शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

जयस्तंभ चौकात वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST

अमरावती : शहरातील सर्वाधिक वर्दळीचे चौक मानले जाणाऱ्या जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाखाली सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने केवळ ८ फुटाच्या बोळीतून ...

अमरावती : शहरातील सर्वाधिक वर्दळीचे चौक मानले जाणाऱ्या जयस्तंभ चौकातील उड्डाणपुलाखाली सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने केवळ ८ फुटाच्या बोळीतून वाहन काढावे लागत आहे. त्यामुळे राजकमल चौकातून येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढल्याने आठवडाभरापासून वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

बँका, कपडा मार्केटसह विविध वस्तूंची शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून जयस्तंभ चौक ओळखला जातो. या मार्गावरील गर्दी पाहता शासनाने उड्डाणपुलाचीदेखील निर्मिती केली आहे. मात्र, आता रस्ता सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसांपासून वनवे मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच कामात अडथळा येऊ नये म्हणून राजकमल चौक ते जयस्तंभकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवेशबंदचे फलक लागलेले असतानाही वाहतूक सुरूच आहे. एवढेच नव्हे तर वाहतूक पोलीसदेखील इमानेइतबारे कर्तव्य बजावताना दिसून आले. सद्यस्थितीत या मार्गावरून जाताना वाहनधारकांना चालू स्थितीत वाहने थांबवून ठेवावी लागत आहे. त्यामुळे विनाकारण पेट्रोल जाळावे लागत असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांनी लोकमतजवळ व्यक्त केल्यात.

बॉक्स

पेट्रोलपंप अडगळीत

वर्दळीच्या या मार्गावर अनेक दिवसांपासून अगदी कमी जागेत पेट्रोलपंप असल्याने अधिकच गर्दी वाढलेली दिसून येत आहे. अशा स्थितीत अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. तसेही पेट्रोलपंप मोकळ्या जागेत असायला हवे, तेथे प्रसाधनगृहाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, असे नियम असताना जयस्तंभ चौकातील हे पेट्रोलपंप वाहतुकीस अडथळा ठरत आहे. चारही बाजूंनी वाहनांची वर्दळ राहिल्यामुळे ठिणगी उडाल्यास किंवा पार्किंगमुळे आगी लागल्यास मोठी हानी टाळता येऊ शकणार नाही, अशा प्रतिक्रिया जाणकारांच्या आहेत.