शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

केळीतही विष!

By admin | Updated: April 29, 2016 00:11 IST

केळीला आयुर्वेदात पूर्णान्न म्हटले जाते. लहान मुलांनी दिवसभरातून खाल्लेले एक केळ संपूर्ण आहाराच्या समतुल्य असते, ...

आजारांचा प्रसार : इथेलीन, कॅल्शियम कार्र्र्बाईडचा वापरसंदीप मानकर अमरावतीकेळीला आयुर्वेदात पूर्णान्न म्हटले जाते. लहान मुलांनी दिवसभरातून खाल्लेले एक केळ संपूर्ण आहाराच्या समतुल्य असते, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. मात्र, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेली केळी देखील विषयुक्त आहेत. ‘मृत्यूची विक्री’ या मथळ्याखाली लोकमतने गुरूवारच्या अंकात कॅल्शियम कार्बाईड या घातक रसायनाचा आंबे पिकविण्यासाठी कसा सर्रास वापर होतोय, हे सचित्र, सप्रमाण स्पष्ट केले होते. आंबा हे फळ फक्त उन्हाळ्यात बाजारात उपलब्ध असते. मात्र, वर्षभर बाजारपेठेत दिसणारी केळी देखील विषयुक्त रसायनांचा वापर करून पिकविली जात असतील व त्यांची सर्रास विक्री होत असतील तर त्यातून पसरणाऱ्या आजारांचा वेग किती असेल, याची कल्पना केली जाऊ शकते. अमरावती शहरात केळीचे सुमारे सहा मोठे गोेदाम आहेत. त्यापैकी पठाण चौकात तीन, इतवारा बाजारात एक आणि बसस्थानकाजवळ एक गोदाम आहे. या गोदामात बाहेरील तालुक्यातून आणि इतर जिल्ह्यांमधून आलेली कच्ची केळी एकत्र केली जातात. यापैकी काही ठिकाणांहून पिकलेली केळी देखील येतात. या गोेदामात कच्ची केळी पिकविण्यासाठीची प्रक्रिया केली जाते. येथील काही गोेदामात केळी तत्काळ पिकविण्यासाठी इथेलिनच्या फवारणीसाठी यंत्रे बसविण्यात आली आहेत. अंबानगरी येथून येतात केळीअंबानगरीत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पथ्रोेट, पांढरी आणि अंजनगाव तसेच जळगाव खानदेश येथून केळीची मोठ्या प्रमाणात आवक होते. येथून सकाळी पिकविलेली व कच्ची केळी पठाण चौक, इतवारा, बसस्थानकानजीकच्या गोदामात दाखल होतात. चार ते पाच ट्रक केळी दररोज शहरात येतात. पहाटे पाच वाजता केळीचा लिलाव होतो व त्यांचे किरकोळ विक्रेत्यांकडे वितरण केले जाते. अशी पिकविली जातात केळी केळीच्या फणीवर इथेलिनची फवारणी केली जाते. त्यानंतर दोन दिवस ही केळी गवतात किंवा बंद खोलीत झाकून ठेवली जातात. त्यामुळे रात्रभरात ही केळी पिवळी होतात. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक इथेलिन घातक ठरत असूनही मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते. कॅल्शियम कार्बाईडमधून केळींना उष्णता प्रदान केली जाते. विशिष्ट तापमान ‘मेंटेन’ करण्याकरिता एसीचा वापर केला जातो. यामुळे कृत्रिमरित्या पिकविलेली केळी बराच काळ ताजी व टवटवीत राहतात. इथेपोलिन-३९-एसएल (टॅगपोटिल-३९) या दोन झाकणे रसायनाच्या वापराने पाच डझन केळी पिकविली जाऊ शकतात. बादलीभर पाण्यात दोन झाकण द्रव्य टाकले जाते. या द्रावणात पाच डझन केळीचा घड बुडवून काढला जातो.दोन दिवसांत ही केळी पिकतात.