शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

केळीतही विष!

By admin | Updated: April 29, 2016 00:11 IST

केळीला आयुर्वेदात पूर्णान्न म्हटले जाते. लहान मुलांनी दिवसभरातून खाल्लेले एक केळ संपूर्ण आहाराच्या समतुल्य असते, ...

आजारांचा प्रसार : इथेलीन, कॅल्शियम कार्र्र्बाईडचा वापरसंदीप मानकर अमरावतीकेळीला आयुर्वेदात पूर्णान्न म्हटले जाते. लहान मुलांनी दिवसभरातून खाल्लेले एक केळ संपूर्ण आहाराच्या समतुल्य असते, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. मात्र, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेली केळी देखील विषयुक्त आहेत. ‘मृत्यूची विक्री’ या मथळ्याखाली लोकमतने गुरूवारच्या अंकात कॅल्शियम कार्बाईड या घातक रसायनाचा आंबे पिकविण्यासाठी कसा सर्रास वापर होतोय, हे सचित्र, सप्रमाण स्पष्ट केले होते. आंबा हे फळ फक्त उन्हाळ्यात बाजारात उपलब्ध असते. मात्र, वर्षभर बाजारपेठेत दिसणारी केळी देखील विषयुक्त रसायनांचा वापर करून पिकविली जात असतील व त्यांची सर्रास विक्री होत असतील तर त्यातून पसरणाऱ्या आजारांचा वेग किती असेल, याची कल्पना केली जाऊ शकते. अमरावती शहरात केळीचे सुमारे सहा मोठे गोेदाम आहेत. त्यापैकी पठाण चौकात तीन, इतवारा बाजारात एक आणि बसस्थानकाजवळ एक गोदाम आहे. या गोदामात बाहेरील तालुक्यातून आणि इतर जिल्ह्यांमधून आलेली कच्ची केळी एकत्र केली जातात. यापैकी काही ठिकाणांहून पिकलेली केळी देखील येतात. या गोेदामात कच्ची केळी पिकविण्यासाठीची प्रक्रिया केली जाते. येथील काही गोेदामात केळी तत्काळ पिकविण्यासाठी इथेलिनच्या फवारणीसाठी यंत्रे बसविण्यात आली आहेत. अंबानगरी येथून येतात केळीअंबानगरीत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पथ्रोेट, पांढरी आणि अंजनगाव तसेच जळगाव खानदेश येथून केळीची मोठ्या प्रमाणात आवक होते. येथून सकाळी पिकविलेली व कच्ची केळी पठाण चौक, इतवारा, बसस्थानकानजीकच्या गोदामात दाखल होतात. चार ते पाच ट्रक केळी दररोज शहरात येतात. पहाटे पाच वाजता केळीचा लिलाव होतो व त्यांचे किरकोळ विक्रेत्यांकडे वितरण केले जाते. अशी पिकविली जातात केळी केळीच्या फणीवर इथेलिनची फवारणी केली जाते. त्यानंतर दोन दिवस ही केळी गवतात किंवा बंद खोलीत झाकून ठेवली जातात. त्यामुळे रात्रभरात ही केळी पिवळी होतात. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक इथेलिन घातक ठरत असूनही मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते. कॅल्शियम कार्बाईडमधून केळींना उष्णता प्रदान केली जाते. विशिष्ट तापमान ‘मेंटेन’ करण्याकरिता एसीचा वापर केला जातो. यामुळे कृत्रिमरित्या पिकविलेली केळी बराच काळ ताजी व टवटवीत राहतात. इथेपोलिन-३९-एसएल (टॅगपोटिल-३९) या दोन झाकणे रसायनाच्या वापराने पाच डझन केळी पिकविली जाऊ शकतात. बादलीभर पाण्यात दोन झाकण द्रव्य टाकले जाते. या द्रावणात पाच डझन केळीचा घड बुडवून काढला जातो.दोन दिवसांत ही केळी पिकतात.