शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
2
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
3
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
4
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
5
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
6
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
7
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी भेटणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
8
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
9
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
10
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
11
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
12
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
13
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
14
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
15
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
16
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
17
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
18
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
19
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
20
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला

तीन दिवसांत ट्रान्सफार्मर बसवा, अन्यथा खैर नाही

By admin | Updated: November 22, 2015 00:06 IST

प्रत्येक बैठकीत जिल्ह्यात ‘आॅल इज वेल’ अशी स्थिती दर्शविता, वस्तूस्थिती मात्र वेगळीच आहे.

पालकमंत्र्यांचा रूद्रावतार : शेतकरी मरत असताना तुमचा लाड कशाला?अमरावती : प्रत्येक बैठकीत जिल्ह्यात ‘आॅल इज वेल’ अशी स्थिती दर्शविता, वस्तूस्थिती मात्र वेगळीच आहे. शेतकरी मरत असताना तुमचा लाड कशासाठी, तीन दिवसांत जिल्ह्यात ट्रॉन्सफार्मर बसले नाही तर तुमची खैर नाही. अशा शब्दांत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महावितरणच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.शेतकऱ्यांशी व्यवस्थित बोलणे शिका, तुम्हीदेखील शेतकऱ्यांचेच पुत्र आहात, कास्तकारांनी संयम सोडला तर तुमची काय गत करेल अन् मी त्या शेतकऱ्यासोबत राहील तुमची पाठराखण करणार नाही. मात्र तुम्हाला कोणी त्रास देत असतील तर मला सांगा. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे ना. पोटे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.तुम्हाला शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही काय? ज्याला नोकरी करायची नाही त्याने खुशाल निघून जावे, आठ दिवसांत कामे करा अन्यथा नोकऱ्या सोडा, सामूहिक राजीनामे द्या, माझ्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे, शेतकरी जगला पाहिजे. त्यांच्यासाठी पालकमंत्री म्हणून काहीही करावयाची आपली तयारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अमरावती जिल्हा गाजतो आहे, हा काय तमाशा तुम्ही लावलाय. यापुढे शेतकऱ्याची तक्रार यायला नको, अशी तंबी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. तीन दिवसांत ट्रान्सफार्मर बसायला पाहिजे. उपलब्ध कुठे आहे सांगा, आपण उचलून लावू. शेती पिकांना पाण्याची आवश्यकता आहे ज्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिले आहे. ती पंप सुरू राहिले पाहिजे, जलशिवारातून कामे झालीत. मात्र विजच नसेल तर शेतकऱ्यांना त्याचा काय उपयोग होणार साधे ऐबी स्विच व्यवस्थित नाही, जेव्हा हे पाहतो तेव्हा लाज वाटते साधी कामे होत नसल्यास तुमची जबाबदारी काय? तुम्ही राजीनामा देऊन मोकळे व्हा, नवीन तरूण येतील, असे ते म्हणाले.हयगय खपवून घेणार नाहीअमरावती : पालकमंत्री पोटे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडूुन विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, आ.रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी किरण गित्ते, विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता रंगारी, अधीक्षक अभियंता पाटील व घुगल तसेच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ना. पोटे म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांची शेती जगवायची आहे. शासनापुढे शेतकरी महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून कृषी वीज जोडण्या, ट्रान्सफार्मर दुरुस्त करणे, बदलणे आदी कामे तीन दिवसांत पूर्ण करावीत, अशी ताकिद दिली आहे. मुख्य अभियंता रंगारी यांनी जिल्ह्यात ६,३०,४१८ ग्राहक असून १,४८,१३१ शहरात तर १,६९,१६६ ग्राहक ग्रामीण भागात आहेत. ४० टक्के लोड कृषीचा आहे. १,०८,७१८ कृषी ग्राहक असून ४,७५,००० घरगुती वापर असल्याची माहिती त्यांनी दिली. इन्फ्रा-२ अंतर्गत २०५ कोटी रुपये मंजुू असून १८ जानेवारी, २०१७ पर्यंत कामे पूर्ण होणार आहेत. याशिवाय इन्फ्रा-२ साठी अतिरिक्त ८०० कोटी, विशेष पॅकेज म्हणून ३९ कोटी, अतिरिक्त विशेष पॅकेजसाठी ६३ कोटी असे एकूण ८४७.२९ कोटी रुपयांच्या योजना मंजूर असल्याचे सांगितले.