शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांनी वाहनचालकाला डांबले

By admin | Updated: December 20, 2015 00:05 IST

माझी दुचाकी नो-पार्किंगमध्ये नव्हतीच. तुम्ही ती का उचलली,

वाहतूक शाखेतील धक्कादायक प्रकार : मोबाईल हिसकावला, गाडगेनगर पोलिसांनाही पाचारणअमरावती : माझी दुचाकी नो-पार्किंगमध्ये नव्हतीच. तुम्ही ती का उचलली, असा प्रश्न विचारणाऱ्या एका जबाबदार वाहनचालकाला वाहतूक पोलिसांनी पाऊ ण तास चक्क डांबून ठेवले. पारदर्शक कारभाराची हमी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना दिलेली असताना हुकूमशाहीत शोभावा, असा हा प्रकार येथील इर्विन चौकातील वाहतूक शाखा कार्यालयात शनिवारी घडला. मणिपूर कॉलनीतील रहिवासी अमोल काकडे (३५) हे राजापेठ चौकात काही कामानिमित्त आले होते. दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास त्यांनी राजापेठ चौकातील गुलशन मार्केटसमोर पार्किंगमध्ये दुचाकी (एम.एच. डब्ल्यू ७६८०) उभी केली. काही वेळानंतर दुचाकी तेथे नव्हती. वाहतूक पोलिसांनी येथील दुचाकी उचलून नेल्याचे कळल्यावर अमोल यांनी इर्विन चौकातील वाहतूक शाखेचे कार्यालय गाठले. दुचाकी नो-पार्किंगमध्ये नसतानाही पोलिसांनी गाडी आणली कशी, असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला. माझी चूक नाही. माझी गाडी त्वरित परत द्या, असा आग्रह अमोलने धरला. पोलीस अमोलच्या प्रश्नाने बिथरले होतेच. दंड भरल्याशिवाय गाडी परत मिळणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. अमोल प्रश्नावर प्रश्न उपस्थित करीत असल्याचे बघून उपस्थित पोलिसांनी त्यांना घेराव घातला. अमोल यांना आरोपीप्रमाणे ओढत-ओढत कार्यालयातील एका खोलीत लोटले गेले. बाहेरून दार लावण्यात आले. अमोल यांना सुमारे पाऊ ण तास डांबून ठेवण्यात आले. वाहने उचलणाऱ्या व्यक्तीने अमोलजवळील मोबाईल हिसकावला व फेकल्याचा आरोप अमोलचा आहे. हा तमाम प्रकार वाहतूक पोलीस निरीक्षक नीलिमा आरज यांच्यासमोर घडला. अमोलला ताब्यात देण्यासाठी गाडगेनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. तुरुंगातच जायची वेळ आल्याने अमोलने दंड भरून दुचाकी सोडवून घेतली. गाडगेनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. हीच का लोकाभिमुख पोलिसिंग?अमरावती : वाहतूक शाखेत कुणी वाहनचालक आक्षेप वा तक्रार घेऊन आल्यास त्यांची तक्रार नोंदवून घ्यायला हवी. तो प्रत्येक नागरिकाचा अधिकारच आहे. पोलीस झुंडशाहीप्रमाणे कुण्या सामान्य माणसावरच तुटून पडत असतील, अपमानित करीत असतील, डांबून ठेवत असतील तर ही पोलिसिंग लोकाभिमुख म्हणायची काय?तर कारवाई काय केली?संबंधित वाहनचालकाने हुज्जत घातली असेल, तर पोलिसांनी काय कारवाई केली. त्या इसमाने सरकारी कामात अडथडा केला असल्यास भादंविचे कलम ३५३ आणि १८६ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. तथापि १३० रुपयांचा दंड वसूल करून जर वाहतूक पोलिसानी सोडले तर, तो दोषी कसा असा प्रश्न सुप्रसीध्द विधी तज्ज्ञ अनिल विश्वकर्मा यांनी उपस्थित केला. प्रश्न उपस्थित करण्याचा आणि माहिती मिळविण्याचा भारतीय नागरिकांना संवैधानिक अधिकार आहे. एक तर तो गुन्हेगार असेल तरच ताब्यात घेणे शक्य आहे. जर तो गुन्हेगाराच नाही, तर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या नैतीक अधिकाराचे हनन करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. गोंधळ घालणाऱ्या त्या युवकाची दुचाकी नो-पार्किंगमधून उचलली. तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने कर्मचाऱ्यांशीही वाद घातला. त्यामुळे कठोर भूमिका घ्यावी लागली. - नीलिमा आरज, पोलीस निरीक्षक तथा प्रभारी एसीपी, वाहतूक शाखा.माझी दुचाकी सिंगल लाईन पार्किंगमध्येच होती. मात्र, तरीही ती पोलिसांनी उचलून नेली. हा अन्यायच आहे. मी जाब विचारला असता मला पोलिसांनी आरोपीसारखी वागणूक दिली. तब्बल तासभर वाहतूक शाखा कार्यालयातील एका खोलीत डांबून ठेवले.- अमोल काकडे, दुचाकी चालक. आयुक्तांच्या कार्यप्रणालीवर गालबोटपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर हे संवेदनशील पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या योजना आणि उद्देश लोकाभिमुख पोलिसिंगचेच आहेत. तथापि त्यांच्या अधिनस्थ कार्यरत अधिकारी कर्मचारी आयुक्तांच्या उपरोक्ष अधिकारांचा असा गैरवापर करीत असल्याने बोटे उठतात ती आयुक्तांच्याच कार्यप्रणालीवर !