शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

पारंपरिक पद्धतीनेच होणार गण, गटांची प्रभाग रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 00:35 IST

राज्यात ९ डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत संपुष्टात येणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची पारंपारिक पद्धतीने प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.

आयोगाचे आदेश : प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावासाठी ३१ आॅगस्ट ‘डेडलाईन’गजानन मोहोड अमरावतीराज्यात ९ डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत संपुष्टात येणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची पारंपारिक पद्धतीने प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. प्रारुप प्रस्ताव सादर करण्याची अंतीम मुदत ३१ आॅगस्ट आहे. जिल्ह्यात १० पंचायत समितीचा यामध्ये समावेश आहे. आयोगाच्या ७ जुलै व १० जुलैच्या आदेशानुसार मार्च २०१७ या कालावधीत संपुष्टात येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी महाआॅनलाईनने विकसित केलेल्या आज्ञावलीद्वारे प्रारुप गण व गटांची रचना त्वरित सुरु करुन महाआॅनलाईनकडे हे प्रस्ताव ३१ आॅगस्टपर्यंत पाठवावे, अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आयोगाचे अवर सचिव नि.ज. वागळे यांनी ३१ आॅगस्ट रोजी पत्रान्वये दिल्या आहेत. जनगणना कार्यालयाच्या माहितीनुसार, सेन्सस टाऊनमध्ये समाविष्ट असलेले ग्रामीण क्षेत्र वगळता उर्वरित ग्रामीण क्षेत्रातील प्रगणक गटाचा तपशील व नकाशे उपलब्ध होत नसल्याने अशा परिस्थितीत ग्रामीण क्षेत्रातील प्रगणक गटाच्या तपशीलाच्या अभावी जि. प, व पं. स.ची प्रभाग रचना संगणकीय प्रणालीने करता येणे शक्य नसल्याने सद्यस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती गण व गटाच्या रचना पारंपारिक पद्धतीने करण्यात याव्यात, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रत्येक गण तयार करताना पंचायत समिती क्षेत्राची एकूण लोकसंख्या भागीले त्या पंचायत समितीत देय असणारी एकूण सदस्य संख्या याप्रमाणे सरासरी लोकसंख्या काढण्यात येणार आहे. प्रत्येक गण या सरासरी लोकसंख्येपेक्षा १० टक्के अधिक किंवा १० टक्के कमी लोकसंख्येच्या मर्यादेत राहून तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १० पं.स. चा समावेशजिल्ह्यातील अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, वरुड, अचलपूर, चांदूरबाजार, चिखलदरा, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी या १० तालुक्यांमधील पंचायत समितीचा कार्यकाळ जून २०१७ मध्ये संपुष्टात येत असल्याने या तालुक्यामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती गण व गटांची प्रारुप रचना करण्यात येणार आहे. ११८ गणांचा होणार प्रारुप आराखडाजिल्ह्यात जून २०१७ मध्ये कालावधी संपणारी धारणी व सप्टेंबर २०१९ मध्ये कालावधी संपणाऱ्या तिवसा, चांदूररेल्वे व धारणी पंचायत समिती वगळता उर्वरित १० तालुक्यामधील ५९ जिल्हा परिषद गट व ११८ पंचायत समिती गणांचा प्रारुप प्रस्ताव आयोगाला पाठविण्यात येणार आहे. नगरपंचायतीमुळे गण, गटांची रचना आणि नाव बदलणारजिल्ह्यातील एप्रिल २०१५ मध्ये चार तालुक्याच्या मुख्यालयी नगरपंचायत स्थापित झाल्या आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये भातकुली व नांदगाव खंडेश्वर या पंचायत समितींचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने नव्याने रचनेत नगरपंचायतीचे नागरी क्षेत्र यामध्ये वगळण्यात येवून गण व गटाची रचना नव्याने होणार आहे. या तालुक्यामधील गण व गटाची रचना बदलून काही गणाचे नावात बदल होण्याची शक्यता आहे. लोकमतविशेष