शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

व्यापाऱ्यांच्या कापूस कट्टीला बाजार समितीमध्ये लगाम 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: December 8, 2023 18:23 IST

अर्धा किलो कपात बंदचा निर्णय : शेतकऱ्यांचे वाचले क्विंटलमागे ५० रुपये

अमरावती : येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना क्विंटलमागे अर्धा किलोची कपात (कट्टी) व्यापाऱ्यांद्वारे केली जायची. मात्र सभापती, उपसभापती, अडते व खरेदीदार यांच्यात बैठक होऊन, ही कट्टी शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे ५० रुपये वाचले आहे.

साधारणपणे फेडरेशन बंद झाल्यापासून कापूस बाजार समित्यांमध्ये विक्री होऊ लागला व तेव्हापासून व्यापाऱ्यांद्वारा क्विंटलमागे ५०० ग्रॅम कट्टी आकारल्या जायची व यासाठी विविध कारणे देण्यात येत असे. याशिवाय कापूस खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांद्वारा शेतकऱ्यांना थेट पेमेंट होत असताना काही अडत्यांद्वारे क्विंटलमागे १५ रुपयांची अडत आकारणी व्हायची. त्यामुळे शेतकऱ्यांकडून क्विंटलमागे ५० रुपये नियमबाह्यरीत्या घेतल्या जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे सभापती हरीश मोरे यांनी गुरुवारी संबंधितांची बैठक बोलावली. यामध्ये कट्टी बंद करण्याचा शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे.

यावेळी उपसभापती भैयासाहेब निर्मळ, संचालक राजेश पाटील, प्रमोद इंगोले, खरेदीदार राजेश पमनानी, इब्राहीम मन्सुरी, अनिल पनपालिया, शंकर आहुजा यांच्यासह सचिव दीपक विजयकर, पवन देशमुख आदी उपस्थित होते. ...तर अडते, दलालावर कारवाई

या बैठकीमध्ये कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांजवळून अडत व दलाल घेण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांजवळून अशा प्रकारे अडत किंवा दलाली घेतल्यास व याबाबत शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाल्यास कृषी उत्पन्न खरेदी विक्री (प्रचालन व सुविधा) अधिनियम १९६३ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सभापती हरीश मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Amravatiअमरावती