शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

राँग साईड वाहतुकीमुळे राजापेठ चौकात 'ट्रॅफिक जाम’

By admin | Updated: February 13, 2017 00:06 IST

रॉग साईड वाहतूकीमुळे वाहनचालकांना दररोज राजापेठ चौकात 'ट्रॅफिक जाम'चा सामना करावा लागत आहे.

अपघात वाढले : नो-पार्किंग झोनच्या अधिसूचनेचा फज्जाअमरावती : रॉग साईड वाहतूकीमुळे वाहनचालकांना दररोज राजापेठ चौकात 'ट्रॅफिक जाम'चा सामना करावा लागत आहे. याविरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघातांसोबतच वाहनाचालकांचे वादविवाद वाढले आहे. उड्डाणपुलाचा परिसर नो-पार्किंग झोन असतानाही या अधिसूचनेचा फज्जा वाहनचालक उडवीत आहे. हा प्रकार सर्रारपणे सुरू असतानाही वाहतूक पोलिसांनी निगरगट्ट भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. लोकसंख्या वाढीप्रमाणेच दिवसेंदिवस शहरातील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात जिकडेतिकडे वाहनांची वर्दळ सुरु असताना वाहन चालक बेभान होऊन वाहतूक नियमांचे सर्रार उल्लंघन करीत आहे. यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस विभागाची आहे. मात्र, शहरातील वाहतूक नियंत्रणाचा बोजबारा वाजला आहे. राजकमल व राजापेठ हे दोन्ही चौक शहरातील मुख्य वाहतुकीचे केंद्र असून याच ठिकाणी सर्वाधिक अस्तव्यस्त वाहतुकीचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच राजापेठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे काही मार्गामध्ये बदल करण्यात आले आहे. एकतर्फी मार्ग सुरुकेल्यानंतरही वाहन चालक कोणालाही न जुमानता सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहे. राजापेठकडून बडनेरा जाणाऱ्या मार्गाने वाहन चालविण्यास नागरिकांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. कुशल आॅटोसमोरील वळण मार्गाने वाहनचालक थेट आपली वाहन राजापेठ रेल्वे क्रॉन्सिंगकडे आणत असल्यामुळे राजापेठकडून बडनेराकडे जाणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहे. विरुध्द दिशेने ही वाहने भारतीय महाविद्यालयाकडून रेल्वे कॉन्सिंगकडे येत असल्यामुळे दररोज वाहतुकीचा खोळंबा होत असून अपघातही घडत आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असतानाही पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई न करण्याचा जणू संकल्पच घेतला की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. पोलिसांच्या या निगरगट्ट भुमिकेमुळे सर्वसामान्य जननेचा जीव टांगणीवर आला आहे. (प्रतिनिधी)रस्त्यावर हातगाडी चालकांचेही अतिक्रमणराजापेठकडून बडनेराकडे जाणाऱ्या मार्गावर विरुद्ध दिशेने वाहतूक तर होतेच. त्यातच रस्त्यावरील हातगाडी चालकांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. भारतीय महाविद्यालयात दिवसभर विद्यार्थ्यांची वर्दळ सुरु असते. त्यामुळे विद्यार्थी भरधाव वेगाने वाहन विरुध्द दिशेने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. ही बाब वाहन चालकांसाठी घातक ठरणारी असून एखाद्या मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.