणेशोत्सवाने तारल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांमधून उमटत आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------

या मार्गावर सर्वाधिक ट्रॅव्हल्स धावतात

------------------

--------------------------------------------------

नागपूर-पूणे ---

नागपुर --नाशिक---

नागपुर-- औरंगाबाद--

नागपूर --इंदौर---

अमरावती -पुणे--

-------------------------------------------------------

भाडे वाढले--

नागपूर-पुणे------------------------१४००-१५००

नागपूर --नाशिक-----------------१२००-१३००

नागपूर-- औरंगाबाद---------------१०००-१०००

नागपूर --इंदूर---------------८००-८५०

अमरावती -पुणे---------------------११००-१२००

------------------------------------------------------------------------

कोट----

ट्रॅव्हल्सचालक

१) दोन वर्षांनंतर बरे दिवस

दोन वर्षांपासून काेरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय तोट्यात आला आहे. घेतलेेले कर्जसुध्दा भरताना ताण सहन करावा लागत आहे. बऱ्याच लोकांनी वाहने उभी केली आहेत. रक्षाबंधनपासून आता जेमतेम प्रवासीसंख्या वाढत असल्याने व्यवहार सुरळीत होत आहे. या दिवाळीत चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे.

- दिलीप छूटलाणी,

ट्रॅव्हल्सचालक, पंचवटी अमरावती

२) कोरोनाकाळात ट्रॅव्हल्स बंद होत्या. बरीच बंधने होती. त्यामुळे परवडत नव्हते. आता जेमतेम प्रवासी वाढत आहे. सद्यस्थितीत गौरी - गणेशोत्सवामुळे बऱ्या प्रमाणात प्रवासीसंख्या वाढली आहेे. कारोनाची रुग्णांची संख्या वाढली नाही. दिवाळीत बऱ्या प्रमाणात प्रवासीसंख्या वाढेल व व्यवसाय होईल.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

कोेट प्रवासी

१) गौरी -गणेशोत्सामुळे अमरावतीत यायचे हाेते. सध्या ट्रॅव्हल्सचे भाडे अधिक असले तरी घरी उत्सव असल्याने यावेच लागते. सध्या ट्रॅव्हल्स चालक कोरोना नियमांचे पालन करीत आहे.

- रोहित देशमुख,

२) पुण्याहून अमरावतीला घरी यायचे होते. प्रवासीभाडे अधिक असतानाही घरी पोहचणे गरजेचे हाते. त्यामुळे ट्रॅव्हल्सने आले. कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रवास झाला.

- सिमल नागापुरे, प्रवासी