शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग वनपर्यटन केंद्र बनले पर्यटकांचे आकर्षण

By admin | Updated: November 23, 2015 00:21 IST

निसर्ग वनपर्यटन केंद्राच्या स्थापनेस एक वर्ष पूर्ण झाले. एका वर्षापूर्वी लावलेली सर्व झाडे जिवंत ठेवण्यात वनविभागाला यश प्राप्त झाले.

मोर्शीत निसर्गरम्य वातावरण : वनविभागाच्या मेहनतीने केंद्रातील झाडे हिरवीकंचमोर्शी : निसर्ग वनपर्यटन केंद्राच्या स्थापनेस एक वर्ष पूर्ण झाले. एका वर्षापूर्वी लावलेली सर्व झाडे जिवंत ठेवण्यात वनविभागाला यश प्राप्त झाले. प्रत्यक्षात आर्थिक लाभाशिवाय पर्यावरण रक्षणासोबतच तीन हजार झाडांपासून मिळणारा प्राणवायू हा अप्रत्यक्ष लाभ मोर्शी परिसराला प्राप्त झाला आहे.शहराला लागून असलेल्या २७ एकर वनभूमीवर तत्कालीन येथील वन परीक्षेत्र अधिकारी अशोक कविटकर यांच्या संकल्पनेतून निसर्ग पर्यटन केंद्राची निर्मीती करण्यात आली. त्या करीता राज्यशासना सोबतच वन विभाग, आणि महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळाने आर्थिक सहकार्य पुरविले होते. या वन पर्यटन केंद्रात वनपरिक्षेत्रात प्रामुख्याने आढळणाऱ्या तथापि नामशेष होऊ पाहणाऱ्या विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली. सोबतच चक्क आसाम सारख्या राज्यात प्रख्यात असलेल्या बांबूच्या विविध प्रजातींचे रोपण करण्यात आले. शिवाय औषधी उपयोगी वनस्पतींकरिता वेगळया नेट शेडची व्यवस्था करून त्यात वनौषधी लावण्यात आलेल्या आहेत. वन पर्यटन केंद्रात तीन हजार झाडे मागील वर्षी लावण्यात आली. मुलांकरिता पर्यटन केंद्रात मुंबईच्या दर्जाचे विविध साहसी खेळणी बसविण्यात आलेले आहे. शिवाय विविध जंगली श्वापदांची ओळख पर्यटकांना व्हावी म्हणून बंगलोर येथील मुर्तीकारांना बोलावून त्यांच्याव्दारे निर्मित विविध जनावरांच्या सजीव वाटणारे जनावरांचे पुतळे बसविण्यात आले. या वनपर्यटन केंद्राचे उद्घाटन मागील वर्षी नोव्हेंबर महिण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले होते. मागील एक वर्षात या वन पर्यटन केंद्राचा मागोवा घेतला असता, लावलेले तिन हजार झाडे जीवंत ठेवण्यात पर्यटन केंद्राच्या अधिकाऱ्यांना यश प्राप्त झाले. वृक्षांची वाढसुध्दा लक्षनीय दिसून येते. येणाऱ्या तीन वर्षात संपूर्ण वन पर्यटन केंद्र डेरेदार वृक्षांनी बहरुन येइल असा विश्वास अधिकाऱ्यांना वाटतो.दीड लाखांपेक्षा अधिक पर्यटकांची भेट !वनपर्यटन केंद्राच्या उद्घाटनानंतर एका वर्षात १ लक्ष ५७ हजार २९० पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली. ७४ शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहल काढून या वनपर्यटन केंद्राला भेट दिलेली आहे. या वनपर्यटन केंद्रात प्रवेश करणाऱ्यांकडून उद्घाटनानंतर प्रत्येकी १० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. आता प्रत्येकी २० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. एका वर्षात १६ लक्ष ९५ हजार ३४० रुपये पर्यटकांमुळे प्राप्त झाले असून जवळपास ५ लक्ष ७० हजार रुपयांचा खर्च झालेला आहे.आधुनिकतेचा ध्यास उद्घाटनानंतर वनपर्यटन केंद्रातील प्रवेश शुल्काच्या पावत्या छापील होत्या. आता संगणकीय तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली. त्यामुळे लागणारा कागद कमी प्रणाणात वापरला जात आहे. दैनंदिन, मासिक आणि वार्षिक हिशेबसुध्दा एकाचक्षणी मिळण्याची सोय झाली. ही प्रणाली इंटरनेट व्दारा जोडण्यात येणार आहे.जिल्हा मुख्यालयातील अधिकाऱ्यांनासुध्दा या केंद्रातील व्यवहाराची माहिती प्राप्त होऊ शकेल.एक कोटीचा प्रस्ताव वनपर्यटन केंद्रात ठिकठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे लावण्यात आले आहेत. त्यांची संख्यावाढीसोबतच सध्या अप्पर वर्धा धरणातून पारंपरिक विजेवर आधारित मोटारपंपाव्दारे पाणी उचल केले जाते. ही व्यवस्था बदलण्याचा मानस वन विभागाने केला असून सौर ऊर्जेवर चालणारे मोटारपंप लावण्याचे प्रस्तावित केले आहे. याशिवाय या केंद्रात मोफत वायफायची सोय आणि नवीन काही जंगली श्वापदांचे पुतळे बसविण्याचे प्रस्तावित आहे.