शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

व्यापारी, दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक, अन्यथा दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी समूह संसर्गाची भीती बळावली ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी समूह संसर्गाची भीती बळावली आहे. त्यामुळे आता व्यापारी, दुकानदारांना येत्या दाेन आठवड्यात कोरोना चाचणी बंधनकारक आहे. निश्चित कालावधीत कोराेना चाचणी न केल्यास संबंधित दुकाने सील केली जाईल, असा आक्रमक पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

पुणे, मुंबई शहरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढली आहे. अमरावती जिल्ह्यातील समूह संसर्गाची स्थिती उद्‌भवली असून, शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील व्यापारी, दुकानदारांना त्यांच्या सहकाऱ्यांसह कोरोना चाचणी करावी लागणार आहे. यात ॲन्टिजेन, आरटीपीसीआर अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतील. काेरोना चाचणी न केल्यास सदर व्यापारी, दुकानदारांची प्रतिष्ठाने सील करणाऱ्यासह दंड आकारला जाईल. फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीपासूनच कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. मार्च महिन्यातही हीच स्थिती असून, आता व्यापारी, दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

----------------

अहवाल तपासणीसाठी स्वतंत्र पथक

व्यापारी, दुकानदारांसह त्यांच्या सहकाऱ्यांची कोरोना चाचणी केली अथवा नाही, याचा शोध घेण्यासाठी महसूल विभागाचे स्वतंत्र पथक असणार आहे. शहर, ग्रामीण अशा दोन्ही भागातील व्यापारी, दुकानदारांची ॲन्टिजेन, आरटीपीसीआर चाचणी अहवाल तपासले जातील. यादरम्यान कोरोना चाचणी न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दुकान, प्रतिष्ठान सील केले जाणार आहे. समूह संसर्ग राेखण्यासाठी व्यापारी, दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे.

-------------------

ज्येष्ठांनी लस टोचून घ्यावी

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला असून लसीची टंचाईदेखील नाही. कुंटुंबातील तरुणांनी ज्येष्ठांच्या कोरोना लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. शहर, ग्रामीण क्षेत्रात लसीकरण केंद्रांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे.

------------------

व्यापारी, दुकानदारांना येत्या दाेन आठवड्यात कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. ॲन्टिजेन, आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्या कराव्या लागतील. जे व्यापारी, दुकानदार व त्यांचे सहकारी निर्धारित वेळेत चाचणी करणार नाही, अशी दुकाने, प्रतिष्ठाने सील केले जातील.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी