शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी, दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक, अन्यथा दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी समूह संसर्गाची भीती बळावली ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी समूह संसर्गाची भीती बळावली आहे. त्यामुळे आता व्यापारी, दुकानदारांना येत्या दाेन आठवड्यात कोरोना चाचणी बंधनकारक आहे. निश्चित कालावधीत कोराेना चाचणी न केल्यास संबंधित दुकाने सील केली जाईल, असा आक्रमक पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

पुणे, मुंबई शहरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढली आहे. अमरावती जिल्ह्यातील समूह संसर्गाची स्थिती उद्‌भवली असून, शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील व्यापारी, दुकानदारांना त्यांच्या सहकाऱ्यांसह कोरोना चाचणी करावी लागणार आहे. यात ॲन्टिजेन, आरटीपीसीआर अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतील. काेरोना चाचणी न केल्यास सदर व्यापारी, दुकानदारांची प्रतिष्ठाने सील करणाऱ्यासह दंड आकारला जाईल. फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीपासूनच कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. मार्च महिन्यातही हीच स्थिती असून, आता व्यापारी, दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

----------------

अहवाल तपासणीसाठी स्वतंत्र पथक

व्यापारी, दुकानदारांसह त्यांच्या सहकाऱ्यांची कोरोना चाचणी केली अथवा नाही, याचा शोध घेण्यासाठी महसूल विभागाचे स्वतंत्र पथक असणार आहे. शहर, ग्रामीण अशा दोन्ही भागातील व्यापारी, दुकानदारांची ॲन्टिजेन, आरटीपीसीआर चाचणी अहवाल तपासले जातील. यादरम्यान कोरोना चाचणी न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दुकान, प्रतिष्ठान सील केले जाणार आहे. समूह संसर्ग राेखण्यासाठी व्यापारी, दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे.

-------------------

ज्येष्ठांनी लस टोचून घ्यावी

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला असून लसीची टंचाईदेखील नाही. कुंटुंबातील तरुणांनी ज्येष्ठांच्या कोरोना लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. शहर, ग्रामीण क्षेत्रात लसीकरण केंद्रांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे.

------------------

व्यापारी, दुकानदारांना येत्या दाेन आठवड्यात कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. ॲन्टिजेन, आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्या कराव्या लागतील. जे व्यापारी, दुकानदार व त्यांचे सहकारी निर्धारित वेळेत चाचणी करणार नाही, अशी दुकाने, प्रतिष्ठाने सील केले जातील.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी