शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जयस्तंभ चौकात वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST

अमरावती : शहरातील सर्वाधिक वर्दळीचे चौक मानले जाणाऱ्या जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाखाली सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने केवळ ८ फुटाच्या बोळीतून ...

अमरावती : शहरातील सर्वाधिक वर्दळीचे चौक मानले जाणाऱ्या जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाखाली सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने केवळ ८ फुटाच्या बोळीतून वाहन काढावे लागत आहे. त्यामुळे राजकमल चौकातून येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढल्याने आठवडाभरापासून वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

बँका, कपडा मार्केटसह विविध वस्तूंची शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून जयस्तंभ चौक ओळखला जातो. या मार्गावरील गर्दी पाहता शासनाने उड्डाणपुलाचीदेखील निर्मिती केली आहे. मात्र, आता रस्ता सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसांपासून वनवे मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच कामात अडथळा येऊ नये म्हणून राजकमल चौक ते जयस्तंभकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवेशबंदचे फलक लागलेले असतानाही वाहतूक सुरूच आहे. एवढेच नव्हे तर वाहतूक पोलीसदेखील इमानेइतबारे कर्तव्य बजावताना दिसून आले. सद्यस्थितीत या मार्गावरून जाताना वाहनधारकांना चालू स्थितीत वाहने थांबवून ठेवावी लागत आहे. त्यामुळे विनाकारण पेट्रोल जाळावे लागत असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांनी लोकमतजवळ व्यक्त केल्यात.

बॉक्स

पेट्रोलपंप अडगळीत

वर्दळीच्या या मार्गावर अनेक दिवसांपासून अगदी कमी जागेत पेट्रोलपंप असल्याने अधिकच गर्दी वाढलेली दिसून येत आहे. अशा स्थितीत अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. तसेही पेट्रोलपंप मोकळ्या जागेत असायला हवे, तेथे प्रसाधनगृहाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, असे नियम असताना जयस्तंभ चौकातील हे पेट्रोलपंप वाहतुकीस अडथळा ठरत आहे. चारही बाजूंनी वाहनांची वर्दळ राहिल्यामुळे ठिणगी उडाल्यास किंवा पार्किंगमुळे आगी लागल्यास मोठी हानी टाळता येऊ शकणार नाही, अशा प्रतिक्रिया जाणकारांच्या आहेत.