शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

संचारबंदीतही ट्राफिक जाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:12 IST

फोटो पी २१ चांदूर बाजार चांदूर बाजार : जिल्हा प्रशासनाने कडक संचारबंदी पुकारली असली तरी शहरातील बाजारपेठेत अनेक व्यवसाय ...

फोटो पी २१ चांदूर बाजार

चांदूर बाजार : जिल्हा प्रशासनाने कडक संचारबंदी पुकारली असली तरी शहरातील बाजारपेठेत अनेक व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यंगस्टार चौकात मोठ्या प्रमाणात फळ व भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने लागल्याने संचारबंदी संपुष्टात आली की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. हा सर्व प्रकार बघता, तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखला जाणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे.

जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदीचे आदेश लागू केले आहे. ही संचारबंदी अधिक कठोरपणे राबविण्यात यावी, याकरिता पेट्रोल पंप व जीवनावश्यक वस्तूंची दुकानेसुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाला झुगारून अनेक व्यावसायिक, फेरीवाले, भाजीपाला व फळविक्रेते दोन दिवसांपासून यंगस्टार चौक ते महादेव मंदिर परिसरात दुकाने थाटत आहेत. येथे भाजीपाला व फळ विक्रेत्यांची २० ते २५ दुकाने लागत असल्याने या परिसरात खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड उडत आहे. या गैरप्रकारामुळे परिसरात रस्ता संकीर्ण झाला असून, या मार्गावर होणारी वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. नागरिक रस्त्यावर उतरून संचारबंदीचा फज्जा उडवित आहेत. अनेक फळ व भाजीपाला विक्रेते पोलीस व पालिका प्रशासनाला न जुमानता सर्रास व्यवसाय करताना दिसत आहे. यावर निर्बंध घालण्यास पालिका प्रशासन कमी पडत असून, पोलिसांचा मदतीशिवाय या दुकानदारांवर कारवाई करणे कठीण होत असल्याची माहिती पालिका कर्मचाऱ्यांनी दिली.

कारवाई व्हावी

शहरात अनेक दुकानदार आपला व्यवसाय लपून-छपून करीत असून, यावर पालिका प्रशासन सातत्याने कारवाई करीत आहे. मात्र, हातगाडीवर फळ व भाजीपाला दुकानदार आपला व्यवसाय सर्रास थाटात असल्याने पालिका प्रशासन याच्यावर कार्यवाही करण्यास धजावत नाही. मंगळवारी सकाळी यंगस्टार चौकामध्ये हातगाडी दुकानदारांनी आपली दुकाने थाटली असता, नायब तहसीलदार देवेंद्र सवाई, तहसील कर्मचारी नीलेश फुटाणे व एक पोलीस शिपाई या दुकानदारांना हटविण्यास धडकले. पालिका प्रशासनाचे या कामासाठी नेमलेले आठ कर्मचारी पोलिसांच्या प्रतीक्षेत ठाण्यात बसले होते. या गंभीर बाबीकडे तालुका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.