शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राँग साईड वाहतुकीमुळे राजापेठ चौकात 'ट्रॅफिक जाम’

By admin | Updated: February 13, 2017 00:06 IST

रॉग साईड वाहतूकीमुळे वाहनचालकांना दररोज राजापेठ चौकात 'ट्रॅफिक जाम'चा सामना करावा लागत आहे.

अपघात वाढले : नो-पार्किंग झोनच्या अधिसूचनेचा फज्जाअमरावती : रॉग साईड वाहतूकीमुळे वाहनचालकांना दररोज राजापेठ चौकात 'ट्रॅफिक जाम'चा सामना करावा लागत आहे. याविरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघातांसोबतच वाहनाचालकांचे वादविवाद वाढले आहे. उड्डाणपुलाचा परिसर नो-पार्किंग झोन असतानाही या अधिसूचनेचा फज्जा वाहनचालक उडवीत आहे. हा प्रकार सर्रारपणे सुरू असतानाही वाहतूक पोलिसांनी निगरगट्ट भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. लोकसंख्या वाढीप्रमाणेच दिवसेंदिवस शहरातील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात जिकडेतिकडे वाहनांची वर्दळ सुरु असताना वाहन चालक बेभान होऊन वाहतूक नियमांचे सर्रार उल्लंघन करीत आहे. यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस विभागाची आहे. मात्र, शहरातील वाहतूक नियंत्रणाचा बोजबारा वाजला आहे. राजकमल व राजापेठ हे दोन्ही चौक शहरातील मुख्य वाहतुकीचे केंद्र असून याच ठिकाणी सर्वाधिक अस्तव्यस्त वाहतुकीचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच राजापेठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे काही मार्गामध्ये बदल करण्यात आले आहे. एकतर्फी मार्ग सुरुकेल्यानंतरही वाहन चालक कोणालाही न जुमानता सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहे. राजापेठकडून बडनेरा जाणाऱ्या मार्गाने वाहन चालविण्यास नागरिकांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. कुशल आॅटोसमोरील वळण मार्गाने वाहनचालक थेट आपली वाहन राजापेठ रेल्वे क्रॉन्सिंगकडे आणत असल्यामुळे राजापेठकडून बडनेराकडे जाणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहे. विरुध्द दिशेने ही वाहने भारतीय महाविद्यालयाकडून रेल्वे कॉन्सिंगकडे येत असल्यामुळे दररोज वाहतुकीचा खोळंबा होत असून अपघातही घडत आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असतानाही पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई न करण्याचा जणू संकल्पच घेतला की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. पोलिसांच्या या निगरगट्ट भुमिकेमुळे सर्वसामान्य जननेचा जीव टांगणीवर आला आहे. (प्रतिनिधी)रस्त्यावर हातगाडी चालकांचेही अतिक्रमणराजापेठकडून बडनेराकडे जाणाऱ्या मार्गावर विरुद्ध दिशेने वाहतूक तर होतेच. त्यातच रस्त्यावरील हातगाडी चालकांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. भारतीय महाविद्यालयात दिवसभर विद्यार्थ्यांची वर्दळ सुरु असते. त्यामुळे विद्यार्थी भरधाव वेगाने वाहन विरुध्द दिशेने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. ही बाब वाहन चालकांसाठी घातक ठरणारी असून एखाद्या मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.