शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

जयस्तंभ चौकात वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST

अमरावती : शहरातील सर्वाधिक वर्दळीचे चौक मानले जाणाऱ्या जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाखाली सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने केवळ ८ फुटाच्या बोळीतून ...

अमरावती : शहरातील सर्वाधिक वर्दळीचे चौक मानले जाणाऱ्या जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाखाली सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने केवळ ८ फुटाच्या बोळीतून वाहन काढावे लागत आहे. त्यामुळे राजकमल चौकातून येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढल्याने आठवडाभरापासून वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

बँका, कपडा मार्केटसह विविध वस्तूंची शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून जयस्तंभ चौक ओळखला जातो. या मार्गावरील गर्दी पाहता शासनाने उड्डाणपुलाचीदेखील निर्मिती केली आहे. मात्र, आता रस्ता सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसांपासून वनवे मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच कामात अडथळा येऊ नये म्हणून राजकमल चौक ते जयस्तंभकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवेशबंदचे फलक लागलेले असतानाही वाहतूक सुरूच आहे. एवढेच नव्हे तर वाहतूक पोलीसदेखील इमानेइतबारे कर्तव्य बजावताना दिसून आले. सद्यस्थितीत या मार्गावरून जाताना वाहनधारकांना चालू स्थितीत वाहने थांबवून ठेवावी लागत आहे. त्यामुळे विनाकारण पेट्रोल जाळावे लागत असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांनी लोकमतजवळ व्यक्त केल्यात.

बॉक्स

पेट्रोलपंप अडगळीत

वर्दळीच्या या मार्गावर अनेक दिवसांपासून अगदी कमी जागेत पेट्रोलपंप असल्याने अधिकच गर्दी वाढलेली दिसून येत आहे. अशा स्थितीत अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. तसेही पेट्रोलपंप मोकळ्या जागेत असायला हवे, तेथे प्रसाधनगृहाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, असे नियम असताना जयस्तंभ चौकातील हे पेट्रोलपंप वाहतुकीस अडथळा ठरत आहे. चारही बाजूंनी वाहनांची वर्दळ राहिल्यामुळे ठिणगी उडाल्यास किंवा पार्किंगमुळे आगी लागल्यास मोठी हानी टाळता येऊ शकणार नाही, अशा प्रतिक्रिया जाणकारांच्या आहेत.