शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

खरेदीअभावी तूर यार्डातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:33 IST

व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी करावा, असा शासननिर्णय आहे. त्याची अंमलबजावणी मोर्शी येथील कृषिउत्पन्न बाजार समिती सचिवांनी केली.

ठळक मुद्देमोर्शी बाजार समिती : नाफेडची खरेदी केव्हा? व्यापाऱ्यांना खरेदीपासून मज्जाव

आॅनलाईन लोकमतमोर्शी : व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी करावा, असा शासननिर्णय आहे. त्याची अंमलबजावणी मोर्शी येथील कृषिउत्पन्न बाजार समिती सचिवांनी केली. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचले. यार्डमधील ३०० पोते तुरीचा हर्रास व्यापारी करू शकले नाहीत. दुसरीकडे नाफेडची खरेदी अद्याप सुरू झाली नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.शासनाने यावर्षी तुरीचा हमीभाव ५ हजार ४५० जाहीर केला. व्यापारी ४ हजार ५०० रुपयांपर्यंत खरेदी करीत आहेत. शासनाची अपुरी व सक्षम नसलेली खरेदी यंत्रणा यामुळे शासन हमीभाव जाहीर करून खरेदीची घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात शुभारंभाला मुहूर्तच मिळत नसल्यामुळे दरवर्षी शेतकरी व्यापारी वर्गाकडून भावात नागवला जातो.व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी करावा म्हणून तालुकास्तरावर त्रिसदस्यीय शासकीय समिती आहे. यामध्ये बाजार समिती सचिवांचा समावेश आहे. मोर्शी येथील सचिव लाभेश लिखितकर यांनी तुरीला व्यापाऱ्यांनी शासकीय हमीभाव द्यावा, अशा आशयाची नोटीस व्यापाऱ्यांना जारी केली आहे.व्यापाऱ्यांचाही सवालस्थानिक स्तरावर हमीभाव नियंत्रण समिती, व्यापारी, शेतकरी यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो. सध्या शेतकऱ्यांना तत्काळ माल विकण्याशिवाय पर्याय नाही. मोर्शीतील खरेदी-विक्री बंद असला तरी जिल्ह्यातील इतर यार्डांवर खरेदी सुरू आहे. याशिवाय यार्डाबाहेर होणाºया खरेदीवर कुणाचे नियंत्रण नाही. मग सर्व नियंत्रण कृषिउत्पन्न बाजार समितीचे यार्डवरच का, असा सवाल व्यापारी वर्ग करीत आहे.सक्षम यंत्रणा कधी होणार?शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी करावा, यासाठी व्यापारी, अडते यांच्यावर कायदेशीर कारवाईची भाषा असली तरी मुळात शासनाजवळ खरेदीसाठी सक्षम यंत्रणा नाही. तूर बाजारात येऊन तीन आठवडे झाले. सध्या आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. खरेदी सुरू होईपर्यंत लाखो क्विंटल माल व्यापाऱ्यांच्या घशात गेलेला असेल. यानंतर शासकीय खरेदीचा थाटात शुभारंभ होईल.योग्य भावावरच विक्री कराखरेदीविना राहिलेला माल कृषिउत्पन्न बाजार समितीच्या तारण माल योजनेनुसार सहा टक्के व्याजदराने घेऊन ठेवला जाऊ शकतो, असे आवाहन सभापती अशोक रोडे यांनी केले. त्याला १० शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला असून, योग्य भाव मिळाल्यावर हे शेतकरी आपली तूर विकू शकतील.काही गोष्टी आकलनापलीकडेशासन हमीभावाने खरेदी करण्यास व्यापाऱ्यांना बांधील करीत असले तरी व्यापारी हा माल पुढे प्लँट किंवा मोठ्या कंपन्यांना विकतात. त्यांच्यावर मात्र शासनाचे कोणतेच निर्बंध नाहीत. शेतकरीहिताचा आव आणत शासन हमीभावाने खरेदीचे निर्देश जारी करून नेमके काय साध्य करू इच्छिते, हे समजण्यापलीकडचे आहे.नाफेडने खुल्या बाजारात उतरून शेतकºयांचा माल खरेदी करावा. आॅनलाइन नोंदणीच्या पुढे शासकीय यंत्रणा सरकली नाही. बाजारात ४५०० पुढे तुरीला भाव नाही. अशा स्थितीत अडते-व्यापाऱ्यांपुढे दुसरा पर्याय नाही.- महेंद्र कानफाडेअडते-व्यापारी, मोर्शी