शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बहिरम यात्रा पालटतेय रुपडे, प्रबोधनात्मक परंपरेचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:46 IST

मावळत्या वर्षाची रात्र व नववर्षाची पहाट, हंडी आणि ब्रँडीने साजरी करणे ही बहीरम यात्रेतील आजवरची परंपरा. अलिकडच्या काळात ही परंपरा मोडित निघताना दिसत आहे.

ठळक मुद्देप्रसादाची रेलचेल : आनंदोत्सवात महिलांचाही सहभाग, दर रविवारी वाढतेय गर्दी

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : मावळत्या वर्षाची रात्र व नववर्षाची पहाट, हंडी आणि ब्रँडीने साजरी करणे ही बहीरम यात्रेतील आजवरची परंपरा. अलिकडच्या काळात ही परंपरा मोडित निघताना दिसत आहे. यात्रेचा फेरफटका मारला असताना हंडीच्या जागी रोडग्यांचा धूर यात्रेत दिसून आला. त्यामुळे बहीरम बुवाच्या भक्तांनी आपला नववर्षाचा शुभारंभ बहीरम बुवाचा आशीर्वाद व रोडग्याचा प्रसाद घेऊन केले.यापूर्वी या यात्रेतील ३१ डिसेंबरची रात्र व नववर्षाची पहाट ही मास आणि मद्य शौकिनांसाठी पर्वनीच असायची. त्यातच आंबटशौकिनांसाठी तमाशाची ‘राहुटी’ अधिकच झिंग आणायची. परंतु आ. बच्चू कडू यांनी अनेकांचा विरोध पत्करून यात्रेतील तमाशे कायमस्वरुपी बंद केले. यासाठी त्यांना पोलीस व आरोग्य विभागाने शेवटपर्यंत साथ दिली. त्यामुळे न्यायालयीन लढाई ही यशस्वी झाली. त्यामुळे बहिरम यात्रेला आध्यात्मिक, पारिवारिक व प्रबोधनात्मक यात्रा अशी नवी ओळख मिळाली. परिणामी बहीरम यात्रेत पूर्वीपेक्षा महिलांचा सहभाग हल्ली मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.आज बहीरम यात्रा खऱ्या अर्थाने पारिवारिक झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसणाऱ्या रोडगे पार्टीच्या धुरावरून दिसून येत होते. नववर्षाच्या पहिल्या दिनी हजारो कुटूंब सहपरिवार भांडे तलावाच्या काठावरील मोकळ्या जागेत आपले बस्तान मांडून खमंग वांग्याची भाजी व रोडग्याची तयारी करीत होते. रोडगा व भाजी तयार झाल्यानंतर सर्वांनीच हा नैवेद्य आधी सहकुटूंब बहीरम बुवाला दाखविला. नैवेद्य दाखविताना हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचे समृद्धीचे व आनंदाचे जाऊ दे असा आशीर्वादही बहीरमबुवाला मागीतला. नंतर सर्वांनी सामूहिकरित्या रोडगा व भाजी प्रसाद म्हणून आनंदाने ग्रहन केला. नववर्षाच्या पहिल्या दिवसाचा हा आनंद प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.मिळाला शासकीय पूजेचा मानतमाशा बंदीच्या पूर्वी ही यात्रा हवशा, गवशा, नवशा व आंबटशौकिनांसाठी प्रसिद्ध होती. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी त्यांच्या अध्यक्ष काळात शासन व प्रशासनाला हाताशी धरून या यात्रेला ‘शासकीय जत्रेचे’ स्वरूप दिले. बहीरम बुवाला शासकीय पुजेचा मानही मिळवून दिला. या जत्रेच्या माध्यमातून शासनाच्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहचविल्या. हे प्रयत्न पुढेही सुरू राहण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी राजकारण विसरून एकत्र येण्याची गरज आहे.हंडी शौकीन सिताफळाच्या बनातहंडी आणि मद्याची परंपरा जपणारे आजही बहीरम यात्रेत आहेत. या शौकीनांना आज यात्रेचे स्वरूप बदलल्यामुळे आपली हौस पूर्ण करून घेण्यासाठी काशी तलाव परिसरातील सिताफळाच्या घनदाट बनाचा आधार घ्यावा लागला. या घनदाट वनात हंडी शौकीनांनी ठिकठिकाणी आपले बस्तान मांडून नववर्षाचा जल्लोष साजरा केला.