शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

निसर्ग वनपर्यटन केंद्र बनले पर्यटकांचे आकर्षण

By admin | Updated: November 23, 2015 00:21 IST

निसर्ग वनपर्यटन केंद्राच्या स्थापनेस एक वर्ष पूर्ण झाले. एका वर्षापूर्वी लावलेली सर्व झाडे जिवंत ठेवण्यात वनविभागाला यश प्राप्त झाले.

मोर्शीत निसर्गरम्य वातावरण : वनविभागाच्या मेहनतीने केंद्रातील झाडे हिरवीकंचमोर्शी : निसर्ग वनपर्यटन केंद्राच्या स्थापनेस एक वर्ष पूर्ण झाले. एका वर्षापूर्वी लावलेली सर्व झाडे जिवंत ठेवण्यात वनविभागाला यश प्राप्त झाले. प्रत्यक्षात आर्थिक लाभाशिवाय पर्यावरण रक्षणासोबतच तीन हजार झाडांपासून मिळणारा प्राणवायू हा अप्रत्यक्ष लाभ मोर्शी परिसराला प्राप्त झाला आहे.शहराला लागून असलेल्या २७ एकर वनभूमीवर तत्कालीन येथील वन परीक्षेत्र अधिकारी अशोक कविटकर यांच्या संकल्पनेतून निसर्ग पर्यटन केंद्राची निर्मीती करण्यात आली. त्या करीता राज्यशासना सोबतच वन विभाग, आणि महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळाने आर्थिक सहकार्य पुरविले होते. या वन पर्यटन केंद्रात वनपरिक्षेत्रात प्रामुख्याने आढळणाऱ्या तथापि नामशेष होऊ पाहणाऱ्या विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली. सोबतच चक्क आसाम सारख्या राज्यात प्रख्यात असलेल्या बांबूच्या विविध प्रजातींचे रोपण करण्यात आले. शिवाय औषधी उपयोगी वनस्पतींकरिता वेगळया नेट शेडची व्यवस्था करून त्यात वनौषधी लावण्यात आलेल्या आहेत. वन पर्यटन केंद्रात तीन हजार झाडे मागील वर्षी लावण्यात आली. मुलांकरिता पर्यटन केंद्रात मुंबईच्या दर्जाचे विविध साहसी खेळणी बसविण्यात आलेले आहे. शिवाय विविध जंगली श्वापदांची ओळख पर्यटकांना व्हावी म्हणून बंगलोर येथील मुर्तीकारांना बोलावून त्यांच्याव्दारे निर्मित विविध जनावरांच्या सजीव वाटणारे जनावरांचे पुतळे बसविण्यात आले. या वनपर्यटन केंद्राचे उद्घाटन मागील वर्षी नोव्हेंबर महिण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले होते. मागील एक वर्षात या वन पर्यटन केंद्राचा मागोवा घेतला असता, लावलेले तिन हजार झाडे जीवंत ठेवण्यात पर्यटन केंद्राच्या अधिकाऱ्यांना यश प्राप्त झाले. वृक्षांची वाढसुध्दा लक्षनीय दिसून येते. येणाऱ्या तीन वर्षात संपूर्ण वन पर्यटन केंद्र डेरेदार वृक्षांनी बहरुन येइल असा विश्वास अधिकाऱ्यांना वाटतो.दीड लाखांपेक्षा अधिक पर्यटकांची भेट !वनपर्यटन केंद्राच्या उद्घाटनानंतर एका वर्षात १ लक्ष ५७ हजार २९० पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली. ७४ शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहल काढून या वनपर्यटन केंद्राला भेट दिलेली आहे. या वनपर्यटन केंद्रात प्रवेश करणाऱ्यांकडून उद्घाटनानंतर प्रत्येकी १० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. आता प्रत्येकी २० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. एका वर्षात १६ लक्ष ९५ हजार ३४० रुपये पर्यटकांमुळे प्राप्त झाले असून जवळपास ५ लक्ष ७० हजार रुपयांचा खर्च झालेला आहे.आधुनिकतेचा ध्यास उद्घाटनानंतर वनपर्यटन केंद्रातील प्रवेश शुल्काच्या पावत्या छापील होत्या. आता संगणकीय तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली. त्यामुळे लागणारा कागद कमी प्रणाणात वापरला जात आहे. दैनंदिन, मासिक आणि वार्षिक हिशेबसुध्दा एकाचक्षणी मिळण्याची सोय झाली. ही प्रणाली इंटरनेट व्दारा जोडण्यात येणार आहे.जिल्हा मुख्यालयातील अधिकाऱ्यांनासुध्दा या केंद्रातील व्यवहाराची माहिती प्राप्त होऊ शकेल.एक कोटीचा प्रस्ताव वनपर्यटन केंद्रात ठिकठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे लावण्यात आले आहेत. त्यांची संख्यावाढीसोबतच सध्या अप्पर वर्धा धरणातून पारंपरिक विजेवर आधारित मोटारपंपाव्दारे पाणी उचल केले जाते. ही व्यवस्था बदलण्याचा मानस वन विभागाने केला असून सौर ऊर्जेवर चालणारे मोटारपंप लावण्याचे प्रस्तावित केले आहे. याशिवाय या केंद्रात मोफत वायफायची सोय आणि नवीन काही जंगली श्वापदांचे पुतळे बसविण्याचे प्रस्तावित आहे.