शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:33 IST

शहरातील मुख्य मार्गांवरील वाहतूककोंडीने अमरावतीकर हैराण झाले आहेत. सिमेंट रस्त्यांचे बांधकाम डोकेदुखी ठरली आहे. जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका वाहनचालकांनाच बसत आहे. सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाअभावी दररोज नागरिकांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यांवरून वाहने न्यावी लागत आहेत.

ठळक मुद्देढिसाळ नियोजन पीडब्ल्यूडी, पोलिसांचा समन्वय नाहीच

अमरावती : शहरातील मुख्य मार्गांवरील वाहतूककोंडीने अमरावतीकर हैराण झाले आहेत. सिमेंट रस्त्यांचे बांधकाम डोकेदुखी ठरली आहे. जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका वाहनचालकांनाच बसत आहे. सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाअभावी दररोज नागरिकांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यांवरून वाहने न्यावी लागत आहेत.शहराच्या विकासात्मक कामकाजात अमरावतीकर चांगलेच भरडले जात आहेत. अमरावती शहरात कोट्यवधी खर्चून २२ किलोमीटरच्या सिमेंट रस्त्यांची कामे सद्यस्थितीत शहरात सुरू आहेत. मात्र, या बांधकामामुळे वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. बडनेरा रोडवरील समर्थ हायस्कूल ते गुलशन प्लाझा, नवाथे ते धन्वंतरी, पंचवटी ते पीडीएमसी, कॉटन मार्केट रोड, कठोरा मार्ग, राजापेठ पोलीस ठाण्यासमोर अशा ठिकाणी सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे वाहतुकीची ऐशीतैशी झाल्याचे चित्र आहे. वाहतूककोंडीसह अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. पंचवटी चौकातील रस्त्याच्या कामामुळे नागपूरकडून दाखल होणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. एकतर्फी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू असल्यामुळे सर्वच मार्गांवर प्रचंड कोंडी निर्माण होते. पादचाºयांना तर रस्ताच उतरला नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक मार्गावर कर्कश्श हॉर्नचा आवाज, प्रचंड गोंधळ, वाहनचालकांचे वाद, अपघात अशा स्थितीतून अमरावतीकरांना दररोज जावे लागत आहे.अपघात वाढलेएकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू असल्यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. एकाच रस्त्यांवरून जाणाऱ्या दोन्ही बाजूची वाहने अनियंत्रित होऊन एकमेकांवर धडकत आहेत.धूळ अन् प्रदूषणसिमेंट रस्त्यांच्या कामांमुळे अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात येत आहेत. त्यातच रस्त्यासाठी सिमेंटचा वापर होत असल्यामुळे हवेत माती व सिमेंटचे कण उडत आहे. हे धूलिकण श्वसनाच्या आजारास कारणीभूत ठरत आहेत.रुग्णवाहिकांना गर्दीचा फटकापंचवटी चौक असो बडनेरा रोड, दोन्ही ठिकाणच्या वाहतूक कोंडीत दररोज रुग्णवाहिका अडकल्याचे चित्र असते. यामुळे रुग्णांचेही जीव धोक्यात आले आहे. अद्याप कोणतीही अप्रिय घटना घडली नाही, हीच समाधानाची बाब आहे.पर्यायाअभावी राँगसाइड वाहतूकवाहतूककोंडीमुळे जेथून जागा मिळेल, तेथून वाहन समोर नेण्याचे प्रकार सुरू असतात. पर्याय नसल्यामुळे अनेक जण विरुद्ध दिशेनेही वाहन चालविण्यास बाध्य आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.