शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

महिलांवर अत्याचार वाढले

By admin | Updated: September 11, 2015 00:34 IST

मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले असून ही गंभीर बाब असताना याकडे शासनकर्ते गांभिर्याने दखल घेत नाही, ....

पत्रपरिषद : राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोपअमरावती : मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले असून ही गंभीर बाब असताना याकडे शासनकर्ते गांभिर्याने दखल घेत नाही, असा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे गुरुवारी पत्रपरिषदेत केला. वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विदर्भाच्या दौऱ्यावर त्या आल्या असता त्यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना महिलांचे प्रश्न, समस्यांवर हात घातला. चित्रा वाघ यांच्या मते, आज महिलांची सुरक्षितता, रोजगार, शिक्षण व आरोग्य असे कितीतरी प्रश्न आ वासून उभे आहेत. विशेषत: विदर्भात कुमारी मातेचा प्रश्न, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मुलींना ‘मिसींग’ करुन त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जात आहे. या मुली गायब करताना त्या नक्षलवादी चळवळीत सामील झाल्याचा देखावा केला जातो, असा आरोप त्यांनी केला. शासन कोणतेही असो महिलांबाबत फार सकारात्मक पावले उचलत नाही. मी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संपूर्ण राज्यात दौरे करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पहिल्यांदा विदर्भात आले आहे. अमरावती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल असून हेवेदावे बाजूला सारून नव्याने बांधणी केली जाईल, असे त्या म्हणाल्यात. महिलांचे प्रश्न, समस्या सोडविताना शिवणकाम, शेळी व्यवसायातून रोजगार उभारण्याचे मानस आहे. महिलांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्याकरीता ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला जाणार आहे. तसेच मुलींच्या आश्रमशाळांना भेटी देऊन त्याचे प्रश्न, समस्या जाणून घेताना त्या शासनस्तरावर सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना काही दिवसांपूर्वी महिलांच्या सुरक्षितेतविषयी ‘बेस प्लॅन’ विचारला असता ते सकारात्मक उत्तर देऊ शकले नाही, असे वाघ यांनी सांगितले. महिलांचे हक्क, प्रश्न सोडविण्यासाठी वस्ती, वाड्यांवर जाऊन जनजागृती केली जाईल, असेही त्या म्हणाल्यात.पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, नागपूरच्या नगरसेविका प्रगती पाटील, संगीता ठाकरे, नीलिमा महल्ले, मेघा हरणे, सपना ठाकूर आदी उपस्थित होत्या.शरद पवारांच्या नामोल्लेखाने विरोधकांना प्रसिध्दीराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नामोल्लेख केल्याशिवाय विरोधकांना प्रसिध्दी मिळत नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. यूपीए शासनाच्या काळात महिलांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले. सक्षमीकरण, रोजगार, महिला सुरक्षा आदींवर भर देण्यात आला. त्यामुळे आज गावखेड्यात बचतगटाचे जाळे पसरले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने राज्यभर महिलांच्या मूलभूत सुविधांसाठी लढा दिला जाणार, असे त्या म्हणाल्या. सिंचन घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी सुरू झाल्याबाबतच्या प्रश्नांवर त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी चौकशी सुरु झाल्याचे सांगिून प्रश्नाला बगल दिली.