शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

वाहतूक पोलिसांनी वाहनचालकाला डांबले

By admin | Updated: December 20, 2015 00:05 IST

माझी दुचाकी नो-पार्किंगमध्ये नव्हतीच. तुम्ही ती का उचलली,

वाहतूक शाखेतील धक्कादायक प्रकार : मोबाईल हिसकावला, गाडगेनगर पोलिसांनाही पाचारणअमरावती : माझी दुचाकी नो-पार्किंगमध्ये नव्हतीच. तुम्ही ती का उचलली, असा प्रश्न विचारणाऱ्या एका जबाबदार वाहनचालकाला वाहतूक पोलिसांनी पाऊ ण तास चक्क डांबून ठेवले. पारदर्शक कारभाराची हमी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना दिलेली असताना हुकूमशाहीत शोभावा, असा हा प्रकार येथील इर्विन चौकातील वाहतूक शाखा कार्यालयात शनिवारी घडला. मणिपूर कॉलनीतील रहिवासी अमोल काकडे (३५) हे राजापेठ चौकात काही कामानिमित्त आले होते. दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास त्यांनी राजापेठ चौकातील गुलशन मार्केटसमोर पार्किंगमध्ये दुचाकी (एम.एच. डब्ल्यू ७६८०) उभी केली. काही वेळानंतर दुचाकी तेथे नव्हती. वाहतूक पोलिसांनी येथील दुचाकी उचलून नेल्याचे कळल्यावर अमोल यांनी इर्विन चौकातील वाहतूक शाखेचे कार्यालय गाठले. दुचाकी नो-पार्किंगमध्ये नसतानाही पोलिसांनी गाडी आणली कशी, असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला. माझी चूक नाही. माझी गाडी त्वरित परत द्या, असा आग्रह अमोलने धरला. पोलीस अमोलच्या प्रश्नाने बिथरले होतेच. दंड भरल्याशिवाय गाडी परत मिळणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. अमोल प्रश्नावर प्रश्न उपस्थित करीत असल्याचे बघून उपस्थित पोलिसांनी त्यांना घेराव घातला. अमोल यांना आरोपीप्रमाणे ओढत-ओढत कार्यालयातील एका खोलीत लोटले गेले. बाहेरून दार लावण्यात आले. अमोल यांना सुमारे पाऊ ण तास डांबून ठेवण्यात आले. वाहने उचलणाऱ्या व्यक्तीने अमोलजवळील मोबाईल हिसकावला व फेकल्याचा आरोप अमोलचा आहे. हा तमाम प्रकार वाहतूक पोलीस निरीक्षक नीलिमा आरज यांच्यासमोर घडला. अमोलला ताब्यात देण्यासाठी गाडगेनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. तुरुंगातच जायची वेळ आल्याने अमोलने दंड भरून दुचाकी सोडवून घेतली. गाडगेनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. हीच का लोकाभिमुख पोलिसिंग?अमरावती : वाहतूक शाखेत कुणी वाहनचालक आक्षेप वा तक्रार घेऊन आल्यास त्यांची तक्रार नोंदवून घ्यायला हवी. तो प्रत्येक नागरिकाचा अधिकारच आहे. पोलीस झुंडशाहीप्रमाणे कुण्या सामान्य माणसावरच तुटून पडत असतील, अपमानित करीत असतील, डांबून ठेवत असतील तर ही पोलिसिंग लोकाभिमुख म्हणायची काय?तर कारवाई काय केली?संबंधित वाहनचालकाने हुज्जत घातली असेल, तर पोलिसांनी काय कारवाई केली. त्या इसमाने सरकारी कामात अडथडा केला असल्यास भादंविचे कलम ३५३ आणि १८६ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. तथापि १३० रुपयांचा दंड वसूल करून जर वाहतूक पोलिसानी सोडले तर, तो दोषी कसा असा प्रश्न सुप्रसीध्द विधी तज्ज्ञ अनिल विश्वकर्मा यांनी उपस्थित केला. प्रश्न उपस्थित करण्याचा आणि माहिती मिळविण्याचा भारतीय नागरिकांना संवैधानिक अधिकार आहे. एक तर तो गुन्हेगार असेल तरच ताब्यात घेणे शक्य आहे. जर तो गुन्हेगाराच नाही, तर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या नैतीक अधिकाराचे हनन करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. गोंधळ घालणाऱ्या त्या युवकाची दुचाकी नो-पार्किंगमधून उचलली. तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने कर्मचाऱ्यांशीही वाद घातला. त्यामुळे कठोर भूमिका घ्यावी लागली. - नीलिमा आरज, पोलीस निरीक्षक तथा प्रभारी एसीपी, वाहतूक शाखा.माझी दुचाकी सिंगल लाईन पार्किंगमध्येच होती. मात्र, तरीही ती पोलिसांनी उचलून नेली. हा अन्यायच आहे. मी जाब विचारला असता मला पोलिसांनी आरोपीसारखी वागणूक दिली. तब्बल तासभर वाहतूक शाखा कार्यालयातील एका खोलीत डांबून ठेवले.- अमोल काकडे, दुचाकी चालक. आयुक्तांच्या कार्यप्रणालीवर गालबोटपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर हे संवेदनशील पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या योजना आणि उद्देश लोकाभिमुख पोलिसिंगचेच आहेत. तथापि त्यांच्या अधिनस्थ कार्यरत अधिकारी कर्मचारी आयुक्तांच्या उपरोक्ष अधिकारांचा असा गैरवापर करीत असल्याने बोटे उठतात ती आयुक्तांच्याच कार्यप्रणालीवर !