शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परिवहन विभाग गतिमान करणार

By admin | Updated: April 19, 2016 00:04 IST

राज्यातील ८० टक्के सर्वसामान्य जनता ही एसटी बसने प्रवास करते. प्रवाशांना आराम दायक व सुरक्षीत प्रवास करता यावा,...

दिवाकर रावते : राजापेठ बसस्थानकाचे लोकार्पणअमरावती : राज्यातील ८० टक्के सर्वसामान्य जनता ही एसटी बसने प्रवास करते. प्रवाशांना आराम दायक व सुरक्षीत प्रवास करता यावा, यासाठी सर्व सोयी-सुविधायुक्त बस स्थानकांच्या निर्मितीसोबतच परिवहन विभाग अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाव्दारे उभारण्यात आलेल्या राजापेठ बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पणप्रंसगी रावते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, श्रीकांत देशपांडे, रवि राणा, माजी आमदार संजय बंड, प्रशांत वानखडे, महापौर चरणजितकौर नंदा, नगरसेवक सुनील राऊत, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, एस.टी. महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मधुकर पठारे, विभाग नियंत्रक राजेश अडोकार, विभागीय वाहतुक अधिकारी सिया, आगार क्र.१ चे व्यवस्थापक मनोहर धजेकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना रावते म्हणाले, विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आवश्यक ती तरतूद शासनाव्दारे करण्यात येईल. कुठल्याही स्थितीत बीओटी तत्त्वावर एसटी महामंडळाची जागा व्यावसायिक वापरासाठी देण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अधिक गतिमान व सक्षम करण्यासाठी शासनाने भांडवली खर्च म्हणून सुमारे १२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या पैशाच्या माध्यमातून एसटी विभागाचा महत्त्वाच्या मूलभूत बाबींसाठी उपयोग करून कायापालट करण्यात येणार आहे. एसटी बसने प्रवास करताना अपघात झाल्यास शासनाकडून प्रवाशास तत्काळ मदत म्हणून १० लाखांचा विमा देण्यात येणार आहे. तसेच चालक - वाहकांना अपघात झाल्यास त्यांचा वारसांना १० लाख रुपयाचा विमा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे रावते यांनी सांगितले. आ. सुनील देशमुख, आ. रवि राणा यांचीसुध्दा मार्गदर्शनपर समायोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक व्यवस्थापक मधुकर पठारे, तर सूत्रसंचालन ज्योती तोटेवार व आभार विभाग नियंत्रक राजेश अडोकार यांनी मानले. यावेळी उपयंत्र अभियंता अविनाश राजगुरे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खांडेकर, प्रादेशिक अभियंता मानिक राठोड, परिवहन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच एस.टी. महामंडळ कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मिनीबस सेवा सुरू करण्याची पोटेंची सूचनापरिवहन विभागाच्या ज्या चालक-वाहक कर्मचाऱ्यांनी किरकोळ अपहार केला अशा सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीत सामावून घेण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय मंत्र्यांनी घेतला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना फार मोठा धीर मिळाला आहे. एसटी विभागाने ग्रामीण भागातील गोर-गरीब व मजुरांच्या मुलांना शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येणे सोईचे व्हावे यासाठी ३० आसनी मिनीबस सुरू कराव्यात तसेच सर्व सामांन्यांना परवडणार अशी बससेवा परिवहन विभागाव्दारे पुरविण्यात यावी, अशी सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी महामंडळाला दिल्या.