शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

महिलांवर अत्याचार वाढले

By admin | Updated: September 11, 2015 00:34 IST

मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले असून ही गंभीर बाब असताना याकडे शासनकर्ते गांभिर्याने दखल घेत नाही, ....

पत्रपरिषद : राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोपअमरावती : मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले असून ही गंभीर बाब असताना याकडे शासनकर्ते गांभिर्याने दखल घेत नाही, असा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे गुरुवारी पत्रपरिषदेत केला. वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विदर्भाच्या दौऱ्यावर त्या आल्या असता त्यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना महिलांचे प्रश्न, समस्यांवर हात घातला. चित्रा वाघ यांच्या मते, आज महिलांची सुरक्षितता, रोजगार, शिक्षण व आरोग्य असे कितीतरी प्रश्न आ वासून उभे आहेत. विशेषत: विदर्भात कुमारी मातेचा प्रश्न, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मुलींना ‘मिसींग’ करुन त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जात आहे. या मुली गायब करताना त्या नक्षलवादी चळवळीत सामील झाल्याचा देखावा केला जातो, असा आरोप त्यांनी केला. शासन कोणतेही असो महिलांबाबत फार सकारात्मक पावले उचलत नाही. मी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संपूर्ण राज्यात दौरे करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पहिल्यांदा विदर्भात आले आहे. अमरावती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल असून हेवेदावे बाजूला सारून नव्याने बांधणी केली जाईल, असे त्या म्हणाल्यात. महिलांचे प्रश्न, समस्या सोडविताना शिवणकाम, शेळी व्यवसायातून रोजगार उभारण्याचे मानस आहे. महिलांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्याकरीता ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला जाणार आहे. तसेच मुलींच्या आश्रमशाळांना भेटी देऊन त्याचे प्रश्न, समस्या जाणून घेताना त्या शासनस्तरावर सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना काही दिवसांपूर्वी महिलांच्या सुरक्षितेतविषयी ‘बेस प्लॅन’ विचारला असता ते सकारात्मक उत्तर देऊ शकले नाही, असे वाघ यांनी सांगितले. महिलांचे हक्क, प्रश्न सोडविण्यासाठी वस्ती, वाड्यांवर जाऊन जनजागृती केली जाईल, असेही त्या म्हणाल्यात.पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, नागपूरच्या नगरसेविका प्रगती पाटील, संगीता ठाकरे, नीलिमा महल्ले, मेघा हरणे, सपना ठाकूर आदी उपस्थित होत्या.शरद पवारांच्या नामोल्लेखाने विरोधकांना प्रसिध्दीराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नामोल्लेख केल्याशिवाय विरोधकांना प्रसिध्दी मिळत नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. यूपीए शासनाच्या काळात महिलांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले. सक्षमीकरण, रोजगार, महिला सुरक्षा आदींवर भर देण्यात आला. त्यामुळे आज गावखेड्यात बचतगटाचे जाळे पसरले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने राज्यभर महिलांच्या मूलभूत सुविधांसाठी लढा दिला जाणार, असे त्या म्हणाल्या. सिंचन घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी सुरू झाल्याबाबतच्या प्रश्नांवर त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी चौकशी सुरु झाल्याचे सांगिून प्रश्नाला बगल दिली.