शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

व्यापारी, दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक, अन्यथा दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी समूह संसर्गाची भीती बळावली ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी समूह संसर्गाची भीती बळावली आहे. त्यामुळे आता व्यापारी, दुकानदारांना येत्या दाेन आठवड्यात कोरोना चाचणी बंधनकारक आहे. निश्चित कालावधीत कोराेना चाचणी न केल्यास संबंधित दुकाने सील केली जाईल, असा आक्रमक पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

पुणे, मुंबई शहरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढली आहे. अमरावती जिल्ह्यातील समूह संसर्गाची स्थिती उद्‌भवली असून, शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील व्यापारी, दुकानदारांना त्यांच्या सहकाऱ्यांसह कोरोना चाचणी करावी लागणार आहे. यात ॲन्टिजेन, आरटीपीसीआर अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतील. काेरोना चाचणी न केल्यास सदर व्यापारी, दुकानदारांची प्रतिष्ठाने सील करणाऱ्यासह दंड आकारला जाईल. फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीपासूनच कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. मार्च महिन्यातही हीच स्थिती असून, आता व्यापारी, दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

----------------

अहवाल तपासणीसाठी स्वतंत्र पथक

व्यापारी, दुकानदारांसह त्यांच्या सहकाऱ्यांची कोरोना चाचणी केली अथवा नाही, याचा शोध घेण्यासाठी महसूल विभागाचे स्वतंत्र पथक असणार आहे. शहर, ग्रामीण अशा दोन्ही भागातील व्यापारी, दुकानदारांची ॲन्टिजेन, आरटीपीसीआर चाचणी अहवाल तपासले जातील. यादरम्यान कोरोना चाचणी न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दुकान, प्रतिष्ठान सील केले जाणार आहे. समूह संसर्ग राेखण्यासाठी व्यापारी, दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे.

-------------------

ज्येष्ठांनी लस टोचून घ्यावी

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला असून लसीची टंचाईदेखील नाही. कुंटुंबातील तरुणांनी ज्येष्ठांच्या कोरोना लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. शहर, ग्रामीण क्षेत्रात लसीकरण केंद्रांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे.

------------------

व्यापारी, दुकानदारांना येत्या दाेन आठवड्यात कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. ॲन्टिजेन, आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्या कराव्या लागतील. जे व्यापारी, दुकानदार व त्यांचे सहकारी निर्धारित वेळेत चाचणी करणार नाही, अशी दुकाने, प्रतिष्ठाने सील केले जातील.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी