शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

मर्च्युरी पॉर्इंटवरील वाहतूक ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:23 IST

इर्विन चौकाजवळील मर्च्युरी पॉर्इंट अपघातप्रवण स्थळावर प्राणहानी झाल्यामुळे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. आता सिमेंट रस्ता पूर्ण झाल्यामुळे तो रस्ता पूर्ववत झाला. मात्र, तेथे पूर्वीप्रमाणेच नियमबाह्य वाहतूक होत असल्यामुळे आणखी एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनचालक सर्रास विरुद्ध दिशेने वाहने दामटत असल्याने अपघाताला आमंत्रण आपसुक मिळत आहे. याकडे वाहतूक पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्देविरुद्ध दिशेच्या वाहतुकीचा सपाटा : पुन्हा मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इर्विन चौकाजवळील मर्च्युरी पॉर्इंट अपघातप्रवण स्थळावर प्राणहानी झाल्यामुळे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. आता सिमेंट रस्ता पूर्ण झाल्यामुळे तो रस्ता पूर्ववत झाला. मात्र, तेथे पूर्वीप्रमाणेच नियमबाह्य वाहतूक होत असल्यामुळे आणखी एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनचालक सर्रास विरुद्ध दिशेने वाहने दामटत असल्याने अपघाताला आमंत्रण आपसुक मिळत आहे. याकडे वाहतूक पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.इर्विन चौकाकडून उड्डाणपुलाकडे जाणाऱ्यांसाठी मर्च्युरी पॉइंटवरून वाहतूक होते. राजापेठकडून उड्डाणपूल मार्गे इर्विन चौकाकडे येण्यासाठीही मर्च्युरी पॉइंटवरून जावे लागते. याशिवाय रेल्वे स्थानकाकडून इर्विन चौकाकडे जाण्यासाठीही मर्च्युरी पॉइंटवरून जावे लागतात. या तिन्ही बाजूंची वाहतूक मर्च्युरी पॉइंटवरून होत असल्याने प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे.अनेक वाहनचालक इर्विन चौकाकडून जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे जाण्यासाठी विरुद्ध दिशेने भरधाव जातात. याशिवाय रेल्वेस्थानकाकडून जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे जाण्यासाठीही विरुद्ध दिशेनेच वाहतूक सुरू आहे. ही सर्व वाहतूक मर्च्युरी पॉइंटवरून होत असल्याने प्रचंड कोंडी निर्माण होत असल्याचे दररोज पाहायला मिळत आहे. अशाच विचित्र वाहतुकीमुळे मर्च्युरी पॉइंटवर यापूर्वी दोन गंभीर अपघातात दोघांचे बळी गेले.आतापर्यंत मर्च्युरी पॉइंटवर शेकडो अपघात घडलेत. मात्र, दोन वेगवेगळ्या गंभीर अपघातात दोघांचे जीव गेल्यामुळे हा मार्ग बॅरिकेडद्वारा बंद करण्यात आला होता. त्यातच सिमेंट रोडचे काम सुरू झाले होते. रस्त्याची कामे पूर्ण झाल्यामुळे आता हा मार्ग पूर्ववत करण्यात आला. मात्र, तेथील वाहतूकही पूर्वीप्रमाणेच नियमबाह्य पद्धतीने सुरू झाली आहे.आणखी एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याकडे वाहतूक शाखेसह सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे.