शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

व्यापाऱ्यांच्या कापूस कट्टीला बाजार समितीमध्ये लगाम 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: December 8, 2023 18:23 IST

अर्धा किलो कपात बंदचा निर्णय : शेतकऱ्यांचे वाचले क्विंटलमागे ५० रुपये

अमरावती : येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना क्विंटलमागे अर्धा किलोची कपात (कट्टी) व्यापाऱ्यांद्वारे केली जायची. मात्र सभापती, उपसभापती, अडते व खरेदीदार यांच्यात बैठक होऊन, ही कट्टी शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे ५० रुपये वाचले आहे.

साधारणपणे फेडरेशन बंद झाल्यापासून कापूस बाजार समित्यांमध्ये विक्री होऊ लागला व तेव्हापासून व्यापाऱ्यांद्वारा क्विंटलमागे ५०० ग्रॅम कट्टी आकारल्या जायची व यासाठी विविध कारणे देण्यात येत असे. याशिवाय कापूस खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांद्वारा शेतकऱ्यांना थेट पेमेंट होत असताना काही अडत्यांद्वारे क्विंटलमागे १५ रुपयांची अडत आकारणी व्हायची. त्यामुळे शेतकऱ्यांकडून क्विंटलमागे ५० रुपये नियमबाह्यरीत्या घेतल्या जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे सभापती हरीश मोरे यांनी गुरुवारी संबंधितांची बैठक बोलावली. यामध्ये कट्टी बंद करण्याचा शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे.

यावेळी उपसभापती भैयासाहेब निर्मळ, संचालक राजेश पाटील, प्रमोद इंगोले, खरेदीदार राजेश पमनानी, इब्राहीम मन्सुरी, अनिल पनपालिया, शंकर आहुजा यांच्यासह सचिव दीपक विजयकर, पवन देशमुख आदी उपस्थित होते. ...तर अडते, दलालावर कारवाई

या बैठकीमध्ये कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांजवळून अडत व दलाल घेण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांजवळून अशा प्रकारे अडत किंवा दलाली घेतल्यास व याबाबत शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाल्यास कृषी उत्पन्न खरेदी विक्री (प्रचालन व सुविधा) अधिनियम १९६३ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सभापती हरीश मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Amravatiअमरावती